https://shrikant89.blogspot.com
ग्रामअभियान हा प.पू. गुरुमाऊलींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय प्रत्येक मासिक सत्संगात गुरुमाऊली ग्राम अभियानावर तळमळीने बोलत असतात. विषय एकच पण प्रत्येक सत्संगाला वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तो विषय मांडत असतात आणि सर्व सेवेकऱ्यांना खेड्यात जाऊन ग्राम अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करीत असतात.
जुन २०१२ च्या एका रविवारी जवळच्याच एका खेडयात मी ग्राम अभियानासाठी गेलो होतो. ग्रामदेवतेचे सन्मान करुन आमचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरु होता तेवढयात मला आई आजारी असल्याचा आणि हॉस्पिटल मध्ये दाखल केल्याचा फोन आला. केंद्र प्रतिनिधींची परवानगी घेऊन मी घरी परतलो आईच्या लिव्हरला सुज आलेली आहे छातीत पाणी झालेले आहे असे डॉक्टरांनी सांगितले. वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट झाल्या परंतु अचुक निदान होत नव्हते ४ दिवस झाले होते. आई बोलूही शकत नव्हती मी घाबरलो, महाराजांचा धावा केला, महाराज आता तुम्हीच सांभाळा आणि काय आश्चर्य! माझा धावा जणु महाराजांनी ऐकला गेले ४ दिवस तोंडातुन शब्दही न काढणारी आई अचानक उठून बसली आणि मोठयाने म्हणाली, “ काय केले रे तुझ्या डॉक्टरने? पोरा तु सेवा चालु ठेव !” आणि असे म्हणून ती परत झोपी गेली.
तिला पुन्हा श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला डॉक्टर, नर्स पुन्हा आले ते उपचार करू लागले तेवढ्यात ती ओरडली बाजुला व्हा मला काही झाले नाही समोर माऊली उभे आहेत आता मला भिती नाही असे म्हणाली. आईचा श्री स्वामी समर्थ हा जप चालुच होता ५-६ दिवस आईला हॉस्पिटलमध्ये ठेवले महाराजांच्याच कृपेने गंभीर आजारातुन आई पुर्ण बरी झाली.
आईला घेऊन आम्ही गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी गेलो मुजरा करत असतानाच माऊली आम्हाला म्हणाले,शिंदे दवाखान्यात आलेला अनुभव सर्वांना सांगा आम्हाला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला कारण,प.पू. गुरुमाऊलींनी आईला जीवनदान दिले होते.
|| श्री स्वामी समर्थ ||
टीप- या ब्लॉग वर सदर श्री स्वामी समर्थ अनुभव हे फेसबूक,व्हॉटअप, ट्विटर व सत्य अनुभव इ . माध्यमांच्या आधारे घेतले आहे .
0 Comments
Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.