google-site-verification: googlea24dc57d362d0454.html कोरोना रोगाच्या काळात आलेला सत्य अनुभव

कोरोना रोगाच्या काळात आलेला सत्य अनुभव


|| श्री स्वामी समर्थ ||

            श्री स्वामी समर्थ परमपुज्य गुरूमाउली व आदरणीय दादासाहेब यांच्या चरणी त्रिवार मुजरा व कोटी कोटी प्रणाम,
             माझा अनुभव खुप मोठा आहे, तरी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते घरातील माझी लहान मुलगी सोडून सगळेच कोरोना झालेला होता.हे समजताच औषधे चालू केली होती, पण मिस्टरांना त्याचा फरक पडला नाही, ऑक्सिजन लेवल कमी झाली, अ‍ॅडमिट करायचे होते पण बेड मिळत नव्हता. 
             महाराजाची सेवा चालूच होती बेडची व्यवस्था झाली व ५ एप्रिलला ॲडमीट केले. दोन दिवसांनी तब्बेत खूप बिघडली असे समजले.आई वडील कुणीच नसल्याने कोणाला विचारावे, काय करावे काहीच सुचत नव्हते स्वतःमी पण तापाने फणफणत होते.आजारी असतानाच औषधामुळे महिन्याची अडचण लवकरच आली. या वेळेस ग्रंथांना हात लावायचा नसतो पण स्वामीना सांगितले कि, महाराज आपण  व माझे मिस्टर हेच माझे विश्व आहे मला माफ करा, मी तुमची अशा परिस्थित सेवा करते. 
           स्वामी सारामृत, दुर्गासप्तशती, मल्हारी सप्तशती, ग्रंधाचे पाठ एकामागे एक चालू केले. ७ एप्रिल तब्येत खुप बिघडली व त्यांना PICU मध्ये शिफ्ट केले व नंतर ९ तारखेला डॉक्टरानी फोन करून तब्येत खुप च जास्त खराब आहे असे सांगितले . 
           गुरुचरित्र तर सारखेच वाचत राहिले, गुरुचरित्र वाचत असताना मी एक गुरुचरित्राचा १ अध्याय वाचायचे त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचे त्या वेळेस मी डोळे बंद करून स्वामी समर्थांची माळ करत असे मला असे दिसले की,माझ्या मिस्टरांच्या हॉस्पिटलमध्ये शेजारी दोन व्यक्ती बसल्या सारखे दिसले त्यामध्ये एका व्यक्तीने पूर्ण पांढरे कपडे घातले होते.  मी थोडावेळ बघितले आणि नंतर अचानक घाबरून माझे डोळे उघडले गेले नंतर मी परत पुन्हा पुन्हा प्रयत्न केला की मला ते चित्र परत दिसावे पण मला ते चित्र दिसले नाही नंतर मला समजले मी त्या दोन्ही चित्र आकृतीच्या होत्या त्या म्हणजे स्वामी समर्थ महाराज आणि आपले परमपूज्य गुरु माऊली. 
           नंतर नवनाथ पोथी चा अध्याय वाचन करताना मला असे जाणवत होते, की जसे मी गाणगापूर मध्येच आहे ७  तारखेपासून १४  तारखेपर्यंत आमचा वेळ खुप कठीण गेला आणि १५  तारखेला स्वामी जंयतीच्या रात्री ९ वाजता यांना पी आय सी यु मधू न आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले या काळात वेळोवेळी स्वामी समर्थ महाराजांनी गुरुमाऊलीनी आमच्याबरोबर आहेत याचा दृष्टांत आला होता. 
           १५ तारखेला त्यांना नॅार्मल ICU ला शिफ्ट केले २१ ला त्यांना नॉर्मल रूम ला शिफ्ट केले. डॉ. नी सांगितले कि, घरी ऑक्सिजनची व्यवस्था करा पेंशट ला लगेच घरी सोडू पण ऑक्सिजन ची व्यवस्था च होत नव्हती.दोन दिवसाच्या खूप खूप प्रयत्नानंतर डॉक्टरांना सांगितले आणि डॉक्टरांनीच लगेच तिथेच हॉस्पिटलमधूनच फोन केला व ऑक्सिजन मशीन ची सोयपण झाली. 
            हा काळ खूप खडतर गेला २५  दिवसांच्या खडतर प्रयत्नानंतर जेव्हा मिस्टर घरी आले आणि थोड्या दिवसांनी हळू बोलायला लागले तेव्हा ते म्हणाले की आपण हे सर्व ठीक झालं की नंतर गाणगापूर ला जाऊया कारण आयसीयू मध्ये असताना त्यांना एका दिवशी रात्री बारा वाजता देवाच्या आरती बरोबर ढोल ताशे थाल्या वाजवलेले असे मोठे मोठे आवाज येत होते त्यावेळेस मी त्यांना सांगितले की,आवाज आपण गाणगापूरच्या मंदिरात एक वाजता आरती होते त्यावेळेस ऐकलेले होते तसे होते का? ते हो म्हणाले, त्या कालावधीत मला गुरुचरित्र वाचले होते आणि मला गुरुचरित्र अध्याय प्रमाणे माझ्या आयुष्यातील अध्याय व्यवस्थितरीत्या पार पडत आहेत हे जाणवत गेले. आज आम्ही सर्व एकत्र आहोत ते फक्त माझे गुरूमाउली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भरपूर प्रमाणात आमच्यावर झालेल्या कृपा आशीर्वादाने...................
             आम्ही खरच हे नशीबवान आहोत कि, आम्ही गुरूमाउलीच्या छत्र छायेखाली आहोत.

                   || श्री स्वामी समर्थ ||

Post a Comment

0 Comments

Close Menu