google-site-verification: googlea24dc57d362d0454.html प्रकरण-१ व्यवस्थापनाची तत्त्वे, वाणिज्य संघटन, इ. १२ वी (स्वाध्याय)

प्रकरण-१ व्यवस्थापनाची तत्त्वे, वाणिज्य संघटन, इ. १२ वी (स्वाध्याय)

https://shrikant89.blogspot.com

प्रश्न १. पुढील दिलेल्या पर्याय मधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.(उत्तरे) (गुण-१)
(१) एफ. डब्ल्यू. टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते.
(२) प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर हे सुव्यवस्थेचे तत्त्व या तत्त्वात येते.
(३) संघटनेच्या सदस्याला एकाच वरिष्ठाकडून आदेश मिळाले पाहिजेत.
(४) संज्ञापन (अधिकार) साखळी म्हणजे अधिकार पदक्रमानुसार उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत केलेला संवाद.
(५) उत्पादनाच्या विविध बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एफ.डब्ल्यू. टेलर यांनी एकूण आठ फोरमन सांगितले.
(६) कामगारांच्या शारीरिक हालचालींचा अभ्यास हालचाल तंत्रामुळे करता येतो.

प्रश्न २. जोड्या जुळवा (उत्तरे)(गुण-१)
(अ) हेन्री फेयॉल –  आधुनिक व्यवस्थापन
(ब) निर्देशनातील एकवाक्यता –  एक वरिष्ठ एक योजना
(क) व्यवस्थापनाची तत्त्वे –  सामान्य मार्गदर्शक तत्त्वे
(ड) एफ. डब्ल्यू. टेलर –  शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत
(इ) कार्यात्मक संस्था  - आठ फोरमन

प्रश्न ३.पुढील प्रत्येक विधानासाठी योग्य शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. (गुण-१)
(१)   विशिष्ट काम पूर्ण करताना कर्मचाऱ्यांच्या हालचालींचा तसेच यंत्राचा अभ्यास करणे.
उत्तर- हालचालींचा अभ्यास
(२)   एखादया कर्मचाऱ्यास दिलेले काम पूर्ण करण्यास किती वेळ लागला याचे निरीक्षण व नोंद करण्याचे तंत्र.          
उत्तर- वेळेचा अभ्यास
(३) विविध उपक्रमांचे एक संघटित, पद्धतशीर आणि गंभीर मूल्यमापन करणे.
 उत्तर- कार्य अभ्यास
(३)   नावीन्यपूर्ण मार्गाने काम करण्याचे तत्त्व.
उत्तर-पुढाकार घेण्याचे तत्त्व
(४)   ‘प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर’ असे सांगणारे तत्त्व.
उत्तर- सुव्यवस्थेचे तत्त्व.

प्र.४ पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा. (गुण-१)
(१)   व्यवसायाची तत्त्वे सार्वत्रिक आहेत.
      उत्तर- बरोबर
(२)   व्यवस्थापनाची तत्त्वे वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या पद्धतीने लागू केली जातात.
      उत्तर-बरोबर
(३)   व्यवस्थापनाची फक्त काहीच तत्त्वे महत्त्वाची आहेत.
उत्तर- चूक
(४)   हेन्री फेयॉल यांनी व्यवस्थापनेची वेगवेगळी तंत्रे विकसित केली.
 उत्तर-चूक
(५)   एफ डब्ल्यू टेलर यांनी व्यवस्थापनाची १४ तत्वे विकसित केली.
उत्तर- चूक
(६)   संघटनेतील प्रत्येक सदस्याला फक्त एक वरिष्ठ कडून आदेश मिळाले पाहिजे.
उत्तर- बरोबर

प्रश्न ५ वा. गटात न बसणारा शब्द शोधा (गुण-१) (उत्तरे)
(१) अधिकार व जबाबदारीचे तत्त्व, हालचाल अभ्यास, श्रम विभागणीचे तत्त्व, शिस्तीचे तत्त्व.
(२) थकवा अभ्यास, आदेशातील एकवाक्यतेचे तत्त्व, कार्य अभ्यास, हालचाल अभ्यास.
(३) आदेशातील एकवाक्यतेचे तत्त्व, केंद्रीकरणाचे तत्त्व, आदेशातील तत्त्व, समय अभ्यास.
(४) साधनसामग्री व हत्यारांचे प्रमाणीकरण, शास्त्र हे मूलभूत नियम नाही, मानसिक क्रांती, अधिकारांचे विभाजन.
(५) शास्त्रीय पद्धतीने काम निर्धारण, शास्त्रीय पद्धतीने निवड वप्रशिक्षण, नोकरी स्थैर्यतेचे तत्त्व, अलग (विभक्त) विभेदात्मक दरवेतन.

 प्र.६ प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा : ( गुण-१)
(१) आदेशातील एकवाक्यता हे तत्त्व सांगा.
उत्तर :आदेशातील एकवाक्यतेचे तत्त्व म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याने फक्त एका वरिष्ठाकडून आदेश व सूचना स्वीकाराव्यात आणि तो फक्त त्या वरिष्ठालाच उत्तरदायी व जबाबदार राहील.
(२) साधने व उपकरणे यांचे मानकीकरण म्हणजे काय?
उत्तर : साधने व उपकरणे यांचे मानकीकरण म्हणजे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उत्पादन कार्य व देखभाल यामध्ये दर्जा राखण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रमाणित साधने व उपकरणे यांचा पुरवठा करणे होय.
(३) वेतनदर म्हणजे काय?
उत्तर : जे कर्मचारी निर्धारित वेळेमध्ये दर्जात्मक उत्पादन अधिक प्रमाणात करतील त्यांना अधिक दराने वेतन देणे व जे कर्मचारी निर्धारित वेळेत कमी दर्जेदार उत्पादन (घटक) करतील त्यांना कमी दराने वेतन देणे.
(४) सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणे म्हणजे काय?
उत्तर : व्यवस्थापनाच्या या तत्त्वानुसार संघटनेमध्ये समूहाकडून काम करून घेताना कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक हिताला महत्त्व न देता,व्यवसायाचे हित महत्त्वाचे मानले जाते.
(५) तत्त्व म्हणजे काय?
उत्तर : निर्णय प्रक्रियेसाठी आणि कृतींसाठी मार्गदर्शक ठरणारी मूलभूत सत्याची विधाने म्हणजे ‘तत्त्व’ होय. ही तत्त्वे वर्णनात्मक व नियम घालून देणारी असतात.

प्र.७ पुढील वाक्यांतील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा :(गुण-१)
(१)   नोकरीतील सुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते.
उत्तर- नोकरीतील असुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते..
(२)   संघभावनेचे तत्त्व म्हणजे विभागणी हीच शक्ती होय.
उत्तर- संघभावनेचे तत्त्व म्हणजे एकी हीच शक्ती होय.
(३)   संस्थेच्या प्रत्येक सदस्याला फक्त एकाच कनिष्ठ व्यक्तीकडून आदेश मिळाले पाहिजेत.
उत्तर- संस्थेच्या प्रत्येक सदस्याला फक्त एकाच वरिष्ठ व्यक्तीकडून आदेश मिळाले पाहिजेत.
(४)   विकेंद्रीकरण म्हणजे विशिष्ट स्थानावर अधिकारांचे झालेले एकत्रीकरण.
उत्तर- केंद्रीकरण म्हणजे विशिष्ट स्थानावर अधिकारांचे झालेले एकत्रीकरण.
(५) व्यवस्थापनाची तंत्रे वेगवेगळ्या परिस्थितीत भिन्न पद्धतीने लागू पडतात.
उत्तर-व्यवस्थापनाची तत्त्वे वेगवेगळ्या परिस्थितीत भिन्न पद्धतीने लागू पडतात.

प्र.८ पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा : ( गुण-२)
(१) हालचाल अभ्यास.
उत्तर : १) एफ. डब्ल्यू. टेलर यांनी हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण शास्त्रीय व्यवस्थापनाचे तंत्र विकसित केले आहे. शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तंत्रामध्ये कोणतेही कार्य पूर्ण करताना होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातांचा,पायांचा व शरीराच्या इतर भागांच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास केला जातो. तसेच यंत्राच्या हालचालींचेही एखादे कार्य पूर्ण करताना निरीक्षण केले जाते. (२) या अभ्यासामुळे व्यवस्थापकाला एखादे काम पूर्ण करण्यास कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या शारीरिक हालचाली समजण्यास मदत होते. शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. तसेच वाया जाणारा वेळ कमी करता येतो, कच्च्या मालाचे नुकसान टाळता येते व पूर्व निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होते.
(२) भिन्न तुकडा दर प्रणाली.
उत्तर : (१) एफ. डब्ल्यू. टेलर यांनी मांडलेल्या अनेक शास्त्रीय व्यवस्थापन तंत्रांपैकी कामाच्या प्रमाणानुसार वेतन भिन्नता हे एक महत्त्वाचे शास्त्रीय व्यवस्थापन तंत्र आहे. हे तंत्र असे नमूद करते की, कार्यक्षम व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये वेतन देण्याच्या संदर्भात भेद केला पाहिजे. (२) व्यवस्थापन तज्ज्ञ प्रयोग व निरीक्षणानंतर विहित वेळेत उत्पादन प्रमाण निश्चित करतात, जे कर्मचारी प्रमाण उत्पादनापेक्षा कमी उत्पादन विहीत वेळेत करतील त्यांना कमी वेतन दिले जाते व जे कर्मचारी प्रमाण उत्पादन विहित वेळेत जास्त उत्पादन करतील त्यांना प्रोत्साहन पर जास्त वेतन दिले जाईल. या तंत्रामुळे जे कार्यक्षम असतील त्यांना अधिक वेतन व जे अकार्यक्षम असतील त्यांना कमी वेतन मिळाल्यामुळे ते त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतील. हे शास्त्रीय व्यवस्थापन तंत्र असे नमूद करते की, कार्यक्षम व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये वेतन देण्याच्या संदर्भात भेदभाव केला पाहिजे. टेलर पुढे असे स्पष्ट करतात की, अकार्यक्षम कर्मचाऱ्याला दिल्या जाणाऱ्या वेतनाच्या तुलनेत कार्यक्षम कर्मचाऱ्याला जास्त वेतन दिले पाहिजे.
(३) थकवा अभ्यास.
उत्तर : (१) अतिपरिश्रमामुळे शारीरिक व मानसिक दौर्बल्य जाणवते, यालाच थकवा म्हणतात. सर्व साधारणपणे कामाचा अतिरिक्त ताण, कामाच्या तासांमध्ये ठरावीक वेळेनंतर विश्रांतीचा अभाव, अवजड साधने, उद्दिष्ट पूर्तीचा ताण, आजूबाजूचे दूषित वातावरण इत्यादींमुळे कर्मचाऱ्यांना थकवा जाणवतो. (२) त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होते व त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना थकवा जाणवणार नाही यासाठी उपाययोजना आखल्या पाहिजेत व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल असे नियोजन केले पाहिजे.
(४)वेळ अभ्यास.
उत्तर : (१) वेळेचा अभ्यास हे एक व्यवस्थापनाचे महत्त्वाचे तंत्र असून ते एफ. डब्ल्यू. टेलर यांनी विकसित केले आहे. या तंत्राच्या मदतीने विशिष्ट कार्य पूर्ण करण्यास कर्मचाऱ्यास किती वेळ लागतो याची नोंद करता येते. व्यवस्थापनाच्या या शास्त्रीय तंत्रामुळे सर्वसाधारण कर्मचाऱ्याच्या काम करण्याच्या वेगावर वेळेचा अभ्यास आधारित असतो. (२) संपूर्ण कामाच्या प्रत्येक छोट्या, छोट्या भागांचा व ते पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळांचा अभ्यास या तंत्रात केला जातो. अशा अभ्यासामुळे व्यवस्थापकाला एखादे विशिष्ट काम पूर्ण करण्यास लागणारी ‘प्रमाणवेळ’ ठरवण्यासाठी मदत होते. या अभ्यासाच्या मदतीने व्यवस्थापक कर्मचाऱ्याला देण्यात येणारे वेतन ठरवू शकतो व उत्पादन खर्चावरही नियंत्रण मिळवू शकतो.

प्र.९ पुढील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा.(३ गुण)
            १) श्री. हर्षद एक उदयोजक असून पर्यावरणास अनुकूल भांडी तयार करण्याचा व्यवसाय करतात. दोन्ही स्त्री व पुरुष कामगार त्यांच्या कारखान्यात काम करतात. सर्व पुरुष कामगार थेट मशीनवर काम करतात, तर महिला संवेष्टन (पॅकेजिंग) विभागात कार्यरत आहेत. श्री. शरथ वित्त व्यवस्थापक (Finance Manager), तर श्रीमती नैना मानव संसाधन व्यवस्थापक (HR Manager) म्हणून कार्यरत आहेत, या आधारे-
१)     वरील परिस्थितीत व्यवस्थापनाचे कोणतेही एक तत्त्व ओळखा.
उत्तर : वरील परिस्थितीत श्रमविभागणीचे तत्त्व अवलंबलेले आहे.
२)     या संस्थेत श्रीमती नैना यांचे पदनाम काय आहे?
उत्तर : या संस्थेत श्रीमती नैना यांचे पद मानव संसाधन व्यवस्थापक असे आहे.
३)     संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार आहे?
उत्तर : संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी उद्योजक श्री. हर्षद हे जबाबदार आहेत.
                 ) ‘फाइन डायमंडस लिमिटेड’ या कंपनीत २०० कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये ६० कर्मचारी, दुसऱ्या शीफ्टमध्ये ६० कर्मचारी आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये ८० कर्मचारी काम करीत आहेत. दुपारच्या जेवणाची सुट्टी (Lunch Break) आणि कामाच्या वेळेतील बदलाव्यतिरिक्त (Shift break) पुरेसा वेळ मिळत नाही. वेळेच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे कोणताही कर्मचारी दिलेले काम वेळेत पूर्ण करू शकत नाही. परिणामी, पुढील शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना विलंब होतो.
१) कंपनीने कोणत्या शास्त्रीय तत्त्वाचे अनुसरण करणे आवश्यक आहे ते ओळखा.
उत्तर : ‘फाइन डायमंडस लिमिटेड’ या कंपनीमध्ये व्यवस्थापन शास्त्रातील विज्ञानाचे अनुसरण केले पाहिजे. मूलभूत नियमांचे नाही.           
) ‘फाइन डायमंडस लिमिटेड’ कंपनीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी कोणत्या दोन शास्त्रीय तत्त्वांचा उपयोग केला पाहिजे?
उत्तर- फाइन डायमंडस लिमिटेड’ या कंपनीने कामाच्या विभागणीचे तत्त्व, थकवा अभ्यास, व्यवस्थापन व शास्त्रीय पद्धतीने कामाचे वाटप याचा उपयोग करणे आवश्यक आहे.
३)     कंपनीचे काम वेळेत पूर्ण का होत नाही?
उत्तर : ‘फाइन डायमंडस लिमिटेड’ या कंपनीचे काम वेळेत पूर्ण न होण्याची कारणे पुढीलप्रमाणे
(अ) पुरेशी विश्रांती न देता दीर्घकालीन (जास्त वेळ) कामाचे तास.
(ब) अधिकाऱ्यांनी केलेले चुकीचे वेळ व्यवस्थापन, चुकीचे कामाचे वाटप ही प्रमुख कारणे काम वेळेत पूर्ण न होण्यासाठी आहेत.
)‘फाइन डायमंडस लिमिटेड’च्या अधिकाऱ्यांनी कामासाठीची आवश्यक प्रमाण वेळ व काम पूर्ण करण्याची प्रमाण वेळ याची योग्य समज कर्मचाऱ्यांना दिली नाही.

प्र. १० पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (गुण-४)
१)      फेयॉल यांच्या व्यवस्थापनाची कोणतीही पाच तत्त्वे स्पष्ट करा.
उत्तर :
) कामाच्या विभागणीचे तत्त्व : या तत्त्वानुसार, संपूर्ण काम एकाच व्यक्तीच्या हाती सोपवण्याऐवजी, त्या संपूर्ण कामाची छोट्या छोट्या भागांमध्ये जसे, तांत्रिक, आर्थिक, व्यापारविषयक, लेखाविषयक, व्यवस्थापन, सुरक्षा विभागणी करून प्रत्येक भाग हा त्या कर्मचाऱ्याच्या कुवतीनुसार, पात्रतेनुसार व अनुभवानुसार सोपवला जातो. या तंत्रामुळे विशेषीकरणाचे सर्व फायदे संघटनेला मिळतात. कर्मचारी त्या त्या विषयांमध्ये तज्ज्ञ व कार्यक्षम होतात. त्यामुळे उच्च उत्पादनक्षमता संघटनेला प्राप्त होते.
)अधिकार व जबाबदारीचे तत्त्व : निर्णय घेण्याची ताकद किंवा हक्क, स्वातंत्र्य म्हणजे अधिकार आणि जबाबदारी म्हणजे दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याचे बंधन किंवा कर्तव्य होय. व्यवस्थापकाला आवश्यक ते अधिकार दिले, तर तो आपली कामे आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थितपणे करून घेईल. योग्य जबाबदारी न सोपवता जादा अधिकार दिले गेले, तर त्याचे नकारार्थी परिणाम समोर येतात. याउलट योग्य अधिकार न देता, जादा जबाबदारी सोपवली, तर कामगार त्यांना सोपवलेले काम वेळेत पूर्ण करू शकत नाही. म्हणून व्यवस्थापकाला योग्य अधिकार व संतुलित जबाबदारी देणे आवश्यक आहे.
) शिस्तीचे तत्त्व : फेयॉलच्या मते, शिस्त म्हणजे कामाशी आणि उपक्रमाशी सर्वांचा प्रामाणिकपणा होय. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे होय. संघटनेच्या यशासाठी, तसेच संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व संघटनेच्या भरभराटीसाठी नियमांचे पालन करणे व शिस्त राखणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे. व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर शिस्त राखणे गरजेचे आहे.
) आदेशातील एकवाक्यतेचे तत्त्व : या तत्त्वानुसार व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्याने फक्त एका वरिष्ठाकडून आदेश व सूचना स्वीकाराव्यात व तो फक्त त्या एका वरिष्ठाला उत्तरदायी असावा. जर त्या कर्मचाऱ्याने एकापेक्षा जास्त वरिष्ठांच्या सूचना किंवा आदेश स्वीकारले, तर कोणत्या आदेशाची कार्यवाही प्रथम करावी हे त्याला समजणार नाही. त्यामुळे हा दृष्टिकोन योग्य नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचा अहंकार दुखावण्याची व मतभेद वाढण्याची शक्यता असते. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा आदेशकर्ता अधिकारी कोण याची स्पष्ट जाणीव असावी व त्याच्याचकडून आदेश मिळावेत.
) निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्त्व : फेयॉलने ‘एक प्रमुख एक योजना’ या धोरणाचे समर्थन केले आहे. याचा अर्थ, एका विशिष्ट योजनेवरील सामूहिक प्रयत्नांना फक्त एकाच व्यक्तीचे मार्गदर्शन मिळावे. जर हे तत्त्व अमलात आणले, तर प्रत्येकाचे श्रम आणि शक्ती यांचे प्रभावी सुसूत्रीकरण वा समन्वय होईल. विविध विभागांची उद्दिष्टे, संघटनेच्या एकूण उद्दिष्टांना मिळती जुळती असावीत.
) सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्त्व : या तत्त्वानुसार कामगारांच्या वैयक्तिक हितापेक्षा संघटनेचे हित महत्त्वाचे मानले गेले पाहिजे. संघटनेमध्ये निर्णय घेताना व्यवस्थापकाने नेहमीच संपूर्ण समूहाच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले पाहिजेत. संघटनेच्या सर्वसाधारण हितापुढे सेवकवर्गाने आपल्या हितांचे समर्पण (Surrender) केले पाहिजे. संघटनेची भरभराट झाल्यास स्वाभाविकच कर्मचाऱ्यांची भरभराट होणार असते. उदा., क्रिकेटमध्ये सर्व खेळाडूंनी संघ विजयी व्हावा म्हणून प्रयत्न केले पाहिजे, ना की वैयक्तिक खेळाची नोंद करण्यासाठी.
) शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कोणत्याही चार तंत्राचे वर्णन करा.
उत्तर : १) कार्य अभ्यास (Work Study) : उपलब्ध कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप करण्यापूर्वी व्यवस्थापनाकडून कार्याचा पद्धतशीर अभ्यास होणे अत्यंत आवश्यक आहे. कार्य अभ्यासामध्ये विविध कृतींचे संघटित, पद्धतशीर व टिकात्मक मूल्यमापन होणे आवश्यक आहे. कार्यअभ्यासाचे मूल्यमापन (अ) वेळ अभ्यास (ब) पद्धत अभ्यास (क) हालचाल अभ्यास व (ड) थकवा अभ्यास यांवर आधारित असते.
(अ) वेळ अभ्यास (Time Study) : या पद्धतीनुसार व्यवस्थापक एखादे विशिष्ट कार्य किंवा हाती घेतलेले एखादे काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्याला किती वेळ लागतो याचे निरीक्षण करून ठरवत असतो. या तंत्रामुळे विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट प्रकारचे काम पूर्ण करण्यासाठी लागणारी प्रमाणवेळ निश्चित करता येते. तसेच या तंत्रामुळे कर्मचाऱ्याची कार्यक्षमता निश्चित करता येते व कार्यासाठी होणाऱ्या खर्चावरही नियंत्रण ठेवता येते.
(ब) पद्धत अभ्यास (Method Study) : एखादे विशिष्ट कार्य कोणत्या पद्धतीने पूर्ण करावयाचे, ती पद्धत निश्चित करणे हे एक व्यवस्थापकासमोरचे आव्हानात्मक काम असते. (कार्यपूर्तीच्या) अनेक पद्धतीतून खर्चाची परिणामकारकता व उत्पादनाचा उत्कृष्ट दर्जा मिळेल अशी पदधत निश्चित करावी लागते. वेळेचा अपव्यय होऊ न देता व कच्च्या मालाचे नुकसान न होता, साधन- सामग्रीचा पर्याप्त वापर करून उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करेल अशी पद्धत व्यवस्थापकाला कार्यान्वीत करावयाची असते. अशा पद्धतीमुळे कच्च्या मालाची साठवणूक, हाताळणी, परिक्षण व वाहतूक याही
समस्यांचे निराकरण होणे आवश्यक असते.
)हालचाल अभ्यास (Motion Study) : हालचाल अभ्यास हा कर्मचाऱ्यांच्या कार्य करीत असताना होणाऱ्या हालचालींचा बारकाईने होणारा अभ्यास आहे. तसेच ज्या यंत्रावर काम चालू आहे त्या यंत्राच्याही हालचालींचा अभ्यास आहे. या तंत्राच्या उपयोगामुळे व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांच्या तसेच यंत्राच्या अनावश्यक हालचाली कमी करून विशिष्ट कार्य पूर्ण करण्याची उत्कृष्ट पद्धत निश्चित करता येते. या अभ्यासामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढण्यास मदत होते. या पद्धतीमुळे कार्याचा प्रवाह व त्यामधील अडथळे लक्षात येतात. अडथळे दूर करून कार्य सुरळीत चालण्यासाठी उपाय योजता येतात.
(ड) थकवा अभ्यास (Fatigue Study) : अतिपरिश्रमामुळे शारीरिक व मानसिक दौर्बल्य जाणवते, यालाच थकवा म्हणतात. सर्व साधारणपणे कामाचा अतिरिक्त ताण, कामाच्या तासांमध्ये ठरावीक वेळेनंतर विश्रांतीचा अभाव, अवजड साधने, उद्दिष्ट पूर्तीचा ताण, आजूबाजूचे दूषित वातावरण इत्यादींमुळे कर्मचाऱ्यांना थकवा जाणवतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होते व त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना थकवा जाणवणार नाही यासाठी उपाययोजना आखल्या पाहिजेत व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल असे नियोजन केले पाहिजे.
) साधने व उपकरणांचे मानकीकरण : टेलर यांनी कामाच्या ठिकाणी जे विविध प्रयोग केले, त्या आधारे असे सूचित केले आहे की, कामगारांना प्रमाणित उपकरणे व साधनसामग्री पुरवली पाहिजे, कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्मिती केली पाहिजे व योग्य उत्पादन (कार्यपद्धती) पद्धत असणे आवश्यक आहे. या तंत्राचा अवलंब केल्यास कच्च्या मालाचे नुकसान व अपव्यय टळेल, उत्पादन खर्च कमी होईल, कर्मचाऱ्यांचा थकवा कमी होईल व त्यामुळेच कामाचा दर्जा सुधारेल.
) वैज्ञानिक कार्यरचना : टेलर यांनी कामगारांच्या कामाच्या दैनिक (Day work) नियोजनावर विशेष भर दिला आहे. शास्त्रीय पद्धतीने आपल्या कामाचे उद्दिष्ट निश्चित केल्यास कामगारांना त्यांच्या क्षमतेनुसार काम पूर्ण करता येते व क्षमतेपेक्षा कमी काम त्यांच्याकडून होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या क्षमतेवर व्यवस्थापनाला योग्य नियंत्रण राखता येईल. एकूण कर्मचाऱ्याकडून अपेक्षित ‘प्रमाण काम’ वैज्ञानिक कार्यरचनेमुळे शक्य होते व त्यांच्या पर्याप्त कार्यक्षमतेचा उपयोग संघटनेला होतो.
) वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण : शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तंत्रानुसार योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे व्यवस्थापनाला शक्य होते. या तंत्रानुसार व्यवस्थापनाला प्रथम कार्याचा तपशील निश्चित करावा लागतो. तसेच त्या कार्याच्या पूर्तीसाठी या अगोदर निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे, नि:पक्षपातीपणे कर्मचाऱ्याची निवड करावी लागते. कर्मचाऱ्यांची निवड झाल्यानंतर व्यवस्थापनाला कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी योग्य प्रशिक्षण कार्यक्रमांची योजना करावी लागते.
) कार्यात्मक संस्था : टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तंत्रानुसार कामाचे नियोजन हे स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जावे व कामाची अंमलबजावणी व त्यावरील नियंत्रण हे स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जावे असे सुचवण्यात आले आहे. उत्पादन करणाऱ्या कामगाराचे दोन भिन्न यंत्रणे (अधिकाऱ्यां) कडून परिक्षण केले जावे. उत्पादन कार्याचे परिक्षण करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेलर यांनी एकूण आठ फोरमन (Supervisors) ची शिफारस केली आहे. ते पुढीलप्रमाणे-
      (अ) नियोजन स्तर :
(१) मार्ग कारकून : काम एका मशिनवरून दुसऱ्या मशिनवर कसे सरकते हे तो सांगतो.
(२) सूचना कारकून : काम कशा पद्धतीने पूर्ण करायचे याच्या सूचना देतो. 
(३) वेळ/किंमत व खर्च कारकून : काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षित वेळ तो सांगतो; तसेच कामासाठी एकूण खर्चाचा तपशील निश्चित करतो.
(४) शिस्त : सर्व कामगार दिलेल्या सूचनांनुसार व नियमांनुसार काम पूर्ण करीत आहेत की नाही यावर नियंत्रण ठेवतो.
    (ब) अंमलबजावणी स्तर :
(१) गँग (गट) प्रमुख : आपल्या नियंत्रणाखालील कामगारांकडून प्रत्यक्ष काम करून घेतो.
(२) वेग प्रमुख : सर्व कामगार ठरलेल्या वेळेत काम करीत आहेत ना यावर देखरेख ठेवतो.
(३) दुरुस्ती प्रमुख : सर्व यंत्रांची देखभाल ठेवणे व कर्मचाऱ्यांची सुरक्षा यावर लक्ष ठेवतो.
(४) निरीक्षक : मानकांनुसार (standard fixed) निश्चित केल्याप्रमाणे कार्यपूर्तीची शाश्वती देतो.
) विभेदात्मक दर वेतन योजना : टेलर यांच्या मतानुसार कार्यक्षम आणि अकार्यक्षम कामगारांमध्ये भेद केला पाहिजे. कार्यक्षम कामगारांना जास्त वेतन, तर अकार्यक्षम कामगारांना कमी वेतन दिले पाहिजे. मात्र हे तंत्र अवलंबिले जाताना अगोदर उत्पादनाचे प्रमाण निश्चित केले पाहिजे. जे कामगार निश्चित प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन करतील त्यांना जास्त वेतन, तर जे कामगार निश्चित प्रमाणापेक्षा कमी उत्पादन करतील त्यांना दंड म्हणून कमी वेतन दिले जाईल. टेलर यांच्या या पद्धतीमुळे जे कामगार कार्यक्षम आहेत त्यांना उत्तेजन मिळते व जे कामगार अकार्यक्षम आहेत त्यांना त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

प्र.११. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा( गुण-४)
(१) व्यवस्थापनाची तत्त्वे लवचीक असतात.
उत्तर : (१) व्यवस्थापकीय निर्णयप्रक्रियांसाठी आणि कृतींसाठी मार्गदर्शक ठरणारी मूलभूत सत्याची विधाने म्हणजे ‘व्यवस्थापन तत्त्वे’ होत. ही तत्त्वे कारण-परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. ही तत्त्वे निरीक्षण, विश्लेषण व प्रयोगांच्या माध्यमांतून विकसित होतात.
(२) व्यवस्थापनाची तत्त्वे जरी मूलभूत सत्याची विधाने असली, तरी ती साचेबंद विधाने नसतात. ती परिस्थितीनुसार व संघटनेच्या आवश्यकतेनुसार बदलू शकतात. त्यामुळे ती लवचीक स्वरूपाची असतात. व्यवस्थापक संघटनेच्या आवश्यकतेनुसार ती तत्त्वे काही प्रमाणात बदलू शकतात.
(३) व्यवस्थापनाची तत्त्वे ही लवचीक मार्गदर्शक तत्त्वे असतात. व्यवसायाचे स्वरूप, आकारमान, स्पर्धात्मक परिस्थिती इत्यादी घटकांनुसार त्यात बदल करण्यास बराच मोठा वाव असतो. उदा. आधुनिक व्यवसायाच्या संदर्भात कौटुंबिक व्यवस्थापनाची जागा आता व्यावसायिक व्यवस्थापनाने घेतली आहे.
(४)आधुनिक व्यवसाय जग हे गतिमान आहे. व्यवसाय संघटनेतील परिस्थिती सतत बदलत असते. व्यवसाय संघटनेच्या बदलत्या गरजा व आवश्यकतेप्रमाणे व्यवस्थापक व्यवस्थापन तत्त्वे बदलू शकतात व त्यात तडजोड करू शकतात. तसेच त्या तत्त्वाची फेरफारही करू शकतात.
(२) संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्त्वांचा उपयोग होतो.
उत्तर : (१) व्यवसाय संघटन ज्या साधनांचा किंवा घटकांचा उपयोग आपला व्यवसाय चालवण्यासाठी करते, अशा सर्व घटकांना संसाधने म्हणतात. उदा.कच्चा माल, उपकरणे, यंत्रसामग्री, वेळ, मनुष्यबळ, जागा, इमारत इत्यादी प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये दोन प्रकारच्या संसाधनांचा मुख्यतः उपयोग केला जातो : (अ) भौतिक संसाधने (ब) मानवी संसाधने (मनुष्यबळ).
() विविध प्रकारच्या वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी विविध प्रकारची संसाधने संघटनेमार्फत वापरली जातात. संसाधने ही दुर्मीळ असतात. मागणीच्या प्रमाणात ती उपलब्ध नसतात; म्हणून ती काळजीपूर्वक वापरणे, वाया न घालवणे आवश्यक असते. पर्याप्त क्षमतेपर्यंत त्यांचा (पुरेपूर) वापर होणे आवश्यक असते. व्यवस्थापनांचे मुख्य कार्य (ध्येय) उपलब्ध संसाधनांचा अधिकतम व संघटनेच्या हितासाठी वापर होईल हे पाहणे आवश्यक असते.
 () संसाधनांची नासाडी होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक असते व त्यासाठी व्यवस्थापनाची विविध तंत्रे व तत्त्वे यांचा योग्य वापर जपून व करणे आवश्यक असते. कार्यामध्ये शिस्त व संघटनेतील पोषक पर्यावरण  निर्माण करणे व्यवस्थापनाला गरजेचे असते. व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये परस्पर सहकार्याचे संबंध निर्माण झाले पाहिजेत, 
(४) शिस्तीचे तत्त्व, सुव्यवस्थेचे तत्त्व, पोषक वातावरण, समन्यायी कामाचे वाटप इत्यादींचा उपयोग करून व्यवस्थापन व कर्मचारी आपली कार्यक्षमता वाढवू शकतात. आधुनिक व प्रमाणित उपकरणे, यंत्रे यांचा उपयोग दर्जा सुधारणे, उत्पादकता वाढवणे, मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी होऊ शकतो.
(३) समानतेचे तत्त्व महत्त्वाचे आहे.
उत्तर : (१) समानतेचे तत्त्व हे हेन्री फेयॉलच्या १४ व्यवस्थापन तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे. हे तत्त्व असे नमूद करते की, मालकाने किंवा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना कनवाळू, रास्त (योग्य) न्याय्य, नि:पक्षपाती आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे, व्यवस्थापकाचे आपल्या हाताखालील सर्व कर्मचाऱ्यांप्रती दयाळू, नि:पक्षपाती व न्याय्य वर्तन असले पाहिजे.
() समानतेचे तत्त्व पुढे असे स्पष्ट करते की, कर्मचाऱ्यांमध्ये वेतन अदा करताना कोणताही भेदभाव करता कामा नये. दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये; परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन दिले पाहिजे.
() कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन हे विभागावर अवलंबून न ठेवता, ते कोणत्या पातळीवर काम करीत आहेत यावर अवलंबून असले पाहिजे. उदा., पर्यवेक्षकाला दिले जाणारे वेतन हे निश्चितच त्याच्या हाताखाली काम करणाऱ्यांच्या वेतनापेक्षा जास्त असावे.
(४)समानतेचे (समन्यायाचे) तत्त्व असेही स्पष्ट करते की, कामाची विभागणी करताना कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करता कामा नये. शक्यतो कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे समान वाटप केले पाहिजे. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे समान वाटप झाल्यास, त्यांचे मनोधैर्य व नैतिकता उंचावते. तसेच, कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेबद्दल आपलेपणा निर्माण होतो. परिणामी, संघटनेवर त्यांची निष्ठा विकसित होण्यास मदत होते.
(४) टेलर यांनी साधने व उपकरणे यांच्या मानकीकरणावर भर दिला आहे.
उत्तर : (१) इ.स. १९११ मध्ये फ्रेडरिक विनस्लॉटेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे मांडली. शास्त्रीय व्यवस्थापनाचे प्राथमिक उद्दिष्ट, कामाचे शास्त्रशुद्ध नियोजन करून कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे, हे होते. व्यवस्थापनात निर्णय घेताना आणि समस्या सोडवताना प्रयोग करून व शास्त्रीय तंत्रे वापरून त्या सोडवाव्यात असे टेलर यांचे मत होते. विज्ञान असावे; मूलभूत नियम नको.
(२) टेलर ज्या ठिकाणी काम करीत होते त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रयोग केले. या प्रयोगातून जे निष्कर्ष निघाले त्यानुसार त्यांनी उपकरणे व साधनसामग्रीचे प्रमाणीकरण याची प्रमुख सूचना केली. प्रमाणीकरण म्हणजे उच्च गुणवत्तेच्या उत्पादनासाठी प्रमाण उपकरणे वापरणे आवश्यक मानले.
(३) एफ. डब्ल्यू. टेलर यांच्या मते, कामाच्या ठिकाणचे योग्य वातावरण व उत्पादनाच्या योग्य व तंत्रशुद्ध पद्धती; तसेच प्रमाणित उपकरणे व साधनसामग्री असेल, तर मालाचा अपव्यय व नुकसान होत नाही व या सर्वांमुळे उत्पादन खर्चही कमी होतो. प्रमाणित उपकरणे व साधनसामग्री यांमुळे कामगारांची कार्यक्षमता वाढून, थकवा कमी होण्यासही मदत होते व कामाचा दर्जा सुधारतो.
(५) विभेदात्मक वेतन दर योजना आवश्यक आहे.
उत्तर : (१) एफ. डब्ल्यू. टेलर यांनी मांडलेल्या अनेक शास्त्रीय व्यवस्थापन तंत्रांपैकी कामाच्या प्रमाणानुसार वेतन भिन्नता हे एक महत्त्वाचे शास्त्रीय व्यवस्थापन तंत्र आहे. हे तंत्र असे नमूद करते की, कार्यक्षम व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये वेतन देण्याच्या संदर्भात भेद केला पाहिजे.
(२) व्यवस्थापन तज्ज्ञ प्रयोग व निरीक्षणानंतर विहित वेळेत उत्पादन प्रमाण निश्चित करतात, जे कर्मचारी प्रमाण उत्पादनापेक्षा कमी उत्पादन विहीत वेळेत करतील त्यांना कमी वेतन दिले जाते व जे कर्मचारी प्रमाण उत्पादन विहित वेळेत जास्त उत्पादन करतील त्यांना प्रोत्साहन पर जास्त वेतन दिले जाईल. या तंत्रामुळे जे कार्यक्षम असतील त्यांना अधिक वेतन व जे अकार्यक्षम असतील त्यांना कमी वेतन मिळाल्यामुळे ते त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतील.
(३) हे शास्त्रीय व्यवस्थापन तंत्र असे नमूद करते की, कार्यक्षम व अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये वेतन देण्याच्या संदर्भात भेदभाव केला पाहिजे. टेलर पुढे असे स्पष्ट करतात की, अकार्यक्षम कर्मचाऱ्याला दिल्या जाणाऱ्या वेतनाच्या तुलनेत कार्यक्षम कर्मचाऱ्याला जास्त वेतन दिले पाहिजे.
(४) अशा प्रकारे विभेदात्मक वेतन दर योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणारी योजना आहे. कामगारांनी आपली कार्यक्षमता व उत्पादकता वाढवल्यास अधिक दराने वेतन मिळण्याची खात्री त्यांना असते.

प्रश्न १२. पुढील प्रश्नाची उत्तरे संवित्तर लिहा.(गुण-५)
१) शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कोणत्याही चार तंत्राचे वर्णन करा.
उत्तर : १) कार्य अभ्यास (Work Study) : उपलब्ध कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप करण्यापूर्वी व्यवस्थापनाकडून कार्याचा पद्धतशीर अभ्यास होणे अत्यंत आवश्यक आहे. कार्य अभ्यासामध्ये विविध कृतींचे संघटित, पद्धतशीर व टिकात्मक मूल्यमापन होणे आवश्यक आहे. कार्यअभ्यासाचे मूल्यमापन (अ) वेळ अभ्यास (ब) पद्धत अभ्यास (क) हालचाल अभ्यास व (ड) थकवा अभ्यास यांवर आधारित असते.
(अ) वेळ अभ्यास (Time Study) : या पद्धतीनुसार व्यवस्थापक एखादे विशिष्ट कार्य किंवा हाती घेतलेले एखादे काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्याला किती वेळ लागतो याचे निरीक्षण करून ठरवत असतो. या तंत्रामुळे विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट प्रकारचे काम पूर्ण करण्यासाठी लागणारी प्रमाणवेळ निश्चित करता येते. तसेच या तंत्रामुळे कर्मचाऱ्याची कार्यक्षमता निश्चित करता येते व कार्यासाठी होणाऱ्या खर्चावरही नियंत्रण ठेवता येते.
(ब) पद्धत अभ्यास (Method Study) : एखादे विशिष्ट कार्य कोणत्या पद्धतीने पूर्ण करावयाचे, ती पद्धत निश्चित करणे हे एक व्यवस्थापकासमोरचे आव्हानात्मक काम असते. (कार्यपूर्तीच्या) अनेक पद्धतीतून खर्चाची परिणामकारकता व उत्पादनाचा उत्कृष्ट दर्जा मिळेल अशी पदधत निश्चित करावी लागते. वेळेचा अपव्यय होऊ न देता व कच्च्या मालाचे नुकसान न होता, साधन- सामग्रीचा पर्याप्त वापर करून उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करेल अशी पद्धत व्यवस्थापकाला कार्यान्वीत करावयाची असते. अशा पद्धतीमुळे कच्च्या मालाची साठवणूक, हाताळणी, परिक्षण व वाहतूक याही
समस्यांचे निराकरण होणे आवश्यक असते.
क) हालचाल अभ्यास (Motion Study) : हालचाल अभ्यास हा कर्मचाऱ्यांच्या कार्य करीत असताना होणाऱ्या हालचालींचा बारकाईने होणारा अभ्यास आहे. तसेच ज्या यंत्रावर काम चालू आहे त्या यंत्राच्याही हालचालींचा अभ्यास आहे. या तंत्राच्या उपयोगामुळे व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांच्या तसेच यंत्राच्या अनावश्यक हालचाली कमी करून विशिष्ट कार्य पूर्ण करण्याची उत्कृष्ट पद्धत निश्चित करता येते. या अभ्यासामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढण्यास मदत होते. या पद्धतीमुळे कार्याचा प्रवाह व त्यामधील अडथळे लक्षात येतात. अडथळे दूर करून कार्य सुरळीत चालण्यासाठी उपाय योजता येतात.
(ड) थकवा अभ्यास (Fatigue Study) : अतिपरिश्रमामुळे शारीरिक व मानसिक दौर्बल्य जाणवते, यालाच थकवा म्हणतात. सर्व साधारणपणे कामाचा अतिरिक्त ताण, कामाच्या तासांमध्ये ठरावीक वेळेनंतर विश्रांतीचा अभाव, अवजड साधने, उद्दिष्ट पूर्तीचा ताण, आजूबाजूचे दूषित वातावरण इत्यादींमुळे कर्मचाऱ्यांना थकवा जाणवतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होते व त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना थकवा जाणवणार नाही यासाठी उपाययोजना आखल्या पाहिजेत व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल असे नियोजन केले पाहिजे.
२) साधने व उपकरणांचे मानकीकरण : टेलर यांनी कामाच्या ठिकाणी जे विविध प्रयोग केले, त्या आधारे असे सूचित केले आहे की, कामगारांना प्रमाणित उपकरणे व साधनसामग्री पुरवली पाहिजे, कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्मिती केली पाहिजे व योग्य उत्पादन (कार्यपद्धती) पद्धत असणे आवश्यक आहे. या तंत्राचा अवलंब केल्यास कच्च्या मालाचे नुकसान व अपव्यय टळेल, उत्पादन खर्च कमी होईल, कर्मचाऱ्यांचा थकवा कमी होईल व त्यामुळेच कामाचा दर्जा सुधारेल.
३) वैज्ञानिक कार्यरचना : टेलर यांनी कामगारांच्या कामाच्या दैनिक (Day work) नियोजनावर विशेष भर दिला आहे. शास्त्रीय पद्धतीने आपल्या कामाचे उद्दिष्ट निश्चित केल्यास कामगारांना त्यांच्या क्षमतेनुसार काम पूर्ण करता येते व क्षमतेपेक्षा कमी काम त्यांच्याकडून होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या क्षमतेवर व्यवस्थापनाला योग्य नियंत्रण राखता येईल. एकूण कर्मचाऱ्याकडून अपेक्षित ‘प्रमाण काम’ वैज्ञानिक कार्यरचनेमुळे शक्य होते व त्यांच्या पर्याप्त कार्यक्षमतेचा उपयोग संघटनेला होतो.
४) वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण : शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तंत्रानुसार योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे व्यवस्थापनाला शक्य होते. या तंत्रानुसार व्यवस्थापनाला प्रथम कार्याचा तपशील निश्चित करावा लागतो. तसेच त्या कार्याच्या पूर्तीसाठी या अगोदर निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे, नि:पक्षपातीपणे कर्मचाऱ्याची निवड करावी लागते. कर्मचाऱ्यांची निवड झाल्यानंतर व्यवस्थापनाला कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी योग्य प्रशिक्षण कार्यक्रमांची योजना करावी लागते.
५) कार्यात्मक संस्था : टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तंत्रानुसार कामाचे नियोजन हे स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जावे व कामाची अंमलबजावणी व त्यावरील नियंत्रण हे स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जावे असे सुचवण्यात आले आहे. उत्पादन करणाऱ्या कामगाराचे दोन भिन्न यंत्रणे (अधिकाऱ्यां) कडून परिक्षण केले जावे. उत्पादन कार्याचे परिक्षण करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेलर यांनी एकूण आठ फोरमन (Supervisors) ची शिफारस केली आहे. ते पुढीलप्रमाणे-
(अ) नियोजन स्तर :
(१) मार्ग कारकून : काम एका मशिनवरून दुसऱ्या मशिनवर कसे सरकते हे तो सांगतो.
(२) सूचना कारकून : काम कशा पद्धतीने पूर्ण करायचे याच्या सूचना देतो. 
(३) वेळ/किंमत व खर्च कारकून : काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षित वेळ तो सांगतो; तसेच कामासाठी एकूण खर्चाचा तपशील निश्चित करतो.
 (४) शिस्त : सर्व कामगार दिलेल्या सूचनांनुसार व नियमांनुसार काम पूर्ण करीत आहेत की नाही यावर नियंत्रण ठेवतो.
(ब) अंमलबजावणी स्तर :
(१) गँग (गट) प्रमुख : आपल्या नियंत्रणाखालील कामगारांकडून प्रत्यक्ष काम करून घेतो.
(२) वेग प्रमुख : सर्व कामगार ठरलेल्या वेळेत काम करीत आहेत ना यावर देखरेख ठेवतो.
(३) दुरुस्ती प्रमुख : सर्व यंत्रांची देखभाल ठेवणे व कर्मचाऱ्यांची सुरक्षा यावर लक्ष ठेवतो.
(४) निरीक्षक : मानकांनुसार (standard fixed) निश्चित केल्याप्रमाणे कार्यपूर्तीची शाश्वती देतो.
(५ ) विभेदात्मक दर वेतन योजना : टेलर यांच्या मतानुसार कार्यक्षम आणि अकार्यक्षम कामगारांमध्ये भेद केला पाहिजे. कार्यक्षम कामगारांना जास्त वेतन, तर अकार्यक्षम कामगारांना कमी वेतन दिले पाहिजे. मात्र हे तंत्र अवलंबिले जाताना अगोदर उत्पादनाचे प्रमाण निश्चित केले पाहिजे. जे कामगार निश्चित प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन करतील त्यांना जास्त वेतन, तर जे कामगार निश्चित प्रमाणापेक्षा कमी उत्पादन करतील त्यांना दंड म्हणून कमी वेतन दिले जाईल. टेलर यांच्या या पद्धतीमुळे जे कामगार कार्यक्षम आहेत त्यांना उत्तेजन मिळते व जे कामगार अकार्यक्षम आहेत त्यांना त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
२)     फेयॉल यांच्या व्यवस्थापनाची कोणतीही पाच तत्त्वे स्पष्ट करा.
उत्तर :
) कामाच्या विभागणीचे तत्त्व : या तत्त्वानुसार, संपूर्ण काम एकाच व्यक्तीच्या हाती सोपवण्याऐवजी, त्या संपूर्ण कामाची छोट्या छोट्या भागांमध्ये जसे, तांत्रिक, आर्थिक, व्यापारविषयक, लेखाविषयक, व्यवस्थापन, सुरक्षा विभागणी करून प्रत्येक भाग हा त्या कर्मचाऱ्याच्या कुवतीनुसार, पात्रतेनुसार व अनुभवानुसार सोपवला जातो. या तंत्रामुळे विशेषीकरणाचे सर्व फायदे संघटनेला मिळतात. कर्मचारी त्या त्या विषयांमध्ये तज्ज्ञ व कार्यक्षम होतात. त्यामुळे उच्च उत्पादनक्षमता संघटनेला प्राप्त होते.
)अधिकार व जबाबदारीचे तत्त्व : निर्णय घेण्याची ताकद किंवा हक्क, स्वातंत्र्य म्हणजे अधिकार आणि जबाबदारी म्हणजे दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याचे बंधन किंवा कर्तव्य होय. व्यवस्थापकाला आवश्यक ते अधिकार दिले, तर तो आपली कामे आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थितपणे करून घेईल. योग्य जबाबदारी न सोपवता जादा अधिकार दिले गेले, तर त्याचे नकारार्थी परिणाम समोर येतात. याउलट योग्य अधिकार न देता, जादा जबाबदारी सोपवली, तर कामगार त्यांना सोपवलेले काम वेळेत पूर्ण करू शकत नाही. म्हणून व्यवस्थापकाला योग्य अधिकार व संतुलित जबाबदारी देणे आवश्यक आहे.
) शिस्तीचे तत्त्व : फेयॉलच्या मते, शिस्त म्हणजे कामाशी आणि उपक्रमाशी सर्वांचा प्रामाणिकपणा होय. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे होय. संघटनेच्या यशासाठी, तसेच संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व संघटनेच्या भरभराटीसाठी नियमांचे पालन करणे व शिस्त राखणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे. व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर शिस्त राखणे गरजेचे आहे.
) आदेशातील एकवाक्यतेचे तत्त्व : या तत्त्वानुसार व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्याने फक्त एका वरिष्ठाकडून आदेश व सूचना स्वीकाराव्यात व तो फक्त त्या एका वरिष्ठाला उत्तरदायी असावा. जर त्या कर्मचाऱ्याने एकापेक्षा जास्त वरिष्ठांच्या सूचना किंवा आदेश स्वीकारले, तर कोणत्या आदेशाची कार्यवाही प्रथम करावी हे त्याला समजणार नाही. त्यामुळे हा दृष्टिकोन योग्य नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचा अहंकार दुखावण्याची व मतभेद वाढण्याची शक्यता असते. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा आदेशकर्ता अधिकारी कोण याची स्पष्ट जाणीव असावी व त्याच्याचकडून आदेश मिळावेत.
) निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्त्व : फेयॉलने ‘एक प्रमुख एक योजना’ या धोरणाचे समर्थन केले आहे. याचा अर्थ, एका विशिष्ट योजनेवरील सामूहिक प्रयत्नांना फक्त एकाच व्यक्तीचे मार्गदर्शन मिळावे. जर हे तत्त्व अमलात आणले, तर प्रत्येकाचे श्रम आणि शक्ती यांचे प्रभावी सुसूत्रीकरण वा समन्वय होईल. विविध विभागांची उद्दिष्टे, संघटनेच्या एकूण उद्दिष्टांना मिळती जुळती असावीत.
) सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्त्व : या तत्त्वानुसार कामगारांच्या वैयक्तिक हितापेक्षा संघटनेचे हित महत्त्वाचे मानले गेले पाहिजे. संघटनेमध्ये निर्णय घेताना व्यवस्थापकाने नेहमीच संपूर्ण समूहाच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले पाहिजेत. संघटनेच्या सर्वसाधारण हितापुढे सेवकवर्गाने आपल्या हितांचे समर्पण (Surrender) केले पाहिजे. संघटनेची भरभराट झाल्यास स्वाभाविकच कर्मचाऱ्यांची भरभराट होणार असते. उदा., क्रिकेटमध्ये सर्व खेळाडूंनी संघ विजयी व्हावा म्हणून प्रयत्न केले पाहिजे, ना की वैयक्तिक खेळाची नोंद करण्यासाठी.
(३) शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे सांगा.
उत्तर : शास्त्रीय व्यवस्थापन तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत :
()शास्त्रीय व्यवस्थापन विज्ञान आहे, विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही : मूलभूत नियम हे व्यवस्थापकाचे त्याला व्यक्तिगत आलेल्या अनुभवावर आधारित असतात. या तत्त्वानुसार मात्र व्यवस्थापकाने व्यवसाय संघटनेतील कर्मचाऱ्याची प्रत्येक कृती अथवा कार्य निश्चित करताना शास्त्रीय पद्धत वापरली पाहिजे, ना कि मूलभूत नियम. त्यामुळे संघटनेची कार्यक्षमता वाढीस लागते. प्रत्येक छोट्या, छोट्या कार्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला पाहिजे यावर टेलर यांनी भर दिलेला आहे. या तत्त्वानुसार कर्मचाऱ्यांच्या हालचालींचे निरीक्षण करून प्रत्येक कृतीला किती वेळ लागतो त्याची नोंद केली जाते. तसेच एका दिवसाच्या कामाच्या कालावधीमध्ये कर्मचारी किती काम करू शकतो, काम करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग कोणता हे शोधून काढले जाते. कार्य पूर्ण करण्यासाठी पद्धतशीर माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे व निष्कर्ष काढणे ही पद्धत विकसित केली जाते. या पद्धतीमुळे वेळेची बचत होते व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून प्रमाण उत्पादनात वाढ होते.
(२) समरसता आहे, विवाद नाही : या तत्त्वानुसार प्रत्येक संघटन प्रकारामध्ये कर्मचारी कर्मचारी व व्यवस्थापनातील अधिकारी यांच्यात एकजिनसीपणा व परस्पर समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे.एकजिनसीपणा व योग्य समन्वय असेल, तर कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्मिती होते व संघटनेचे अपेक्षित ध्येय सहज प्राप्त करता येते. त्यामुळे संघटनेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या फायदयाचा व त्यांच्या विकासाचा व्यवस्थापन विचार करू शकते.ध्येय निश्चित वेळेत प्राप्त करता येते व उत्पादकता वाढते, तसेच नफ्याचे प्रमाणही वाढते.
(४) सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही : या तत्त्वानुसारटेलर यांनी व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामधील परस्पर सहकार्यालाखूप महत्त्व दिले आहे. एकमेकांचे पूर्ण सहकार्य असेल, तर परस्परविश्वास निर्माण होतो,समूह प्रेरणा वाढते. आपापसात सहकार्य असेल,तर द्वेष भावना कमी होऊन आपापसात स्पर्धेला वाव राहत नाही वकामाचे पोषक वातावरण निर्माण होते. सहकार्य असल्यामुळे व्यवस्थापनानेकेलेल्या प्रत्येक असेमानले पाहिजे. व्यवस्थापन व कर्मचारी दोघांनीही आपण संघटनेचे मुख्य(खांब), आधार आहोत असे मानले पाहिजे. कर्मचाऱ्यांनीही आपल्या अवास्तव मागण्या पुढे करून संप, हरताळ यासारखे मार्ग अवलंबू नयेत.
(५) जबाबदारीचे विभाजन : हे तत्त्व असे सूचवते की,व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे विभाजन करताना, जबाबदारीची-सुद्धा विभागणी करणे आवश्यक आहे. नियोजनाचे मुख्य कार्य उच्च व मध्यम स्तरावरील अधिकाऱ्यांकडून केले जाते व कर्मचारी त्याची अंमलबजावणी करीत असतात. आपल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार आपले काम पूर्ण करीत असतात. वरिष्ठ व्यवस्थापकांनी काम करून घेत असताना कर्मचाऱ्यांना मदत करणे, प्रोत्साहन देणे, मार्गदर्शन करणे आवश्यक असते.
(६) अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास : शास्त्रीय व्यवस्थापनाचा उद्देश मालक आणि कर्मचाऱ्यांचा कमाल उत्कर्ष व्हावा असा असतो. कोणत्याही संघटनेची कार्यक्षमता व नफा वृद्धी कर्मचाऱ्यांच्या बुद्धीचातुर्यावर, कार्यक्षमतेवर, कौशल्यावर अवलंबून असते. कर्मचाऱ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होण्यासाठी ठरावीक कालावधीनंतर कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांचे ज्ञान अद्ययावत असेल, तर त्यांची कार्यक्षमता वाढते व त्यामुळे नफावृद्धी होते व त्यातूनच मालक व कर्मचाऱ्यांचा उत्कर्ष शक्य होतो.
(४) व्यवस्थापनाच्या तत्त्वांचे स्वरूप सांगा.
उत्तर : व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप (वैशिष्ट्ये) पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील :
) सार्वत्रिक उपयोग : व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप सार्वत्रिक आहे. संघटनेचा प्रकार, आकार, स्वरूप कसेही असले, तरी सर्व संघटनांना व्यवस्थापनाची तत्त्वे लागू होतात. उदा., सरकारी संस्था,महाविद्यालये, दवाखाने, व्यापारी व्यवसाय संघटना, बँका इत्यादी.त्यांच्या उपयोजनात योग्य ते फेरबदल होऊ शकतील, परंतु सर्व प्रकारच्या संघटनांसाठी ही तत्त्वे उपयुक्त असतात. तसेच व्यवस्थापकांची तत्त्वे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांसाठी समान उपयुक्त असतात. उदा., ‘श्रम विभागणीचे तत्त्व’ सर्व संघटनांसाठी लागू पडते.
(२) सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे : संघटनेमध्ये उद्भवणाऱ्या समस्या, संघटनां अंतर्गत विपरीत परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी व्यवस्थापनाची तत्त्वे मार्गदर्शक ठरतात. संघटनेची स्थिती, आकारमान, स्वरूप यांनुसार तत्त्वांचा कसा वापर करावयाचा हे अवलंबून असते. उदा., कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा रास्त व वाजवी मोबदला दयावा. हे तत्त्व संघटनेच्या आर्थिक सदयस्थिती, आकार, स्वरूप यांवर अवलंबून असते. रास्त व वाजवी मोबदला हे वेगवेगळ्या संघटनेनुसार वेगवेगळे असू शकते.
() सराव व प्रयोगाद्वारे तत्त्वे तयार केली जातात : व्यवस्थापनाची तत्त्वे सततचे निरीक्षण, प्रयोग, संशोधन कार्य यांच्या पद्धतशीर प्रयत्नांतून विकसित होतात. व्यवस्थापन तज्ञांनी केलेल्या निरीक्षणांचा व प्रयोगांचा वापर प्रत्यक्ष व्यवस्थापन कार्यामध्ये केल्यानंतर व सिद्ध झाल्यानंतर त्यांचे ‘तत्त्वामध्ये’ रूपांतर होते.
(४) लवचीकता : व्यवस्थापनाची तत्त्वे ही साचेबंद विधाने नसून ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात लागू करावी लागतात. संघटनेच्यागरजेप्रमाणे या तत्त्वात योग्य ते बदल करणे शक्यअसते. व्यवस्थापनांची तत्त्वे ही लवचीक स्वरूपाची मार्गदर्शक तत्त्वेअसतात. व्यवसायाचे स्वरूप, आकारमान, स्पर्धात्मक परिस्थिती इत्यादीघटकानुसार त्यात बदल करण्यास बराच मोठा वाव असतो.
(५) वर्तणुकीशी संबंधित : व्यवस्थापन हे सांघिक काम व समूह कार्य असते. मानवी व इतर साधनसंपत्तीचा वापर करून संघटनेला आपली उद्दिष्टे साध्य करावयाची असतात. मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवण्याकडे व्यवस्थापनाचा कटाक्ष असल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून संघटनेला उत्तम सेवा मिळू शकतात. व्यवस्थापनाची तत्त्वे मानवी वर्तणुकीवर अपेक्षित बदल करण्यासाठी निर्माण केलेली आहेत.
(६) कार्यकारणसंबंध : व्यवस्थापन तत्त्वे ही कारण आणि परिणाम यांच्यामधील संबंध दर्शवतात. व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रत्येक तत्त्वाचा प्रभाव असतो. विभेदात्मक वेतन दर पद्धतीमध्ये अधिक उत्पन्न मिळावे, प्रोत्साहन भत्ते मिळावेत यासाठी कर्मचारीअधिक उत्पादन करतात. उत्पादन वाढते तसेच संघटनेने आपल्याउत्पादनाची प्रभावी जाहिरात केल्यास विक्रीमध्ये वाढ होऊ शकते.
(७)सर्व तत्त्वांना एकसारखे महत्त्व आहे : व्यवस्थापन सर्वतत्त्वांना व्यवस्थापन कार्यामध्ये समान महत्त्व असते. सर्व तत्त्वांचासंघटनेमध्ये समान प्रभाव असतो. कोणत्याही एका तत्त्वाला दुसऱ्या तत्त्वापेक्षा जास्त महत्त्व नसते. उदा., श्रम विभागणीचे ‘तत्त्व’ हेआदेशाची एकवाक्यता या तत्त्वापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे (किंवाउलटपक्षी) असे आपण म्हणूशकत नाही. व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप साचेबंद किंवा निरपेक्ष नसते. ही तत्त्वे शास्त्रीय तत्त्वांप्रमाणे निर्विवाद नसतात. उदा., रसायनशास्त्राचे नियम, गणिताचे नियम इत्यादी व्यवस्थापन हे सामाजिक शास्त्र आहे. व्यवसायाचा आकार, स्वरूप व गरजा लक्षात घेऊनच ही तत्त्वे लागू केली जातात. आंधळेपणाने सर्व बाबतीत ही तत्त्वे लागू केली जात नाहीत.

प्र. १३ पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : ( गुण-८)
(१) शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे कोणती? तपशीलवार सांगा.
उत्तर : शास्त्रीय व्यवस्थापनाची एफ. डब्ल्यू. टेलर यांची तंत्रे पुढीलप्रमाणे-
उत्तर : १) कार्य अभ्यास (Work Study) : उपलब्ध कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप करण्यापूर्वी व्यवस्थापनाकडून कार्याचा पद्धतशीर अभ्यास होणे अत्यंत आवश्यक आहे. कार्य अभ्यासामध्ये विविध कृतींचे संघटित, पद्धतशीर व टिकात्मक मूल्यमापन होणे आवश्यक आहे. कार्यअभ्यासाचे मूल्यमापन (अ) वेळ अभ्यास (ब) पद्धत अभ्यास (क) हालचाल अभ्यास व (ड) थकवा अभ्यास यांवर आधारित असते.
(अ) वेळ अभ्यास (Time Study) : या पद्धतीनुसार व्यवस्थापक एखादे विशिष्ट कार्य किंवा हाती घेतलेले एखादे काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्याला किती वेळ लागतो याचे निरीक्षण करून ठरवत असतो. या तंत्रामुळे विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट प्रकारचे काम पूर्ण करण्यासाठी लागणारी प्रमाणवेळ निश्चित करता येते. तसेच या तंत्रामुळे कर्मचाऱ्याची कार्यक्षमता निश्चित करता येते व कार्यासाठी होणाऱ्या खर्चावरही नियंत्रण ठेवता येते.
(ब) पद्धत अभ्यास (Method Study) : एखादे विशिष्ट कार्य कोणत्या पद्धतीने पूर्ण करावयाचे, ती पद्धत निश्चित करणे हे एक व्यवस्थापकासमोरचे आव्हानात्मक काम असते. (कार्यपूर्तीच्या) अनेक पद्धतीतून खर्चाची परिणामकारकता व उत्पादनाचा उत्कृष्ट दर्जा मिळेल अशी पदधत निश्चित करावी लागते. वेळेचा अपव्यय होऊ न देता व कच्च्या मालाचे नुकसान न होता, साधन- सामग्रीचा पर्याप्त वापर करून उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करेल अशी पद्धत व्यवस्थापकाला कार्यान्वीत करावयाची असते. अशा पद्धतीमुळे कच्च्या मालाची साठवणूक, हाताळणी, परिक्षण व वाहतूक याही
समस्यांचे निराकरण होणे आवश्यक असते.
क)हालचाल अभ्यास (Motion Study) : हालचाल अभ्यास हा कर्मचाऱ्यांच्या कार्य करीत असताना होणाऱ्या हालचालींचा बारकाईने होणारा अभ्यास आहे. तसेच ज्या यंत्रावर काम चालू आहे त्या यंत्राच्याही हालचालींचा अभ्यास आहे. या तंत्राच्या उपयोगामुळे व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांच्या तसेच यंत्राच्या अनावश्यक हालचाली कमी करून विशिष्ट कार्य पूर्ण करण्याची उत्कृष्ट पद्धत निश्चित करता येते. या अभ्यासामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढण्यास मदत होते. या पद्धतीमुळे कार्याचा प्रवाह व त्यामधील अडथळे लक्षात येतात. अडथळे दूर करून कार्य सुरळीत चालण्यासाठी उपाय योजता येतात.
(ड) थकवा अभ्यास (Fatigue Study) : अतिपरिश्रमामुळे शारीरिक व मानसिक दौर्बल्य जाणवते, यालाच थकवा म्हणतात. सर्व साधारणपणे कामाचा अतिरिक्त ताण, कामाच्या तासांमध्ये ठरावीक वेळेनंतर विश्रांतीचा अभाव, अवजड साधने, उद्दिष्ट पूर्तीचा ताण, आजूबाजूचे दूषित वातावरण इत्यादींमुळे कर्मचाऱ्यांना थकवा जाणवतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होते व त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना थकवा जाणवणार नाही यासाठी उपाययोजना आखल्या पाहिजेत व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल असे नियोजन केले पाहिजे.
२) साधने व उपकरणांचे मानकीकरण : टेलर यांनी कामाच्या ठिकाणी जे विविध प्रयोग केले, त्या आधारे असे सूचित केले आहे की, कामगारांना प्रमाणित उपकरणे व साधनसामग्री पुरवली पाहिजे, कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्मिती केली पाहिजे व योग्य उत्पादन (कार्यपद्धती) पद्धत असणे आवश्यक आहे. या तंत्राचा अवलंब केल्यास कच्च्या मालाचे नुकसान व अपव्यय टळेल, उत्पादन खर्च कमी होईल, कर्मचाऱ्यांचा थकवा कमी होईल व त्यामुळेच कामाचा दर्जा सुधारेल.
३) वैज्ञानिक कार्यरचना : टेलर यांनी कामगारांच्या कामाच्या दैनिक (Day work) नियोजनावर विशेष भर दिला आहे. शास्त्रीय पद्धतीने आपल्या कामाचे उद्दिष्ट निश्चित केल्यास कामगारांना त्यांच्या क्षमतेनुसार काम पूर्ण करता येते व क्षमतेपेक्षा कमी काम त्यांच्याकडून होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या क्षमतेवर व्यवस्थापनाला योग्य नियंत्रण राखता येईल. एकूण कर्मचाऱ्याकडून अपेक्षित ‘प्रमाण काम’ वैज्ञानिक कार्यरचनेमुळे शक्य होते व त्यांच्या पर्याप्त कार्यक्षमतेचा उपयोग संघटनेला होतो.
४) वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण : शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तंत्रानुसार योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे व्यवस्थापनाला शक्य होते. या तंत्रानुसार व्यवस्थापनाला प्रथम कार्याचा तपशील निश्चित करावा लागतो. तसेच त्या कार्याच्या पूर्तीसाठी या अगोदर निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे, नि:पक्षपातीपणे कर्मचाऱ्याची निवड करावी लागते. कर्मचाऱ्यांची निवड झाल्यानंतर व्यवस्थापनाला कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी योग्य प्रशिक्षण कार्यक्रमांची योजना करावी लागते.
५) कार्यात्मक संस्था : टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तंत्रानुसार कामाचे नियोजन हे स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जावे व कामाची अंमलबजावणी व त्यावरील नियंत्रण हे स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जावे असे सुचवण्यात आले आहे. उत्पादन करणाऱ्या कामगाराचे दोन भिन्न यंत्रणे (अधिकाऱ्यां) कडून परिक्षण केले जावे. उत्पादन कार्याचे परिक्षण करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेलर यांनी एकूण आठ फोरमन (Supervisors) ची शिफारस केली आहे. ते पुढीलप्रमाणे-
(अ) नियोजन स्तर :
(१) मार्ग कारकून : काम एका मशिनवरून दुसऱ्या मशिनवर कसे सरकते हे तो सांगतो.
(२) सूचना कारकून : काम कशा पद्धतीने पूर्ण करायचे याच्या सूचना देतो.
(३) वेळ/किंमत व खर्च कारकून : काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षित वेळ तो सांगतो; तसेच कामासाठी एकूण खर्चाचा तपशील निश्चित करतो.
(४) शिस्त : सर्व कामगार दिलेल्या सूचनांनुसार व नियमांनुसार काम पूर्ण करीत आहेत की नाही यावर नियंत्रण ठेवतो.
(ब) अंमलबजावणी स्तर :
(१) गँग (गट) प्रमुख : आपल्या नियंत्रणाखालील कामगारांकडून प्रत्यक्ष काम करून घेतो.
(२) वेग प्रमुख : सर्व कामगार ठरलेल्या वेळेत काम करीत आहेत ना यावर देखरेख ठेवतो.
(३) दुरुस्ती प्रमुख : सर्व यंत्रांची देखभाल ठेवणे व कर्मचाऱ्यांची सुरक्षा यावर लक्ष ठेवतो.
(४) निरीक्षक : मानकांनुसार (standard fixed) निश्चित केल्याप्रमाणे कार्यपूर्तीची शाश्वती देतो.
(६) विभेदात्मक दर वेतन योजना : टेलर यांच्या मतानुसार कार्यक्षम आणि अकार्यक्षम कामगारांमध्ये भेद केला पाहिजे. कार्यक्षम कामगारांना जास्त वेतन, तर अकार्यक्षम कामगारांना कमी वेतन दिले पाहिजे. मात्र हे तंत्र अवलंबिले जाताना अगोदर उत्पादनाचे प्रमाण निश्चित केले पाहिजे. जे कामगार निश्चित प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन करतील त्यांना जास्त वेतन, तर जे कामगार निश्चित प्रमाणापेक्षा कमी उत्पादन करतील त्यांना दंड म्हणून कमी वेतन दिले जाईल. टेलर यांच्या या पद्धतीमुळे जे कामगार कार्यक्षम आहेत त्यांना उत्तेजन मिळते व जे कामगार अकार्यक्षम आहेत त्यांना त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
 (२) हेन्री फेयॉल यांची व्यवस्थापनाची १४ तत्त्वे स्पष्ट करा.
उत्तर : ‘व्यवस्थापनाचे जनक’ हेन्री फेयॉल यांनी व्यवस्थापनाची १४ तत्त्वे विकसित केली ती पुढीलप्रमाणे :
 (१) कामाच्या विभागणीचे तत्त्व
(२) अधिकार आणि जबाबदारीचे तत्त्व
(३) शिस्तीचे तत्त्व
(४) आदेशातील एकवाक्यतेचे तत्त्व
(५) निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्त्व
(६) सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्त्व
(७) केंद्रीकरणाचे तत्त्व
(८) मोबदला तत्त्व
(९) अधिकार साखळीचे तत्त्व
(१०) सुव्यवस्थेचे तत्त्व
(११) समान न्यायाचे तत्त्व
(१२) कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्त्व
(१३) पुढाकार घेण्याचे तत्त्व
(१४) संघभावनेचे तत्त्व
तत्त्वे खालील प्रमाणे-
 (१) कामाच्या विभागणीचे तत्त्व : या तत्त्वानुसार, संपूर्ण काम एकाच व्यक्तीच्या हाती सोपवण्याऐवजी, त्या संपूर्ण कामाची छोट्या छोट्या भागांमध्ये जसे, तांत्रिक, आर्थिक, व्यापारविषयक, लेखाविषयक, व्यवस्थापन, सुरक्षा विभागणी करून प्रत्येक भाग हा त्या कर्मचाऱ्याच्या कुवतीनुसार, पात्रतेनुसार व अनुभवानुसार सोपवला जातो. या तंत्रामुळे विशेषीकरणाचे सर्व फायदे संघटनेला मिळतात. कर्मचारी त्या त्या विषयांमध्ये तज्ज्ञ व कार्यक्षम होतात. त्यामुळे उच्च उत्पादनक्षमता संघटनेला प्राप्त होते.
(२) अधिकार व जबाबदारीचे तत्त्व : निर्णय घेण्याची ताकद किंवा हक्क, स्वातंत्र्य म्हणजे अधिकार आणि जबाबदारी म्हणजे दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याचे बंधन किंवा कर्तव्य होय. व्यवस्थापकाला आवश्यक ते अधिकार दिले, तर तो आपली कामे आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थितपणे करून घेईल. योग्य जबाबदारी न सोपवता जादा अधिकार दिले गेले, तर त्याचे नकारार्थी परिणाम समोर येतात. याउलट योग्य अधिकार न देता, जादा जबाबदारी सोपवली, तर कामगार त्यांना सोपवलेले काम वेळेत पूर्ण करू शकत नाही. म्हणून व्यवस्थापकाला योग्य अधिकार व संतुलित जबाबदारी देणे आवश्यक आहे.
(३)शिस्तीचे तत्त्व : फेयॉलच्या मते, शिस्त म्हणजे कामाशी आणि उपक्रमाशी सर्वांचा प्रामाणिकपणा होय. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे होय. संघटनेच्या यशासाठी, तसेच संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व संघटनेच्य भरभराटीसाठी नियमांचे पालनकरणे व शिस्त राखणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी कर्मचारी वव्यवस्थापन यांच्यामध्ये उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर शिस्त राखणे गरजेचे आहे.  
(४) आदेशातील एकवाक्यतेचे तत्त्व : या तत्त्वानुसा व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्याने फक्त एका वरिष्ठाकडून आदेश व सूचना स्वीकाराव्यात व तो फक्त त्या एका वरिष्ठाला उत्तरदायी असावा. जर त्या कर्मचाऱ्याने एकापेक्षा जास्त वरिष्ठांच्या सूचना किंवा आदेश स्वीकारले, तर कोणत्या आदेशाची कार्यवाही प्रथम करावी हे  त्याला समजणार नाही. त्यामुळे हा दृष्टिकोन योग्य नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचा अहंकार दुखावण्याची व मतभेद वाढण्याची शक्यता असते. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा आदेशकर्ता अधिकारी कोण याची  स्पष्ट जाणीव असावी व त्याच्याचकडून आदेश मिळावेत.
(५) निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्त्व : फेयॉलने ‘एक प्रमुख एक योजना’ या धोरणाचे समर्थन केले आहे. याचा अर्थ, एका विशिष्टयोजनेवरील सामूहिक प्रयत्नांना फक्त एकाच व्यक्तीचे मार्गदर्शन मिळावे. जर हे तत्त्व अमलात आणले, तर प्रत्येकाचे श्रम आणि शक्ती यांचे प्रभावी सुसूत्रीकरण वा समन्वय होईल. विविध विभागांची उद्दिष्टे, संघटनेच्या एकूण उद्दिष्टांना मिळती जुळती (समान) असावीत.
(६) सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणार तत्त्व : या तत्त्वानुसार कामगारांच्या वैयक्तिक हितापेक्षा संघटनेचे हित महत्त्वाचे मानले गेले पाहिजे. संघटनेमध्ये निर्णय घेताना व्यवस्थापकाने नेहमीच संपूर्ण समूहाच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले पाहिजेत. संघटनेच्या सर्वसाधारण हितापुढे सेवकवर्गाने आपल्या हितांचे समर्पण (Surrender) केले पाहिजे. संघटनेची भरभराट झाल्यास स्वाभाविकच कर्मचाऱ्यांची भरभराट होणार असते. उदा., क्रिकेटमध्ये सर्व खेळाडूंनी संघ विजयी व्हावा म्हणून प्रयत्न केले पाहिजे, ना की वैयक्तिक खेळाची नोंद (Record) करण्यासाठी.
(७) केंद्रीकरणाचे तत्त्व : केंद्रीकरण म्हणजे अधिकार व सत्तेचे संघटनेतील वरिष्ठ स्तरावरील काही मोजक्या व्यक्तींच्या हातामध्ये एकत्रीकरण होय. लहान प्रमाणावरील व्यवसायात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते, त्यामुळे स्वाभाविकपणे तेथे अधिकारांचे केंद्रीकरण असते.तथापि मोठ्या संघटनेमध्ये काही अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक असते. विकेंद्रीकरण म्हणजे अधिकारांचे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर वाटप करणे होणे. संघटनेतील कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी त्याची आवश्यकता असते. फेयॉल यांच्या मतानुसार, संघटनेत पूर्णपणे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण असे असू नये, तर त्यामध्ये योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे. हे संतुलन संघटनेचा आकार, रचना, स्वरूप यांवर  आधारित असावे.
(८) मोबदला तत्त्व : या तत्त्वानुसार संघटनेतील कर्मचाऱ्यांना रास्त (fair) आणि वाजवी वेतन दिलेच पाहिजे. संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समाधानी ठेवणे व त्यांना कायम संघटनेत राहावे असवाटणे यासाठी रास्त वेतनाची आवश्यकता असते. वेतन देतानाकर्मचाऱ्यांचे कौशल्य, विशेषीकरण, ज्ञान, सेवेचा अनुभव इत्यादींचाविचार करणे आवश्यक असते. यामुळे त्यांचे नैतिक मनोधैर्य वाढते.कार्यक्षमता व उत्पादकताही वाढते.
(९) अधिकार साखळीचे तत्त्व : फेयॉल यांच्या मते, आदेश,सूचना, संदेश इत्यादींचे संज्ञापन विशिष्ट अधिकार साखळीद्वारे म्हणजे महाव्यवस्थापकाकडून व्यवस्थापकाकडे, विभाग प्रमुखाकडून विभागीय पर्यवेक्षकाकडे, पर्यवेक्षकाकडून – फोरमनकडे फोरमनकडून – कामगारांकडे व्हायला पाहिजे. याच्या उलट सूचना, माहिती, तक्रारी, शिफारसी इत्यादींचे संज्ञापन अधिकार साखळीद्वारे कामगारांकडून महाव्यवस्थापकापर्यंत ऊर्ध्व दिशेने (Upward Direction) पोहोचणे आवश्यक असते. प्रत्येक माहितीचे संज्ञापन साखळीतील विशिष्ट दुव्याद्वारेच व कोणताही दुवा न टाळता केले गेले पाहिजे. कधी कधी अधिकार साखळी ही लांबलचक प्रक्रिया होते. अशा वेळेस फेयॉल याने अधिकार साखळीत छोटा मार्ग सुचवला आहे,यालाच ‘गँग प्लँक’ (Gang plank) किंवा जोडफळी म्हणतात. अशा पद्धतीत संज्ञापन हे प्रत्यक्ष स्वरूपात व जलद गतीने होते. अधिकार साखळीचे तत्त्व व जोडफळी पुढील आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल.
(१०) सुव्यवस्थेचे तत्त्व : फेयॉलचे हे तत्त्व ‘प्रत्येक गोष्टीसाठ योग्य जागा आणि प्रत्येक गोष्ट नियोजित जागेवर असणे’ यावर आधारित आहे. व्यक्ती आणि साधनसामग्री (वस्तू) यांची विहित पद्धतीने रचना किंवा मांडणी केली पाहिजे. या तत्त्वानुसार संघटनेमध्ये प्रत्येक साधन- सामग्री आणि व्यक्ती विहित जागीच असल्या पाहिजेत. संघटनेतील प्रत्येक सेवकास त्याच्या कामासाठी विशिष्ट जागा नेमून दिली पाहिजे आणि ती व्यक्ती तिच्याच जागेवर असली पाहिजे. या तत्त्वाचा उद्देश साधनसामग्रीच्या आणि कोणत्याही व्यक्तीच्या शोधासाठी लागणारा वेळ आणि शक्ती यांचा अपव्यय टाळणे हा आहे. या तत्त्वाचा मुख्य भर भौतिक व मानवी संसाधनांचा योग्य व पर्याप्त वापर संघटनेसाठी व्हावा असा आहे.
(११) समान न्यायाचे तत्त्व : समान न्याय म्हणजे सर्व सेवकवर्गाला रास्त, वाजवी आणि समानतेच्या वर्तनाची वागणूक देणे. या प्रकारात कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप, अधिकारांचे वाटप, वेतन निश्चिती अशा कोणत्याही बाबतीत भेदभाव असू नये. वेतन निश्चित करताना कर्मचारी कोणत्या विभागामध्ये कोणत्या स्तरावर काम करीत आहे यावर ठरवावे. म्हणजेच, वेगवेगळ्या विभागांमध्ये जरी कर्मचारी काम करीत असतील, परंतु त्यांचा स्तर जर समान असेल, तर त्यांना समान वेतन देणे आवश्यक आहे. त्यामुळे संघटनेमधील मतभेद कमी होण्यास मदत होईल.
(१२) कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्त्व : या तत्त्वानुसार कर्मचाऱ्याची संघटनेमध्ये नियुक्ती केल्यानंतर त्याला या संघटनेत नोकरीमध्ये स्थैर्य लाभेल याची खात्री देणे आवश्यक आहे. यामुळे कर्मचाऱ्याच्या मनात संघटनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होते. नोकरीतील स्थैर्य भावनेमुळे कार्यक्षमता वाढते व कुशल कर्मचारी काम सोडून जाण्याचा दर कमी होतो.
(१३) पुढाकार घेण्याचे तत्त्व : पुढाकार म्हणजे नवकल्पनांचा व वैयक्तिक क्षमतांचा वापर करून संघटनेसाठी काम करण्याची प्रेरणा होय.  या व्यवस्थापन तत्त्वानुसार कर्मचाऱ्यांना संघटनेसाठी योजना तयार करणे व त्यांची अंमलबजावणी करणे या संदर्भात त्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी व्यवस्थापकांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना स्वातंत्र्य संधी दिली पाहिजे. हे व्यवस्थापक तत्त्व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवते व परिणामी संघटना आपले उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करू शकते.
(१४) संघभावनेचे तत्त्व : संघभावना म्हणजे, ‘एकी हेच बळ’ या व्यवस्थापन तत्त्वाचा खरा आशय सहकार्याची भावना असा आहे. हे तत्त्व व्यक्ती आणि समूह प्रयत्नांचे एकात्मीकरण आणि सुसूत्रीकरण घडवते. सांघिक कार्य या हेतूवर या तत्त्वाचा भर आहे. व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांच्या विविध समूहांमध्ये संघभावना निर्माण केली पाहिजे. कर्मचाऱ्यांचे सर्व समूह जेव्हा एक संघ म्हणून कार्य करतात, तेव्हा संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचे योग्य संचालन करता येते.
 

धन्यवाद ----------------------------

सर्व विद्यार्थ्यांनी SPGUNJAL या ब्लॉग ला फॉलो करा.

 

 

 

 


Post a Comment

11 Comments

Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.

Close Menu