प्रश्न
१ पुढे दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१)
व्यवसाय ही सामाजिक-आर्थिक कृती आहे.
(२)
व्यवसाय संघटनांनी नैसर्गिक साधनांचा पर्याप्त उपयोग करण्यासाठी
प्रयत्न करावा.
(३)
आर्थिक वाढ आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी राजकीय स्थिरता
आवश्यक असते.
(४)
योग्य वेळी कर भरणे ही संघटनांची शासनाप्रति जबाबदारी आहे.
(५)
व्यावसायिक हे समाजाचे विश्वस्त असतात.
(६)
व्यवसायाने मालकांना वेळोवेळी माहिती पुरवली पाहिजे.
(७)
व्यवसायाने कर्मचाऱ्यांना बढतीच्या योग्य संधी दिल्या पाहिजेत.
(८)
'नीतिशास्त्र' ही संकल्पना ग्रीक शब्दापासून घेतली आहे.
(९)
व्यवसाय नीतीशास्त्र संबंध नैतिक तत्त्व प्रणालीशी होतो.
(१०)
व्यवसाय संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण करावे व सुरक्षिततेची साधने पुरवावीत.
(११)
निव्वळ नफ्याच्या कमीत कमी २% रक्कम कंपन्यांच्या सामाजिक
जबाबदारीवर खर्च केली पाहिजे.
प्र.
२ योग्य जोड्या जुळवा (प्रत्येकी १ गुण)
गट ‘अ’ गट ब ( उत्तरे ) (अ) कर्मचारी- नोकरीची सुरक्षितता
(ब)
गुंतवणूकदारांप्रति जबाबदारी – कर्जफेडीची
क्षमता व प्रतिष्ठा
(क)
शासनांप्रति जबाबदारी-नियम व
कायदयांचा आदर
(ड)
आर्थिक उददेश - नफा मिळवणे
(ई)
व्यवसाय नीतीशास्त्र – समाजशास्त्राची
शाखा.
प्र.३
पुढील प्रत्येक विधानासाठी योग्य शब्द किंवा शब्दसमूह किंवा
संज्ञा लिहा. (प्रत्येकी १ गुण)
(१)
महात्मा गांधीजींनी सांगितलेले सखोल तत्त्वज्ञान.
(२)
समाजाच्या कल्याणासाठी निर्देशित केलेली व्यवसायाची कर्तव्ये
व कार्ये.
(३)
चांगल्या दर्जाचे उत्पादन/वस्तू मिळवणे हा समाजातील या गटाचा
हक्क आहे.
(४)
गुंतवणुकीवर योग्य मोबदला पुरवणे, ही या समूहांप्रति संघटनेची
जबाबदारी असते.
(५)
व्यावसायिक पर्यावरणातले व्यवहार करतानाचे नैतिकतेशी संबंधित
असणारे नियम.
(६)
नफ्याने प्रेरित होऊन केले जाणारे कार्य.
(७)
परकीय चलन मिळवणे ही या समूहाप्रति संघटनेची जबाबदारी असते.
(८)
रोजगारांची निर्मिती करणे ही या समूहांप्रति संघटनेची जबाबदारी
असते.
उत्तरे :
(१)
विश्वस्त संकल्पना (२) सामाजिक जबाबदारी (३)
ग्राहक (४) गुंतवणूकदार (५) व्यवसाय नीतीशास्त्र (६) व्यवसाय (७)
शासन (८) समाज
प्र.४
पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा. (प्रत्येकी १ गुण)
(१)
व्यावसायिक हे समाजाचे विश्वस्त असतात.
(२)
व्यवसाय नीतीशास्त्र ही नियमावली आहे.
(३)
समाजातील दुर्बल घटकांच्या उद्धारासाठी व्यवसाय संघटनांनी
प्रयत्न करणे अपेक्षित असते.
(४)
औदयोगिक शांतता राखणे ही व्यवसाय संघटनांची निशा जबाबदारी असते.
(५)
आर्थिक परिस्थितीची संपूर्ण आणि अचूक माहिती मालकांना मिळू
शकत नाही.
(६)
लोकांच्या जीवनामध्ये प्रसारमाध्यमे महत्त्वाची भूमिका पार पाडत
नसतात.
(७)
व्यवसायाच्या कायदेशीर जबाबदारीपेक्षा सामाजिक जबाबदारी व्यापक आहे.
उत्तरे
:
(१)
बरोबर (२) बरोबर (३) बरोबर (४) बरोबर (५)
चूक (६) चूक (७) बरोबर
प्र.५
गटात न बसणारा शब्द शोधा. (प्रत्येकी १ गुण)
(१)
नोकरीची सुरक्षितता, आरोग्य व सुरक्षिततेची साधने, कामाची सुयोग्य
स्थिती, योग्य प्रमाणात नफा.
(२)
चांगल्या दर्जाची उत्पादने, योग्य किमती, प्रामाणिक जाहिरात, शहरांतील
गर्दीला आळा घालणे.
(३)
योग्य वेळी कर भरणा, परकीय चलन मिळवणे, नावलौकिक मिळवणे,
राजकीय स्थिरता.
(४)
पर्यावरणाचे संरक्षण, पारदर्शकता राखणे, रोजगार निर्मिती, मागासलेल्या
भागांचा विकास.
(५)
सभेचे योग्य संचलन, भांडवलाचा काळजीपूर्वक वापर, उत्पादनांच्या
योग्य किमती, कर्जफेडीची क्षमता व प्रतिष्ठा राखणे.
उत्तरे :
(१)
योग्य प्रमाणात नफा (२) शहरांतील गर्दीला आळा घालणे
(३) नावलौकिक मिळवणे
(४)
पारदर्शकता राखणे (५) उत्पादनांच्या योग्य किमती
प्र.६
पुढील विधाने पूर्ण करा.
(१)
संसाधनांचा अपव्यय कमीत कमी करून, व्यवसाय संघटना
जास्तीत जास्त नफा मिळवू शकतात.
(२)
सामाजिक जबाबदारी ही कायदेशीर जबाबदारीपेक्षा व्यापक आहे.
(३)
विश्वस्ताचा अधिकार ही संज्ञा महात्मा गांधी यांनी मांडली.
(४)
व्यवसायाने माफक नफा मिळवावा.
(५)
कामाच्या स्वरूपानुसार व महत्त्वानुसार मानधन हे निश्चित असते.
(६)
‘नीतीशास्त्र’ (एथिक्स्) हा शब्द एथॉस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे.
प्र.
७ कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा (प्रत्येकी १ गुण)
गट
‘अ’ गट ‘ब’
(१)
विक्रयोत्तर सेवा- ग्राहकांप्रति
जबाबदारी
(२)
योग्य वेळी कर भरणा - शासनाप्रति
जबाबदारी
(३) समाजाप्रति जबाबदारी- समाजविरोधी
कृत्यास पायबंद
(४) भागधारकांप्रति जबाबदारी- भाग बाजारातील योग्य कार्ये
प्र.८
प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी १ गुण)
(१) व्यवसायातील अवैध
व्यापारी प्रथांविरुद्ध कोण आवाज उठवू शकतो?
उत्तर
: व्यवसायातील अवैध व्यापारी प्रथांविरुद्ध ‘प्रसारमाध्यमे’ आवाज
उठवू शकतात.
(२) कर्मचारी
अद्ययावत राहण्यासाठी व्यवस्थापनाने काय केले पाहिजे?
उत्तर
: कर्मचारी अदययावत राहण्यासाठी व्यवस्थापनाने सुरुवातीचे प्रशिक्षण,
रिफ्रेशर ट्रेनिंग (नवीन ज्ञान देण्याचे प्रशिक्षण) असे कार्यक्रम कार्यक्षमता व आत्मविश्वास वाढवण्यासाठी योजिले
पाहिजेत.
(३) कोणत्या
प्रकारच्या जाहिराती टाळल्या पाहिजेत?
उत्तर
: चुकीच्या, दिशाभूल करणाऱ्या, असभ्य अशा जाहिराती व्यवसाय
संघटनेने टाळल्या पाहिजेत.
(४) वस्तूंचा दर्जा
सुधारण्यासाठी व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व्यवसायाने काय केले पाहिजे?
उत्तर
: वस्तूंचा दर्जा सुधारण्यासाठी संशोधन व विकास कार्यक्रम, तज्ज्ञ
मार्गदर्शकांच्या नियंत्रणाखाली राबवला पाहिजे. त्यामुळे उत्पादन खर्चही कमी होईल व वस्तूची किंमत कमी करण्यासही
उपयोग होईल.
प्र.९
पुढील वाक्यांतील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्ये पुन्हा लिहा. (प्रत्येकी
१ गुण)
(१)
व्यवसायाच्या कायदेशीर जबाबदारीपेक्षा सामाजिक जबाबदारी
ही संकुचित संज्ञा आहे.
(२)
भाग बाजाराशी संबंधित सर्व प्रकारच्या इष्ट व्यापारी प्रथा टाळल्या पाहिजेत.
(३)
व्यवस्थापन आणि कामगार संघटनांनी दोन्ही पक्षांच्या हितासाठी
संप व टाळेबंदी मान्य केली पाहिजे.
(४)
प्रत्येक खोक्यावर (पॅकेटवर) कमाल विक्री किंमत (MRP) लिहावयाची नसते
(५) अप्रामाणिकपणे
केलेल्या जाहिरातीला ग्राहक दीर्घकाळ स्वीकृती
देतात.
(६)
समाज विघातक कृत्यांना व्यवसाय संघटनांनी आर्थिक साहाय्य
पुरवले पाहिजे.
(७)
व्यवसाय नीतीशास्त्र ही बंधनकारक संज्ञा आहे.
(८)
व्यवसाय नीतीशास्त्र ही संज्ञा तुलनात्मक नाही.
(९)
योग्य किंवा अयोग्य या नीतीनियमांवर सामाजिक मूल्ये अवलंबून
असतात.
(१०)
सामाजिक आचरणासाठी नैतिक मूल्ये ही सर्वसाधारण मार्गदर्शक
तत्त्वे पुरवतात.
उत्तरे :
(१)
व्यवसायाच्या कायदेशीर जबाबदारीपेक्षा सामाजिक जबाबदारी
ही व्यापक संज्ञा आहे.
(२)
भाग बाजाराशी संबंधित सर्व प्रकारच्या दुष्ट (वाईट) व्यापारी
प्रथा टाळल्या पाहिजेत.
(३)
व्यवस्थापन आणि कामगार संघटनांनी दोन्ही पक्षांच्या हितासाठी
संप व टाळेबंदी टाळली पाहिजे.
(४)
प्रत्येक खोक्यावर (पॅकेटवर) कमाल विक्री किंमत (MRP) लिहावयाची असते.
(५) प्रामाणिकपणे
केलेल्या जाहिरातीला ग्राहक दीर्घकाळ स्वीकृती
देतात.
(६)
समाज विघातक कृत्यांना व्यवसाय संघटनांनी आर्थिक साहाय्य
बिलकूल पुरवू नये.
(७)
व्यवसाय नीतीशास्त्र ही ऐच्छिक संज्ञा आहे.
(८)
व्यवसाय नीतीशास्त्र ही संज्ञा परस्पर संबंधित आहे.
(९)
योग्य किंवा अयोग्य या नीतीनियमांवर नैतिक मूल्ये अवलंबून असतात.
(१०)
सामाजिक आचरणासाठी सामाजिक मूल्ये ही सर्वसाधारण मार्गदर्शक
तत्त्वे पुरवतात.
प्र.
१० पुढील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा.
(प्रत्येकी ३ गुण)
१) यशवंत कंपनी लि. आपल्या
महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या लहान बालकांसाठी पाळणाघर व घरात थांबूनच काम घरबसल्या करण्याची सवलत देते. जरी ते
कामगार संघटनांचे सभासद असले तरी, व्यवस्थापन निर्णय घेण्यापूर्वी, त्यांच्या सूचनांची दखल घेते.
(अ) या पद्धतीचे काम
करून ते कोणत्या घटकांविषयी सामाजिक जबाबदारी पार पाडतात?
उत्तर
: कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप, कर्मचाऱ्यांची एकूण परिस्थिती पाहून कंपनी सामाजिक जबाबदारीची भूमिका पार पाडत
आहे.
(ब) ते कोणती मूल्ये
निर्देशित करतात?
उत्तर
: यशवंत कंपनी लि. 'सामाजिक मूल्ये' जपत आहेत; कारण
महिला कर्मचाऱ्यांशिवाय लहान बालकांच्या जबाबदारीची जाणीव
कंपनीला आहे.
(क) वरील घटनेमध्ये
मालक, कोणत्या प्रकारच्या जबाबदारीचे अनुकरण करतात?
उत्तर
: कामगार संघटनांचे सभासद होणे हा कामगारांचा हक्क आहे
व तो कंपनीला मान्य आहे. कंपनी कामगार संघटनेला मान्यता देत
आहे. कामगार संघटना स्थापण्यापासून कंपनी त्यांना अडवत नाही. याप्रमाणे
विविध जबाबदारी कंपनी पूर्ण करीत आहे.
(२) रंगाचे उत्पादन करणाऱ्या एका संस्थेने कित्येक वर्षांपासून बाजारामध्ये अग्रेसर स्थान
पटकावले आहे. प्रक्रिया न केलेले विषारी स्वरूपाचे टाकाऊ पदार्थ, ते नदी किनाऱ्यावर फेकून देतात की, ज्यामुळे जवळपासच्या
खेडेगावामध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेल्या आहेत.
(अ) उत्पादन करणाऱ्या
संस्थेने कोणत्या स्वरूपाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केलेले आहे?
उत्तर
: उत्पादन करणाऱ्या संस्थेने पर्यावरणाची हानी, म्हणजेच प्रदूषण
समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.
(ब) ते कोणत्या
प्रकारचे प्रदूषण करतात?
उत्तर
: रंग उत्पादन कंपनीने टाकाऊ विषारी पदार्थ नदी किनाऱ्यावर फेकल्यामुळे
जल प्रदूषण समस्या निर्माण झाली आहे.
(क) कोणत्या प्रकारचे
खबरदारीचे उपाय त्यांनी करणे गरजेचे आहे?
उत्तर
: टाकाऊ पदार्थाचे व्यवस्थापन करण्याची खबरदारी घ्यायला हवी.
त्यासाठी ४आर (4R) तंत्र अवलंबले पाहिजे.
(१)
टाकाऊ
पदार्थांमध्ये घट (Reduce).
(२)
पदार्थांचा
पुनर्वापर (Reuse)
(३) दुसऱ्या
पदार्थांची पुनर्निर्मिती (Recycle).
(४)
पुनर्निर्मिती
न होणाऱ्या वस्तू पुनर्णाप्त (Recovery).
(३) एक वाहन निर्मिती कंपनी
(अ) कंपनीकडून फक्त पर्यावरणपूरक घटकांचा वापर केला जातो.
(ब) हानिकारक अशा टाकाऊ वस्तूंवर योग्य ती प्रक्रिया करून त्यांची विल्हेवाट लावली
जाते.
(क) आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे वाहनांच्या प्रदूषणाची पातळी राखली जाते.
अ) हे करीत असताना,
व्यवसाय संघटना कोणत्या समूहांप्रति आपली सामाजिक जबाबदारी पार पाडतात?
उत्तर
: एकूण समाजाप्रति सामाजिक जबाबदारीचे पालन वाहन निर्मिती
कंपनी करीत आहे.
(ब) कोणत्या प्रकारचे
प्रदूषण त्यांच्याकडून टाकले जाते?
उत्तर
: वायू प्रदूषण रोखणे हे या कंपनीचे उद्दिष्ट आहे.
(क) कोणत्या प्रकारचा
संदेश ते देतात?
उत्तर
: प्रत्येक व्यवसायाने पर्यावरणाची हानी रोखली पाहिजे. त्यासाठी
व्यवसाय वचनबद्ध असला पाहिजे व नैसर्गिक समतोल राखला
पाहिजे.
प्र.११
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी
४ गुण)
(१) सामाजिक
जबाबदारीची गरज सांगा.
उत्तर
: यासाठी प्र. १४ उपप्रश्न (२) मधील मुद्दा (ब) अभ्यासावा.
(२) ग्राहकांप्रति
असणाऱ्या कोणत्याही चार जबाबदाऱ्या सांगा.
उत्तर
: यासाठी प्र. १३ उपप्रश्न (१) अभ्यासावा.
(३) व्यवसाय
नीतीशास्त्र म्हणजे काय? व्यवसाय नीतीशास्त्राचे घटक कोणते?
उत्तर
: अर्थ : इंग्रजीतील ‘Ethics’ (नीती) हा
शब्द ग्रीक Ethos ‘ या
शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ मानवी चरित्र आणि
वर्तन असा आहे. शब्दकोशाप्रमाणे नीती म्हणजे नैतिक तत्त्व, जी
मानवी वर्तणुकीवर नियंत्रण करतात अथवा त्यावर प्रभाव पाडतात.
व्यवसाय
नीतीशास्त्र म्हणजे व्यवसाय करीत असताना व्यवसायाने ज्या नियमांचे
पालन केले पाहिजे अशा नियमांचा संच होय. नीतीशास्त्र ही समाजशास्त्राची
एक शाखा आहे. व्यवसाय नीतीशास्त्र (Business Ethics नीतीमूल्ये)
म्हणजे, व्यवसाय कार्यास लागू असलेली नैतिक तत्त्वप्रणाली
किंवा आचारसंहिता होय.
व्याख्या
: व्हीलर या लेखकाच्या मतानुसार, “व्यवसाय नीतीशास्त्र म्हणजे
समाजाशी, त्यातले वेगवेगळे समूह, संस्था यांच्याशी समतोल संबंध
ठेवण्याची एक कला किंवा शास्त्र आहे. तसेच व्यवसायासाठी चांगल्या
व वाईट वर्तणुकीसाठी नैतिक जबाबदारी ओळखणे होय.
व्यवसाय
नीतीशास्त्राचे घटक पुढीलप्रमाणे वर्णन –
१) विश्वासार्हता राखणे : प्रत्येक व्यवसाय संघटनेने व्यवसायाच्या
सर्व विभागात वरपासून खालपर्यंत विश्वासार्हता राखण्यासाठी
काम केले पाहिजे. त्यामुळे ग्राहकांचा संस्थेच्या कार्यक्षमतेवर
विश्वास वाढेल. साधारणत: ग्राहक हे व्यवसाय संघटनेच्या विश्वसनीयतेवर
व दर्जेदार कामगिरीवर विश्वास ठेवतात. चारित्र्य, प्रामाणिकपणा,
सत्य, प्रतिष्ठा आणि सामर्थ्यावर व्यवसाय संघटना कार्य
करतात.
२) प्रामाणिक सेवा देणे : पोकळ आश्वासने देण्यापेक्षा कंपनीने अथवा व्यवसाय संघटनेने जे काही काम केले असेल, त्याबाबत प्रामाणिक राहिलेले चांगले असते. पोकळ अथवा खोटी आश्वासने अथवा वचने दिल्याने व्यवसाय संघटनेच्या नाव लौकिकाला तसेच प्रतिष्ठेला धोका पोहोचतो. व्यवसाय संघटनेने कबूल केलेली कामे वेळेत पूर्ण करणे अपेक्षित असते. प्रत्येक कार्य वेळेत व उत्तम रितीने पूर्ण केल्यास, प्रत्येक ग्राहकास उत्तम सेवा प्राप्त झाल्याचा आनंद प्राप्त होतो.
३) गुप्तता राखणे : कंपनीने अथवा व्यवसाय
संघटनेने अंतर्गत गुप्त धोरण
काटेकोरपणे अवलंबले पाहिजे. प्रत्येक व्यवसाय संघटनेने आपल्या
ग्राहकांची संवेदनशील माहिती व खाजगी नोंदी गुप्त ठेवणे आवश्यक
असते. स्वत:च्या फायदयासाठी ग्राहकांची गुप्त माहिती इतरांसमोर
उघड करू नये. त्याचप्रमाणे व्यवसाय संघटनांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याकडून
काही सूत्रे किंवा उत्पादन पद्धती या संदर्भात गुप्तमाहिती चुकीच्या मार्गाने
मिळवू नये.
४) स्पष्टता : उत्तम व्यवसाय नीतीचा
अवलंब करणे व नियमितपणे आपल्या कामात सुधारणा करणे, या बाबी
स्पष्ट वक्तेपणामुळे व्यवसाय संघटनेला प्राप्त होतात.
व्यवसाय संघटनेने स्पष्टतेच्या तत्त्वांचा अवलंब केला पाहिजे. तसेच
त्यांनी ग्राहकांकडून व संघातील
सदस्यांकडून उत्पादनाबाबत व व्यवसाय संघटनांबाबत त्यांची
मते व प्रतिसाद नियमितपणे मिळवावीत. व्यावसायिक मतभेदांच्या
वेळीही इतरांची मते व कल्पना व्यवसाय संघटनेने आदरपूर्वक
व नम्रतापूर्वक अवलंबणे अपेक्षित असते.
५) इतर सामाजिक व्यवसाय नीतिमत्ता : (१)
समाजामध्ये कमी खरेदी क्षमता असणारी सामान्य माणसे फार मोठ्या
प्रमाणात आहेत. त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार व
आवडीनिवडीनुसार वस्तू व सेवांचे
उत्पादन करणे व पुरवठा करणे, हे व्यवसाय संघटनेकडून अपेक्षित
असते. (२) उत्पादकांनी ग्राहकांना देऊ केलेल्या गॅरंटी व वॉरंटी या योग्य व स्वीकारणीय असाव्यात. (३) उत्पादकांनी
व व्यावसायिकांनीउत्पादकांची जाहिरात देताना सभ्यतेची मर्यादा ओलांडू नये.
(४) शासनाप्रति
व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांगा.
उत्तर
: यासाठी प्र.१४ उपप्रश्न (४) मधील मुद्दा (ब) अभ्यासावा.
(५) कंपन्यांच्या सामाजिक
जबाबदारीविषयी कोणत्याही चार कृती स्पष्ट करा.
उत्तर
: यासाठी प्र.१३ उपप्रश्न
(५) मधील मुद्दा (४) अभ्यासावा.
प्र. १२ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा :
(प्रत्येकी ४ गुण)
(१) व्यवसाय
संघटनांवर प्रभाव टाकण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते.
उत्तर
: (१) उत्पादने व सेवा यांच्या संदर्भात आम जनतेला माहिती देण्यासाठी
जाहिरातदाराने वापरलेल्या साधनांना ‘माध्यमे’म्हणतात. प्रसारमाध्यमांमध्ये
वर्तमानपत्रे, मासिके, रेडिओ व दूरदर्शनयांचा समावेश होतो. आम जनतेच्या जीवनात
सक्रिय माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावतात. इंटरनेटद्वारे
माध्यमांना सामान्य जनतेपर्यंत
पोहोचणे फार सोपे झाले आहे.
२) कोणतीही माहिती, चुकीचे धोरण व अनुचित
व्यापार पद्धतीचा अवलंब जर एखादया व्यवसाय संघटनेने केला,
तर ती माहिती जलद गतीने जगाच्या कानाकोपऱ्यातील आम
जनतेकडे पोहोचवण्यासाठी कार्यक्षमता प्रसारमाध्यमांमध्ये
असते. माध्यमे ही जास्त सक्रिय व जलद प्रसार करणारी असतात.
३) प्रसारमाध्यमे ही लोकांना एकत्रित
आणतात व बहुसंख्य लोकांवर आपला प्रभाव टाकतात. व्यवसाय संघटनेने
केलेली फसवणूक आणि ग्राहकांचे केलेले शोषण या विरोधात
प्रसारमाध्यमे गाजावाजा करून, आवाज
उठवतात. संबंधित माहितीची अनेकदा पुनरावृत्ती करून,
जलद जाहिरात करतात अथवा माहिती प्रसारित करतात.
४) वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरदर्शन,
इंटरनेट इत्यादी प्रसारमाध्यमे,व्यवसाय संघटनांनी अवलंबलेल्या अनुचित व्यापार
पद्धतींना सहजपणे प्रसिद्धी देतात. अशा प्रकारे प्रसारमाध्यमे
व्यवसाय संघटनेला सामाजिक मूल्यांचे महत्त्व पटवून देतात.
(२) कामागारांच्या
व्यवस्थापनातील सहभागास व्यवसायाने मान्यता दयावी.
उत्तर
: (१) कामगार हे व्यवसाय संघटनेच्या यशाचे शिल्पकार असतात.
मानवी संसाधनात केलेली गुंतवणूक व्यवसाय संघटनेला दीर्घकालीन
उत्तम फायदे मिळवून देतात.
(२)
व्यवसायाचे अस्तित्व, यश, अपयश आणि विकास या बाबी कर्मचाऱ्यांच्या
संघटनेमधील सहभागावर अवलंबून असतात. यासाठी व्यवसाय
संघटनेने विविध योजनांद्वारे कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभाग
घेण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. उदा., सामाईक सूचना अथवा प्रस्ताव
देणे, उत्पादन व इतर खर्चात बचत करण्याचे मार्ग सुचवणे,उत्पादन दर्जा सांभाळणे,
नफ्यात सहभागी होऊ देणे, सहभागीदारी देणे इत्यादी.
(३)
जेव्हा कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभागी होण्याची संधी दिली
जाते, तेव्हा त्यांचे मानसिक धैर्य उंचावते. परिणामी कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेविषयी आपुलकीची भावना उत्पन्न होते व
त्यांना दिलेली कामे पूर्ण करण्यासाठी ते सक्रिय भाग घेतात.
(४) कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभागी होऊ दिल्यामुळे व्यवसाय संघटना कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होतात. यामुळे कामगार आणि व्यवस्थापनात सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात व पुढे ते दृढ होतात, जे व्यवसायात यश मिळवण्यासाठी आवश्यक असतात.
(३) व्यवसायाप्रति समाजाच्या
अपेक्षा बदलत आहेत.
उत्तर
: (१) अलीकडे जग अत्यंत जलद वेगाने बदलत आहे, वाढत
आहे व विस्तारित होत आहे. वर्षांनुवर्षे सामाजिक मागण्या हळूहळू
बदलत आल्या आहेत. व्यवसायांनी अशा बदलाला सकारात्मक प्रतिसाद
दिला आहे
(२)
आता जगभरातील लोकांमध्ये आपल्या हक्कांबद्दल जागरूकता
निर्माण झाली आहे. एकंदरीत ज्ञानाची पातळीसुद्धा उंचावत आहे.
लोकांच्या वाढत्या गरजांची पूर्ती करण्यासाठी व्यवसाय संघटनेने समाजाच्या अपेक्षेप्रमाणे आपला व्यवसाय कार्यरत
ठेवला पाहिजे.
(३)
ग्राहक समाधान हे व्यवसाय कार्याचे अंतिम ध्येय झाले आहे. व्यवसाय
संघटनांनी नफा कमावण्यापेक्षा ग्राहक समाधानास अगक्रम दिला
पाहिजे. व्यवसायाचे अस्तित्व, विकास व नावलौकिक जास्त अथवा
कमी प्रमाणात ग्राहक समाधानावर अवलंबून असतो. व्यवसाय संस्थांनी
ग्राहकांना उत्तम सेवा देऊन, त्यांचा आत्मविश्वास संपादन केला
पाहिजे.
(४) व्यवसाय संघटनेने नफा मिळवणे या उद्देशाबरोबर समाजातील सर्व लोकांचे हित जोपासणे व मानव जातीची आणि संपूर्ण समाजाची उद्दिष्टे पूर्ण करणे, या उद्देशांच्या पूर्तीसाठी व्यवसाय चालवणे अपेक्षित असते. व्यवसाय संघटनेने समाजाच्या स्वास्थ्यासाठी उत्तम दर्जाची उत्पादने रास्त किमतीत समाजातील लोकांना पुरवली पाहिजेत. यापेक्षाही व्यवसाय संघटनेने समाज कल्याणात आपले योगदान देणे अपेक्षित आहे.
(४) व्यवसाय
संघटनांनी पर्यावरण प्रदूषण व पर्यावरणीय असमतोल टाळला पाहिजे
उत्तर : (१) व्यावसायिक संघटना कार्यरत राहणे व औदयोगिकरण होणे यामुळे वायू प्रदूषण, जल प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होते. कार्बन कण, धूळ, धोकादायक वायू, रसायने इत्यादींमुळे वायू प्रदूषण होते.
(२) धोकादायक रसायने, योग्य विल्हेवाट न लावलेले सांडपाणी, औदयोगिक टाकाऊ पदार्थ, खते, कीटकनाशके, कापड उदयोगांचा कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा इत्यादी पाण्यात मिसळले गेले, तर पाणी दूषित होते व त्यापासून जल प्रदूषण होते. विमानांच्या उड्डाणांचा आवाज, वाहनांचा आवाज, इमारती बांधकामांच्या मशीन्सचा आवाज व औदयोगिक उपकरणांचा आवाज यांमुळे वातावरणात ध्वनी प्रदूषण होते.
(३)
व्यवसाय संघटनेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून हवा/वायू
प्रदूषण, जल प्रदूषण व ध्वनी प्रदूषण रोखले पाहिजे व पर्यावरणीय
समतोल राखला पाहिजे. मानव जातीच्या कल्याणासाठी प्रत्येक
व्यवसाय संघटनेने झाडे लावणे, वन्य प्राण्यांचे रक्षण करणे, नैसर्गिक
साधनांचे संरक्षण करणे इत्यादींसारख्या प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या
मंडळांना मदत केली पाहिजे.
(४)
पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करून हवामानाचा योग्य समतोल
व्यवसाय संघटनांनी राखला पाहिजे. पर्यावरणीय समतोल पुढीलप्रकारे
सांभाळता येऊ शकेल.
अ) व्यवसाय संघटनांनी संसाधनाची हानी कमी करून उत्पादन खर्चात बचत केली पाहिजे, त्यामुळे पैशाचीही बचत होईल. (ब) व्यवसाय संघटनांनी हरित व्यवहारांचा अवलंब केल्यास व्यवसाय संघटनांना ग्राहकांचा पाठिंबा मिळेल. (क) व्यवसाय संघटनांनी पर्यावरण रक्षणाची काळजी घेतली पाहिजे, जागरूक राहिले पाहिजे व कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. (ड) कार्बन उत्सर्जनात कपात करून व हरित वृद्धीसाठी परिस्थिती निर्माण केली पाहिजे.त्यामुळे समाजाला फायदा होतो. (ई) शासनाकडून पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता दाखवणाऱ्या संस्थांना अनेक फायदे मिळतात. याप्रमाणे व्यवसाय संघटनांनी पर्यावरण प्रदूषण टाळले पाहिजे वअसमतोल टाळला पाहिजे.
५) भाग बाजारांशी
संबंधित सर्व प्रकारच्या अनुचित व्यापारी प्रथा टाळल्या पाहिजेत.
उत्तर
: (१) ज्या व्यक्ती अथवा संस्था व्यवसाय संघटनांना अल्पकालीन
तसेच दीर्घकालीन वित्तपुरवठा करतात, त्यांना गुंतवणूकदार म्हणतात.
गुंतवणूकदार आपल्याकडील अधिक्य रक्कम कंपनीमध्ये‘भाग’ स्वरूपात, कर्जरोखे स्वरूपात
गुंतवतात, म्हणजेच ते गुंतवणुकीचा आर्थिक
धोका स्वीकारतात, म्हणून कंपनी व्यवस्थापनाने खरी व वास्तव
माहिती कंपनी मालक (भागधारक) व गुंतवणूकदारांना दिली पाहिजे.
(२) भारतामध्ये सेबी (Securities and Exchange Board of India) गुंतवणूकदारांच्या हिताचे व हक्कांचे रक्षण करण्यासाठीमहत्त्वाची भूमिका बजावते. सेबीच्या कायदेशीर तरतुदींनुसार भाग बाजारातील गैरव्यवहार व फसवणुकीला आळा घालण्याचे काम केले जाते; म्हणून व्यवसाय संघटनेनेसुद्धा चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये की ज्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होईल. जसे, भागांची खरेदी- विक्री करणाऱ्या गटाचा सदस्य, चुकीची व गुप्त माहिती पुरवणे, कृत्रिमरीत्या भागांच्या किमतीत वाढ किंवा घट करणे इत्यादींमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होते.
(३)
चुकीचे व अयोग्य व्यवहार केल्यास सेबीकडून कारवाई होऊ शकते.
त्यामुळे व्यवसाय व्यवस्थापकाने आपली गुंतवणूकदारांविषयीची जबाबदारी
ओळखून भागबाजारासंबंधी बेकायदेशीर (Unlawful) व अयोग्य व्यवहार टाळले पाहिजेत.
६) व्यवसाय करताना
व्यवसाय नीतीशास्त्रामध्ये नैतिक व सामाजिक मूल्यांचा समावेश होतो.
उत्तर
: (१) नैतिक तत्त्वांची पद्धत किंवा वर्तणुकीचे नियम जे व्यवसायाच्या
व्यवहाराला किंवा कामकाजाला लागू पडतात त्यालानीतीशास्त्र म्हणतात. व्हीलर या
तत्त्ववेत्याच्या शब्दात सांगायचे तर, “समाजाशी,
त्यातले वेगवेगळे समूह व संख्या यांच्याशी समतोल संबंध
ठेवण्याची नीतीशास्त्र ही एक कला किंवा शास्त्र आहे. तसेच नीतीशास्त्रामध्ये व्यवसायासाठी चांगल्या व वाईट वर्तणुकीसाठी नैतिक
जबाबदारी ओळखणे हे आहे.”
(२) नैतिक
मूल्ये ही मानवी कृतीवर आधारलेली असतात; मानवी कृती
बरोबर की चूक, चांगली की वाईट यांच्यामधील मार्गदर्शन मूल्ये करीत
असतात. कोणता मार्ग योग्य व कोणता मार्ग अयोग्य, कायदेशीर काय
व बेकायदेशीर काय यासंबंधी वर्तणुकीचे नियम नैतिक व सामाजिक
मूल्यांमध्ये समाविष्ट असतात. व्यवसायाबाबतची
नैतिकमूल्ये सांगितली जातात. त्याचे पालन व्यवसाय करीत
असताना करणे आवश्यक असते. जसे, प्रामाणिकपणा, पारदर्शकता,
सत्यता, समानता इत्यादी मूल्ये सांभाळली पाहिजेत.
(३)
सामाजिक मूल्ये हा समाजव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. सामाजिक
आचरणाची ती मार्गदर्शक तत्त्वे ठरतात. व्यवसायाच्या सर्व व्यवहारांच्या
मागे नैतिकता असणे अपेक्षित असते. प्रामाणिकपणा निष्ठा,
सचोटी, सहृदयता, सहकार्य, बंधुत्व, सदाचार, न्यायबुद्धी इत्यादी
नैतिक मूल्ये व्यवसाय संघटनांनी उचित व्यापारी प्रथेसाठी अवलंबणे
अपेक्षित असते. कारण व्यवसाय हा समाजाचाच एक भाग असतो.
सामाजिक व नैतिक मूल्यांचे अनुसरण करूनच तो दीर्घकाळ यशस्वी
होऊ शकतो.
७)सामाजिक विकासामध्ये,
व्यवसाय नीतीशास्त्र हे एक महत्त्वाचे तंत्र मानले जाते.
उत्तर
: (१) व्यवसाय संस्थेमध्ये समाजातील विविध घटकांशी जे व्यवहार
होतात, त्यांचे नियमन करण्यासाठी जी सर्वमान्य आचारसंहिता असते
तिला व्यवसाय नीतीशास्त्र म्हणतात.
(२) ग्राहक वर्ग, कर्मचारी वर्ग, पुरवठादार, भागधारक, स्पर्धक, सरकार आणि आम जनता यांच्याशी व्यवहार करताना उचित प्रथा अवलंबणे किती आवश्यक आणि महत्त्वाचे आहे ते व्यवसाय नीतीशास्त्र सांगते. प्रामाणिकपणा, सचोटी, वाजवीपणा आणि न्याय ही तत्त्वे व्यवसाय नीतीशास्त्र अवलंबण्यास प्रवृत्त करतात.
(३)
समाजाच्या सर्व घटकांचे हित जोपासण्यासाठी व्यवसाय नीतीशास्त्र
कारणीभूत ठरते. व्यवसाय नीतीशास्त्रातील आदर्श तत्त्वांचे पालन
केले, तर व्यवसाय हा निरोगी व उचित चढाओढीच्या वातावरणात
करता येतो. या तत्त्वामुळे व्यवसाय संस्था सामाजिक सुरक्षिततेसाठी
आणि कल्याणासाठी योजना राबवू शकतात.
(४)
व्यावसायिकाने आपला व्यवसाय अनुचित व्यापार पद्धतींचा अवलंब
न करता केला पाहिजे. जर व्यावसायिकाने सामाजिक मूल्यांचा प्रत्यक्ष
व्यवसायात अवलंब केला, तर हीच सामाजिक व नैतिकमूल्ये समाजविकासाचे
मुख्य साधन बनतात.
प्र. १३ पुढील प्रश्न सोडवा. (प्रत्येकी
५ गुण)
(१) ग्राहकांप्रति
व्यवसाय संघटनांची सामाजिक जबाबदारी कोणती आहे?
उत्तर
: व्यवसाय संघटनांची ग्राहकांप्रति असणारी सामाजिक जबाबदारी
पुढीलप्रमाणे सांगता येईल. १) उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन :
व्यावसायिक संस्थांनी ग्राहकांना चांगल्या
दर्जाचा माल व सेवा पुरवल्या पाहिजेत. त्यासाठी संघटनेमध्ये दर्जा
नियंत्रणखाते असले पाहिजे. त्यामुळे कमी प्रतीची व सरासरीपेक्षा कमी दर्जाची उत्पादने नाकारली जातील. दर्जा
नियंत्रणासाठी इंटरनॅशनल स्टैंडर्ड
ऑर्गनायझेशन (ISO)
हा
अगदी अलीकडचा कल आहे. उत्पादनासाठी
उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि उच्च प्रतिचे साहित्य व सुटेभाग
वापरून चांगला दर्जा राखता येईल. यामुळे ग्राहकांना उत्पादनाची
खात्री पटते.
२)योग्य किंमत : ग्राहकांना वस्तू व सेवा योग्य
किमतीत उपलब्ध झाल्या पाहिजेत. अवाजवी किंमत लावून
त्यांची फसगत करू नये. कारण त्यामुळे संस्थेची दीर्घकालीन प्रतिमा
खराब होते. योग्य किंमत लावण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले
पाहिजेत ही व्यवसायाची नैतिक व
सामाजिक जबाबदारी आहे. योग्य किंमत असल्यास कायमस्वरूपी
ग्राहक संख्या वाढते. जास्तीत जास्त किरकोळ विक्रीची किंमत
(MRP)
‘सर्व
करांसहित किंमत’ असे प्रत्येक वेष्टणावर छापले पाहिजे.
किरकोळ विक्रेत्याने त्यापेक्षा जास्त किंमत घेऊ नये.
३) ग्राहकांची सुरक्षितता : वस्तूंचे उत्पादन करताना, ग्राहकांचे आरोग्य व सुरक्षितता ही मुख्य गोष्ट आहे. असुरक्षित उत्पादनाचे विपणन केले जाऊ नये. कोणत्याही प्रकारच्या असुरक्षित वस्तूविषयी ग्राहकांना आगाऊ सूचना (ताकीद) दिली पाहिजे. काही प्रतिस्पर्धी संस्था कमी प्रतिच्या नकली वस्तू बाजारात आणू शकतील. अशा परिस्थितीत अस्सल मालाच्या उत्पादकांनी ग्राहकांना वेळीच सावध केले पाहिजे.
४) जाहिरातीतील प्रामाणिकपणा :
जाहिरातीद्वारे विविध प्रकारची
माहिती प्रसारित केली जात असते. जसे, उत्पादन वैशिष्ट्ये, वस्तुस्थिती,
वापरपद्धती, वापरल्या नंतरचे फायदे इत्यादी. ही माहिती नियमित
ग्राहक व संभाव्य ग्राहक पाहात असतात. चुकीच्या, दिशाभूल करणाऱ्या, वास्तविकतेपासून दूर नेणाऱ्या आणि अश्लील जाहिराती उत्पादकांनी टाळल्या पाहिजेत. त्यामुळे ग्राहकांचे
जाहिरातीबद्दलचे प्रांजळ, प्रामाणिक मत दीर्घकाळपर्यंत चांगले
राहते.
५) विक्रयोत्तर सेवा : व्यवसाय संस्थांनी आपल्या ग्राहकांना त्वरित, समाधानकारक व कार्यक्षम विक्रयोत्तर सेवा देणे आवश्यक आहे. विशेषकरून नित्य वापराच्या वस्तू, ज्या वॉरंटी पिरियडमधील वस्तूसाठी देणे आवश्यक आहे. तक्रारीसंबंधी तत्पर आणि कार्यक्षम सेवा पुरवली पाहिजे. ग्राहकांच्या सूचनांचे स्वागत केले पाहिजे. त्यामुळे ग्राहकांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होण्यास मदत होईल.
६) संशोधन व विकास : वस्तूचा दर्जा
सुधारण्यासाठी व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी व्यवसाय संस्थेने
संशोधन व विकास कार्यक्रम राबवणे आवश्यक असते. त्यामुळे
ग्राहकांकडून आकारली जाणारी अंतिम
किंमत कमीत कमी होईल. व्यवसाय संस्थेने दर्जा व गुणवत्ता
मानके असलेल्या वस्तूच वितरित केल्या पाहिजेत. BIS (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड), AGMARK,
ISO अशी
मानके असलेल्या वस्तूच वितरित केल्या पाहिजेत.
७)मालाचा नियमित पुरवठा : व्यवसाय संघटनेने आपल्या ग्राहकांना ज्यावेळी गरज असेल, त्यावेळी नियमित
मालाचा पुरवठा केला पाहिजे. व्यवसाय संस्थेने वस्तू मालाची
कृत्रिम टंचाई निर्माण करू नये,
अवैध साठा बाळगू नये, मालाचा काळाबाजार करू नये.
८)तक्रारींची दखल : व्यवसाय संघटनेने कसलाही विलंब न करता ग्राहकांच्या तक्रारीची ताबडतोब दखल घेतली पाहिजे. व्यवसाय संस्थेने ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेण्याकरिता तक्रार निवारण कक्ष (cell) निर्माण केला पाहिजे व त्यामध्ये ग्राहकांच्या सूचनांचे स्वागत केले पाहिजे आणि आवश्यक ते बदल विचारात घेतले पाहिजेत.
९)प्रशिक्षण : व्यवसाय संघटनेने ग्राहक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. संस्थेने संभाव्य ग्राहक व विदयमान ग्राहक यांना मोफत किंवा माफक फी घेऊन वस्तूविषयी व बाजारपेठेविषयी वेळोवेळी प्रशिक्षित केले पाहिजे.
१०) ग्राहकांचे शोषण टाळणे : ग्राहकांचे
शोषण करणाऱ्या अन्याय्य पद्धतींच्या व्यापार पद्धती व्यवसाय
संस्थेने टाळल्या पाहिजेत. काही विशिष्ट परिस्थितीचा त्यांनी
अनाठायी फायदा घेऊ नये, वस्तूची कृत्रिम टंचाई निर्माण करू नये.
बाजारपेठेमध्ये मक्तेदारी निर्माण
करून होणारी स्पर्धा टाळली पाहिजे.
(वरीलपैकी
कोणतेही ५/६ मुद्दे लिहावेत)
(२) समाजाप्रति
व्यवसाय संघटनांच्या असणाऱ्या विविध सामाजिक जबाबदाऱ्या सांगा.
उत्तर
: यासाठी प्र. १४ उपप्रश्न (३) अभ्यासावा.
(३)
गुंतवणूकदारांप्रति व्यवसाय संघटनांच्या असणाऱ्या जबाबदारीचे वर्णन
करा.
उत्तर
: यासाठी प्र. १४ उपप्रश्न (४) मधील मुद्दा (अ) अभ्यासावा.
(४) व्यवसाय
नीतीशास्त्राच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करा.
उत्तर
: व्यवसाय नीतीशास्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत आचारसंहिता
: व्यवसाय नीतीशास्त्र ही एक आचारसंहिता किंवा
नियमांचा संच आहे. हा ‘संच’ समाजाच्या कल्याणासाठी कार्य करण्यासाठी
बनवण्यात आला आहे. ही नियमावली समाज कल्याणासाठी
काय करावे व काय करू नये याचे मार्गदर्शन करते. सर्व
व्यवसाय संस्थांनी आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असते.
२) नैतिक व सामाजिक मूल्यांवर आधारित :
व्यवसाय संस्थेच्या सुरळीत कारभारासाठी व कामकाजासाठी
सामाजिक व नैतिक व्यवसाय मूल्ये
आवश्यक असतात. यामध्ये स्वयंनियंत्रण, ग्राहक संरक्षण आणि कल्याण,
समाजाला सेवा देणे, सामाजिक घटकांना योग्य वागणूक देणे,
इतरांचे शोषण न करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो
३) सामाजिक गटांना संरक्षण देणे : व्यवसाय नीतीशास्त्र (नैतिकमूल्ये व सामाजिक मूल्ये) समाजातील घटकांचे संरक्षण करण्याचे व त्यांना न्याय देण्याचे काम करते. समाजातील विविध घटक म्हणजेच, ग्राहक, कर्मचारी, छोटे व्यावसायिक, शासन, भागधारक, धनको इत्यादी होत.
४) मूलभूत आराखडा प्रदान करते : व्यवसाय
नीतीशास्त्रामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, कायदेशीर, आर्थिक व इतर
वर्तणुकीसंदर्भातील मर्यादा
स्पष्ट केलेल्या असतात. व्यावसायिकाने व्यवसाय सदरच्या मर्यादेमध्येच
चालवला पाहिजे.
५) स्वयंस्फूर्ती : व्यावसायिकाने नीतीशास्त्राचा स्वत:हून,
स्वयंस्फूर्तीने स्वीकार केला पाहिजे, दबावाने किंवा लादल्यामुळे
नीतीशास्त्राचे पालन होणार नाही. केवळ कायदयाच्या बंधनानेही
ते होणार नाही.
६) शिक्षा व मार्गदर्शनाची गरज : व्यवसाय
नीतीशास्त्राचा अवलंब करण्यापूर्वी (ओळख होण्यापूर्वी)
व्यावसायिकाला नीतीशास्त्राचे शिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळाले
पाहिजे. असे योग्य मार्गदर्शन व शिक्षण मिळाल्यास तो नीतीशास्त्राची
अंमलबजावणी करण्यास स्वत:हून प्रेरित होईल.
७) संबंधित संज्ञा/संकल्पना : व्यवसाय
नीतीशास्त्र ही सापेक्ष संज्ञा आहे.
जसा समाज असेल, देश असेल, त्यानुसार तेथील सामाजिक
मूल्यांमध्ये बदल होत असतो. नीतीशास्त्राची अंमलबजावणी बदलते.
एका देशात जे चांगले आहे ते दुसऱ्या देशात चांगले असेलच असे
नाही. कदाचित दुसऱ्या देशात त्यावर बंदी असू शकते.
८) नवीन संज्ञा : व्यवसाय नीतीशास्त्र ही
अगदी नवीन संकल्पना समाजात,
व्यवसायात रूढ झालेली आहे. ही संज्ञा विकसित देशांमध्ये कटाक्षाने
अंमलात आणली जाते. परंतु विकसनशील व अविकसित देशात
मात्र अद्याप त्याची तेवढ्या प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात
नाही.
(५) कॉर्पोरेट
सामाजिक जबाबदारी म्हणजे काय?
उत्तर
: अर्थ : कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अलिकडील काळातील
व सर्वांना नवीन व्यवस्थापकीय जबाबदारी आहे व त्याचा समाजजीवनावर
सकारात्मक परिणाम दिसून येतो. ही संज्ञा संकल्पना स्वयंनियंत्रित
प्रतिमान असून जागतिक कल्पना आहे. ही कल्पना कंपनीला सामाजिकदृष्ट्या जबाबदार व उत्तरदायी बनवते व तिचे
हे उत्तरदायित्त्व स्वत:साठी, भागधारकांसाठी व
सर्वसामान्य जनतेसाठी असते.
सामाजिक जबाबदारीचे पालन करताना समाजाच्या आर्थिक, सामाजिक
व पर्यावरणीय दृष्टिकोनाबाबत अतिशय जागरूक राहते.
व्याख्या
: संयुक्त राष्ट्रांची औदयोगिक विकास संघटना (UNIDO)
यांच्या
मते, “कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची संज्ञा आहे, जिथे कंपन्या
त्यांच्या व्यावसायिक कामकाजात सामाजिक व पर्यावरणीय समस्यांबाबत एकरूप असतात आणि
त्यांच्या भागधारकांच्या बरोबर संवाद साधतात."
(१) कंपनी कायदा २०१३ मधील कलम १३५, कंपनीचे
(कंपन्यांची सामाजिक जबाबदारी धोरण) नियम २०१४ नुसार, ज्या कंपनीच्या निव्वळ
मालमत्तेचे मूल्य हे १५०० कोटी रूपये किंवा त्यापेक्षा जास्त किंवा र १००० कोटी वा
त्यापेक्षा जास्त उलाढाल आहे किंवा निव्वळ नफा र १५ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त
आहे (एका आर्थिक वर्षामध्ये), अशा कंपनीच्या संस्था संचालकांनी "कंपन्यांची
सामाजिक जबाबदारी समिती' स्थापन करणे १ एप्रिल १ २०१४ पासून बंधनकारक आहे.
(२) मंडळाच्या अहवालात (CSR)
कमिटीची
रचना जाहीर करणे आवश्यक आहे.
(३) सामाजिक धोरणाचा एक भाग म्हणून सर्व
कंपन्यांनी आपल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या किमान २% नफा प्रत्येक आर्थिक
वर्षामध्ये खर्च केला पाहिजे. तसेच CSR समितीमध्ये
चार संचालक असतात. वर्षातून किमान दोन सभा होणे आवश्यक असते. या सभेमध्ये कार्ये,
धोरणे यावर चर्चा होऊन औपचारिक धोरण ठरवले जाते.
(४) कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची कार्ये
पुढीलप्रमाणे सांगता येतील :
(१)
उपासमारी/भूक,
दारिद्र्य व कुपोषण यांच्या निर्मूलनासाठी कार्य करणे तसेच आरोग्य व सफाईकडे लक्ष
देणे.
(२)
शिक्षणाला
उत्तेजन देणे व रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे. लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी
सर्वतोपरी प्रयत्न करणे.
(३)
बालमृत्यूदर
कमी करणे व मातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अल्पखर्चात औषधांचा पुरवठा करणे.
(४)
शाश्वत
(टिकाऊ/कायमस्वरूपी) पर्यावरणाची खात्री देणे, पर्यावरणाचे संतुलन, दुर्मीळ
वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण, कृषी व जंगल संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन
आणि जमीन, हवा व पाणी यांचा योग्य दर्जा राखणे.
(५)
व्यावसायिक
कौशल्ये विकसित करून रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी.
(५)
दंडात्मक कारवाई : सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीचे पालन न करणाऱ्यास शिक्षा –
असा दंड ₹ ५०,००० पेक्षा कमी नसतो. कर्तव्ये पूर्ण न केल्यास ₹ २५ लाखपर्यंत दंड
होऊ शकतो व अशी चूक ज्या अधिकाऱ्याकडून झाली त्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची
शिक्षा होऊ शकते. तसेच ₹ ५०,००० पर्यंत दंड होऊ शकतो व हा दंड ₹ ५ लाखपर्यंत वाढून
दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात.
६) व्यवसाय संघटनेची
मालकांप्रति असणारी जबाबदारी स्पष्ट करा.
उत्तर
: व्यवसाय संघटनेची मालकांप्रति असणारी जबाबदारी पुढीलप्रमाणे
स्पष्ट करता येईल :
१) माफक नफा : व्यवसाय संघटनेने,
संघटनेच्या पुढील प्रगतीसाठी व विस्तारासाठी माफक किंवा पुरेसा नफा
मिळवण्याचा केला पाहिजे. त्यामुळे व्यवसायाला आर्थिक स्थैर्य
प्राप्त होते.
२) व्यवसाय संधीचा शोध : व्यवसाय संधी
म्हणजे, व्यवसायाच्या वाढीसाठी, विस्तारासाठी उपलब्ध
व्याप्ती किंवा विविध पर्याय होय.
व्यावसायिकाने सतत या संधी बारकाईने शोधल्या पाहिजेत व
त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. व्यवसायाच्या यशासाठी ते अत्यंत आवश्यक असत.
३) भांडवलाचा पर्याप्त वापर : व्यवसाय
संघटनेने उपलब्ध भांडवलाचा अत्यंत काळजीपूर्वक व कार्यक्षम उपयोग केला पाहिजे. व्यवसायातील धोक्यांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले
पाहिजे. भांडवलाच्या सुरक्षेकडे
व्यवस्थापनाने विशेष लक्ष दिले पाहिजे.
४) कमीत कमी अपव्यय : व्यवसाय
व्यवस्थापनाने व्यवसाया- मध्ये वेळ,
पैसा, मनुष्यबळ यांचा अपव्यय टाळण्याचा कटाक्षाने प्रयत्न केला
पाहिजे. कारण हा अपव्यय टाळल्यास व्यवसाय संस्थेचा नफा वृद्धींगत
होऊ शकतो.
५) कार्यक्षम व्यवसाय : व्यवसाय संघटनेने
उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर केला पाहिजे. उदा., वीज, पाणी,
इंधन, कच्चा माल इत्यादी संसाधनांचा पर्याप्त उपयोग केल्यामुळे
व्यवसायाची कार्यक्षमता, उत्पादकता व
नफा यांमध्ये वाढ होते.
६)भागबाजारामध्ये योग्य व्यवहार : भागबाजाराशी संबंधित सर्व अयोग्य प्रथा (व्यवहार) व्यवसाय संघटनेने टाळल्या पाहिजेत. जसे, चुकीची व गुप्त माहिती पुरवणे, कृत्रिमरीत्या भागांच्या किमतीत वाढ किंवा घट करून लाभ मिळवणे या सर्वांमुळे सामान्य भागधारकांचे नुकसान होते.
७) विस्तार व विविधता (वैविधता) :
व्यवसाय संघटनेने आपली आर्थिक
स्थिती अधिक भक्कम करण्यासाठी सतत विस्तारीकरणाच्या, विकासाच्या,
व्यवसायात विविधता आणण्याच्या योजना राबवल्या पाहिजेत.
व्यवसायाने सातत्याने संशोधन व विकास कार्यक्रम राबवले पाहिजेत.
त्यामुळे बाजारातील कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेला यशस्वी- पणे
सामोरे जाण्याची क्षमता प्राप्त होते.
८) ठरावीक मुदतीत माहिती : प्रत्येक
व्यवसाय संस्थेला हे बंधनकारक
असते की, संस्थेने आपल्या आर्थिक स्थितीबाबत पूर्ण व
अचूक माहिती आपल्या मालकांना पुरवली पाहिजे. आर्थिक परिस्थितीविषयक
माहिती, वेळच्या वेळी अहवाल, परिपत्रके इत्यादी माध्यमांतून
दिली पाहिजे.
९) मालकांच्या निधीचा प्रभावीपणे वापर : व्यवसाय संस्थेने मालकांनी किंवा भागधारकांनी संस्थेकडे दिलेल्या निधीचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे, लाभकारक उपयोग केला पाहिजे. कारण त्यामुळे व्यवसाय संस्थेला अल्पकालीन व दीर्घकालीन लाभ मिळत राहतात.
१०) नावलौकिक निर्माण करणे : भागबा जारामध्ये योग्य सन्मान व विश्वास प्राप्त करण्यासाठी व्यवसाय संस्थेने आपली सार्वजनिक प्रतिमा उत्तम रितीने विकसित केली पाहिजे. कारण चांगला नावलौकिक असलेली संस्थाच/कंपनी भागधारकांचा विश्वास संपादन करू शकते.
प्र. १४ पुढील
प्रश्नांची उत्तरे लिहा . (प्रत्येकी ८ गुण)
१) कर्मचाऱ्यांप्रति
असणाऱ्या व्यवसायाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा.
उत्तर
: कर्मचाऱ्यांप्रति असणाऱ्या व्यवसायाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे
विशद करता येतील :
१)नोकरीची सुरक्षितता : नोकरीची सुरक्षितता
कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मानसिक स्थिरता प्रदान करते.
नोकरीची हमी व सुरक्षितता प्राप्त झाल्यास कर्मचारी अधिक
लक्षपूर्वक, पूर्ण ताकदीने व
जबाबदारीने काम करू लागतात. व्यवसाय संस्थेने कर्मचारी कायम होण्याची
निश्चित रूपरेषा ठरवली पाहिजे व त्यानुसार त्यांना कायम केले
पाहिजे. यामुळे कर्मचाऱ्यांची संस्थेच्या प्रति निष्ठा आणि नैतिक धैर्य उंचावते.
२) योग्य मोबदला : व्यवसाय संस्थेने
कामाचे स्वरूप, शैक्षणिक पात्रता,
अनुभव इत्यादी बाबी विचारात घेऊन कर्मचाऱ्यांना योग्य व आकर्षक
वेतन, बोनस, जादा कामाचे वेतन, वैदयकीय भत्ता यांसारखे आनुषंगिक
व प्रोत्साहनपर लाभ देणे आवश्यक असते. व्यवसाय संस्थेने
वेतन नियोजन करून वार्षिक पगारवाढ व सुधारित वेतनश्रेणी दिली
पाहिजे, यामुळे त्यांचा काम करण्याचा उत्साह टिकून राहील.
३)आरोग्य व सुरक्षितता उपाय : व्यवसाय संस्थेने
कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या
पाहिजेत. सुरक्षितता, योग्य प्रकाश
व खेळती हवा, स्वच्छ पिण्याचे पाणी, उपाहारगृह, निवास,
वैदयकीय सुविधा पुरवणे आवश्यक आहे. यंत्राची योग्य व वेळीच
देखभाल, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. व्यवसाय
संस्थेने सुरक्षेसाठी साधने जसे, हातमोजे, पादत्राणे, शिरस्त्राणे, चश्मे, मुखवटे इत्यादी पुरवली पाहिजेत.
४) कामाची सुयोग्य स्थिती : व्यवसाय
संस्थेने कामाच्या ठिकाणी योग्य व प्रसन्न वातावरण ठेवले पाहिजे.
पुरेसा प्रकाश, खेळती हवा, स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवले पाहिजे.
व्यवसाय संस्थेने आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन हवा, पाणी आणि ध्वनी
प्रदूषण रोखले
पाहिजे. कामाचे योग्य तास निश्चित
केले पाहिजेत. विश्रांतीची वेळ,
भोजनाची वेळ निश्चित केली पाहिजे.
५) कामगार संघटनांना मान्यता : कामगारांनी संघटनेमध्ये भाग घेण्याच्या अधिकाराला व्यावसायिक संघटनेने मान्यता दिली पाहिजे. मोठ्या प्रमाणात प्रतिनिधीत्व करणाऱ्या कामगार संघटनेला सुद्धा मान्यता दिली पाहिजे. व्यवसाय संस्थेने ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाचा अवलंब करू नये. कामगार संघटनांबरोबर, समोरासमोर चर्चा करून समस्यांमधून मार्ग काढला पाहिजे. व्यवसाय संस्था व कामगार दोघांच्याही हिताच्या दृष्टीने संप, टाळेबंदी टाळली पाहिजे. व्यवसाय संस्थेने औदयोगिक शांतता टिकवण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
६) शिक्षण व प्रशिक्षण : व्यवसाय
संस्थांनी कर्मचाऱ्यांना कामाचे योग्य शिक्षण व प्रशिक्षण
देण्याचे कार्यक्रम आयोजित केले
पाहिजेत. कर्मचाऱ्यांना अलिकडच्या प्रगतीबाबत अदययावत
ठेवण्यासाठी व्यवसाय संस्थेने सुरुवातीचे प्रशिक्षण, रिफ्रेशर ट्रेनिंग (नवीन ज्ञान शोधण्यासाठी) योजले पाहिजे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो
व कार्यक्षमतेतसुद्धा वाढ होते.
७) कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग : व्यवसाय संस्थेने कामगारांना कार्य समितीमध्ये प्रतिनिधीत्व देणे. दर्जावर्तुळ कार्यक्षमता सुधारण्यासाठी व खर्चाची बचत करण्यासाठी विधायक सूचना कामगारांकडून मागवणे आवश्यक असते. तसेच नफ्यातील काही भाग कामगारांना देणे, बोनस देणे, समान हिश्श्याची भागीदारी देणे, कामगारांकडून संचालक प्रतिनिधी निवडणे इत्यादीद्वारे व्यवस्थापनात सहभाग होण्यास प्रोत्साहन देणे व्यवसाय संघटनांकडून अपेक्षित असते. यामुळे कर्मचारी व व्यवस्थापनात सलोख्याचे संबंध निर्माण होतात.
८) बढती आणि करिअर (रोजगार) संधी : व्यवसाय संघटनेने पूर्ण अर्हता असलेल्या व अत्यंत बुद्धिमान कर्मचाऱ्यांना बढतीच्या पुरेशा संधी देणे आवश्यक असते. बढती मिळवण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, कौशल्ये व अनुभव याविषयी योग्य माहिती व्यवसाय संस्थेने दिली पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव निर्माण होऊन प्रामाणिकपणे काम करण्यास प्रेरित होतात.
९) योग्य तक्रार निवारण पद्धती : व्यवसाय संस्थेने कामगारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी योग्य तक्रार निवारण कार्यपद्धती अंमलात आणली पाहिजे. आपल्या तक्रारीची दखल घेऊन त्याप्रमाणे शोध करून, तक्रार निवारण करण्यासाठी आवश्यक असलेली कृती केली जात आहे, अशी कर्मचाऱ्यांना खात्री पटली पाहिजे. कामगारांच्या अडचणी व तक्रारींचा व्यवस्थापनाने व्यवस्थित शोध घेतला पाहिजे व त्या सोडवण्यासाठी आवश्यक ते उपाय योजले पाहिजेत.
१०)
इतर:
१)
व्यवस्थापनाने सर्व कर्मचाऱ्यांना समानतेची वागणूक दयावी.
२)
कर्मचाऱ्यांमधील विशेष कौशल्ये ओळखून त्यांचे योग्य वेळी कौतुक
केले पाहिजे व त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
३)कर्मचाऱ्यांसाठी कायदेशीर आचारसंहिता स्पष्ट
स्वरूपात लागू केली पाहिजे
४) कर्मचाऱ्यांची ध्येये ओळखून परिपूर्ण
व चांगले काम करणाऱ्यांना योग्य संधी दिली पाहिजे.
५) सर्व कर्मचाऱ्यांच्या धार्मिक,
सामाजिक व राजकीय हक्कांचे रक्षण
केले पाहिजे.
६) आपल्या व्यवसाय संघटनेत अनौपचारिक,
पारिवारीक स्नेह संबंध निर्माण करून ‘संस्था एक कुटुंब’ ही भावना कर्मचाऱ्यांमध्ये रूजवली पाहिजे.
(२) सामाजिक जबाबदारी
या संज्ञेची व्याख्या लिहा आणि सामाजिक जबाबदारीची काय गरज आहे ते सांगा.
उत्तर
: अर्थ : समाजाच्या हिताचे रक्षण करणे ही व्यवसाय संस्थेच्या
व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. व्यवसायाच्या समाजाप्रति असणाऱ्या
जबाबदारीलाच ‘सामाजिक जबाबदारी’ म्हणतात. कोणताही व्यवसाय
पर्यावरणाशिवाय टिकून राहू शकत नाही. त्यासाठी आवश्यक असणारे
मनुष्यबळ, यंत्रसामग्री, साहित्य इत्यादी समाजातूनच मिळतात. व्यवसायाची
सर्व कार्ये समाजाच्या कोणत्याही घटकाला नुकसानकारक न
ठरता समाजाच्या हिताचे संरक्षण करणारी असणे आवश्यक आहे.
व्याख्या :
डॉवर्ड डी. बोबेन यांच्या मतानुसार, “सामाजिक जबाबदारीने
निर्णय घेणाऱ्या अशा धोरणांचा पाठपुरावा करावा किंवा अशा
कार्यप्रणालीचे अनुकरण करावे जी आपल्या समाजाच्या उद्दिष्टांची
व मूल्यांची जोपासना करते.” थोडक्यात, समाजाच्या हितासाठी
व्यवसाय संस्थेच्या स्वेच्छेने कामे करणाऱ्या अनेक घटकांचा सामाजिक
जबाबदारीमध्ये समावेश होतो.
सामाजिक
जबाबदारीची गरज :- पुढील मुद्द्यांच्या आधारे सामाजिक जबाबदारीची गरज स्पष्ट करता येईल.
१) विश्वस्त – संकल्पना : विश्वस्त ही
संकल्पना आर्थिक व सामाजिक तत्त्वज्ञान स्पष्ट करणारी आहे व हा विचार
सर्वप्रथम महात्मा गांधी यांनी पुढे आणला. विश्वस्त संस्था
समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असतात व म्हणून
व्यावसायिकांना समाजाचे विश्वस्त
मानले जाते.
२) समाजाच्या बदलत्या अपेक्षा : गेल्या
काही वर्षात सामाजिक मागणीच्या
स्वरूपामध्ये बदल झाला असून व्यवसायाने अनुकूल
प्रतिसाद दयावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. कारण व्यवसायाचे
अस्तित्व व प्रगती सामाजिक पाठिंब्यावर अवलंबून असते. म्हणून
व्यवसायाने सामाजिक हिताचे संवर्धन केले पाहिजे. समाजाच्या बदलत्या
अपेक्षेप्रमाणे व्यवसायाने अनुकूल प्रतिसाद दिला पाहिजे.
३) नावलौकिक/प्रतिष्ठा : समाजामध्ये
आपल्या व्यवसाय प्रतिमा तयार करून समाजाचा पाठिंबा मिळवणे, हे त्याला प्रत्येक
व्यावसायिक संस्थेला आवश्यक आहे. सामाजिक जबाबदारी योग्य
प्रकारे पार पाडून हे साध्य करता येते. जी व्यावसायिक संस्था कर्मचारी,
ग्राहक, यांना योग्य महत्त्व देते व समाजहितासाठी सदैव कार्यरत
असते, अशा संस्थेविषयी समाजाच्या मनात मोठा आदर असतो
व त्यांना समाजाचा पाठिंबा मिळतो.
४) पर्यावरणाचे संरक्षण : व्यावसायिक संस्थांनी राष्ट्राच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा दुरुपयोग करू नये, ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. तसेच व्यावसायिक संस्थांनी पर्यावरणीय प्रदूषण करू नये. संस्थांचे उदयोग पर्यावरणस्नेही असले पाहिजेत. व्यावसायिक संस्था प्रदूषणासाठी कारण ठरू नयेत. जसे, जलसंपत्ती दूषित होणे, वातावरणातील ओझोनचा थर कमी होणे इत्यादी. या प्रकारच्या प्रदूषणांमुळे लोकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात आणि मानवी अस्तित्व धोक्यात येते.
५) संसाधनांचा पर्याप्त वापर :
सर्वसाधारणपणे, व्यावसायिक संस्थेकडे
मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा, बौद्धिक कौशल्य, कार्यात्मक नैपुण्य
इत्यादींसारखी अतिरिक्त संसाधने उपलब्ध असतात. अशा अतिरिक्त
संसाधनांचा उपयोग व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि समाजहितासाठी
करणे ही अशा संस्थेची जबाबदारी असते. संसाधनांचा अपव्यय
व्यवसाय संस्थांनी टाळला पाहिजे.
६) कामगार संघटनांचा दबाव : कामगारांना
आता आपले हक्क आणि अधिकार यांची जाणीव झाली आहे. आपल्या
परिश्रमातून संस्थेला नफा होतो, हे कामगारांना समजले आहे.
म्हणून ते पगार, ते बोनस,
व्यवस्थापनातील प्रतिनिधीत्व आदी मागण्या व्यवस्थापनासमोर ठेवून
त्यांच्याशी संघर्ष करतात. पुष्कळदा कामगार संघटनेच्या मध्यस्थीमुळे
व्यवस्थापन व कामगार यांचे संबंध बिघडतात. त्यामुळे व्यवसाय
संस्थेने कामगारांप्रति आपली जबाबदारी ओळखून, त्यानुसार निर्णय
घ्यावेत.
७) ग्राहक चळवळींची वाढ : संघटित ग्राहक
आपल्यावरील अन्याय सहन करू शकत नाही. अशाप्रकारे ग्राहक चळवळ
ही व्यावसायिकांना चांगल्या दर्जाच्या वस्तूंचे
उत्पादन करण्यास व त्या
वस्तू
रास्त भावात विकण्यास भाग पाडते. तसेच कायदेशीर व नैतिक दबाव
निर्माण करते. ग्राहकांमध्ये त्यांचे हक्क व अधिकार यांची जाणीव
निर्माण करते. म्हणून व्यावसायिकांनी आपली जबाबदारी स्वीकारून
उचित व्यापारी प्रथा व ग्राहकांभिमुख धोरणांचा अवलंब केला
पाहिजे.
८) शासकीय नियंत्रण : शासनाच्या
नियंत्रणाच्या, दबावाच्या प्रभावामुळे
व अधिग्रहणाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी व्यवसाय संस्था
आपले उदयोग कायदेशीर नैतिक व सामाजिक मर्यादेतच चालवतात.
व्यवसाय संस्थांवर नैतिक व कायदेशीर नियंत्रण राहावे म्हणून
शासनाने ग्राहक संरक्षण कायदा १९८६, वायू प्रदूषण कायदा, अन्नभेसळ
कायदा इत्यादींसारख्या कायदयांची निर्मिती केली आहे.
९) सामाजिक दीर्घकालीन
स्वहित : व्यवसाय संस्थांनी जबाबदारीकडे
पूर्ण लक्ष दिले, तर त्यांना दीर्घकालीन विपुल नफा मिळू शकतो.
जर व्यवसाय संघटनांनी कामगार, ग्राहक, भागधारक, शासकीय अधिकारी
आणि समाजातील लोक यांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केले, तर ते
सामाजिक घटक व्यवसाय संस्थांना सहकार्य करणार नाहीत व त्यामुळे
व्यवसायाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते; म्हणून दीर्घकालीन हितासाठी
व्यावसायिक संस्थांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
१०) गुंतागुंतीच्या सामाजिक समस्या :
पुष्कळ वेळा अनेक व्यावसायिक संस्था स्वत:हन काही सामाजिक समस्या
निर्माण करतात. जसे, प्रदूषण समस्या, कामाच्या ठिकाणाची
असुरक्षितता, व्यक्तींमधील भेदभाव
इत्यादी. व्यवसाय संस्थांनी आपली नैतिक व सामाजिक जबाबदारी
ओळखून या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
११) जागतिकीकरण : जागतिकीकरणाच्या अलिकडील
काळात व्यवसायाच्या कक्षा संपूर्ण जगभर विस्तारलेल्या
आहेत. संपूर्ण जग ही बाजारपेठ
बनली आहे. जागतिकीकरणाने व्यवसायाला विविध प्रकारच्या संधी
व आव्हाने पुरवली आहेत. ज्या देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराची व व्यवहारांची आदर्श पद्धत स्वीकारली आहे, त्यांचा
प्रभाव संपूर्ण जगभर पसरला आहे.
१२) माध्यमांची भूमिका : इंटरनेटच्या
वापरामुळे सर्वसामान्य माणसापर्यंत
पोहोचणे सहज शक्य झाले आहे. माध्यमे ही व्यापक व सक्रिय
असल्यामुळे समाजाच्या मोठ्या वर्गावर आपला प्रभाव पाडू शकतात.
व्यावसायिक संस्थांनी चुकीची धोरणे, फसवणूक, अनुचित व्यापार
पद्धती अवलंबल्यास त्याविरुद्ध जागृती निर्माण करण्याचे सामर्थ्य
माध्यमांमध्ये असते. अशा प्रकारे विविध माध्यमे सार्वजनिक जीवनात
सक्रिय व महत्त्वाची भूमिका निभावतात. यामुळे व्यावसायिक संस्था
सामाजिक मूल्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.
(३) समाजाप्रति
मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या, व्यवसाय घटकांच्या सामाजिक जबाबदाऱ्या सांगा.
उत्तर
: व्यावसायिक घटकांच्या समाजाप्रति असणाऱ्या सामाजिक जबाबदाऱ्या
पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील :
१) पर्यावरण संरक्षण : अलिकडील काळामध्ये
प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. उदयोगधंदे, रासायनिक
प्रकल्प, सिमेंट प्रकल्प इत्यादी मोठ्या प्रकल्पांमुळे जल व वायू
प्रदूषण होते. व्यवसाय संघटनांनी
सर्वतोपरी प्रयत्न करून असे प्रदूषण एकतर कमी केले पाहिजे
अथवा त्याचे योग्य रितीने निवारण केले पाहिजे. प्रत्येक व्यवसाय
संघटनेने नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करणे व झाडे लावणे, त्यांचे
जतन करणे अपेक्षित असते.
२) संसाधनांचा जास्तीत जास्त चांगला वापर
: व्यवसाय संस्थांनी मर्यादित संसाधनांचा समाजाच्या
हितासाठीच उपयोग केला पाहिजे.
इंधन, पाणी, कच्चा माल यांसारखी दुर्मीळ नैसर्गिक संसाधने आवश्यकतेनुसार
व काटकसरीने वापरली पाहिजेत. साधने क्रियाशून्यही ठेवू
नयेत व त्यांचे नुकसानही होऊ देऊ नये.
३) मागासलेल्या भागांचा विकास :
उदयोगांचे काही विशिष्ट विभागांमध्ये
केंद्रिकरण होऊ नये. व्यवसाय संघटनांनी देशामध्ये अविकसित
म्हणजेच मागासलेल्या भागात उदयोग व्यवसाय सुरू करावेत.
त्यामुळे त्या भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल व
त्यांची क्रयशक्ती वाढेल. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होईल.
४) दुर्बल घटकांसाठी आरक्षण : व्यवसाय संघटनेने समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांच्या प्रगतीसाठी व्यवसायामध्ये काही जागा राखीव (आरक्षित) ठेवाव्यात अशी व्यवसायांकडून अपेक्षा असते. अविकसित क्षेत्रामध्ये उदयोग सुरू करावेत व रोजगार निर्माण करावा. त्यामुळे त्यांची खरेदी शक्ती (क्रयशक्ती) वाढते. अशा प्रकारे व्यवसाय संघटना दुर्बल क्षेत्राचा विकास करू शकतात.
५) समाज-विघातक कृत्यांना विरोध : व्यावसायिक संस्थांनी समाजविरोधी कार्यामध्ये सहभागी होऊ नये. तसेच मालाची चोरून ने-आण करणाऱ्या व गुन्हेगारी करणाऱ्या समाजकंटकांना साहाय्य किंवा आर्थिक मदत देऊ नये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना लाच देणे गुन्हेगारी जगताशी जवळीक ठेवणे इत्यादी कृत्ये व्यवसाय संघटनांनी टाळावेत.
६) आर्थिक मदत : समाजाला व्यवसाय
संस्थेकडून अनेक कारणांसाठी आर्थिक मदत किंवा देणगीची अपेक्षा
असते. दारिद्र्य- निर्मूलन, अशिक्षितता इत्यादी समाजकल्याणाच्या
उपक्रमांना मदत केली पाहिजे. अंमली पदार्थ विरोधी मोहीम, ध्वनी
प्रदूषण विरोधी मोहीम इत्यादी समाज जागृती करणाऱ्या उपक्रमांसाठी
आर्थिक मदत करावी अशी समाजाची अपेक्षा असते.
७) अतिदाट गर्दी रोखावी : समाजाची अशी
अपेक्षा असते की, उदयोगधंदयांचे शहरांमध्ये केंद्रिकरण टाळले जावेत.
उदयोगधंदे वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेले असावेत. शक्यतो
उदयोगधंदयांची स्थापना प्रामुख्याने त्यांच्यासाठी राखीव
असलेल्या “औदयोगिक क्षेत्रात’ (Industrial
estate) मध्येच
करावी व रहिवासी भागांवर होणारे
प्रतिकूल परिणाम टाळावेत व शहरातील होणारी गर्दी रोखावी.
८) रोजगार निर्मिती : व्यवसाय संस्थांनी योग्य शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उच्च शिक्षित तरुणांना योग्य रोजगाराच्या संधी पुरवल्या पाहिजेत. व्यवसाय संस्थांनी आपल्या व्यवसायाचा विकास व विकेंद्रिकरण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. यामुळे समाजातील बेकारी व दारिद्र्य दूर होईल.
(४)
गुंतवणूकदारांप्रति असणाऱ्या व शासनाप्रति असणाऱ्या व्यवसायाच्या
जबाबदाऱ्या स्पष्ट करा.
उत्तर
: (अ) गुंतवणूकदारांप्रति असणाऱ्या जबाबदाऱ्या :
१) सभांचे योग्य नियमन : व्यवसायातील
आर्थिक घडामोडींची माहिती घेण्यासाठी जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हा
व्यवसाय संस्थेने गुंतवणूकदारांची सभा आयोजित केली पाहिजे.
योग्यवेळी सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठवली पाहिजे. आर्थिक
कठीण प्रसंगी गुंतवणूकदारांना विश्वासात घेतले पाहिजे. तसेच
अपयशाची कारणे त्यांना विश्वासात घेऊन सांगितली पाहिजेत.
२) गुंतवणुकीवर मोबदला : गुंतवणूकदार
व्यवसाय संस्थेमध्ये भागभांडवलात
किंवा कर्जरोखे स्वरूपात पैसे गुंतवून धोका स्वीकारतात. गुंतवणूकदारांना
त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य व्याजदर नियमितपणे मिळणे
आवश्यक असते व त्यासाठी – (१) त्यांना गुंतवणुकीवर योग्य
परतावा मिळावा. (२) त्यांची गुंतवणूक व्यवसायात सुरक्षित असल्याची
खात्री व्हावी. (३) व्यवसायात सतत प्रगती होत आहे याची खात्री वाटावी.
४) तक्रारी हाताळणे : व्यवसाय संस्थेने
गुंतवणूकदारांच्या अडचणी व तक्रारी
प्राधान्य क्रमाने विचारात घेणे व त्या सोडवणे आवश्यक असते.
गुंतवणूकदारांच्या तक्रारी सोडवण्याची एक सूत्रबद्ध पद्धती व्यवसायाने
राबवली पाहिजे व गुंतवणूकदारांच्या तक्रारीवर समाधानकारक
तोडगा काढला पाहिजे. व्यवस्थापनाने गुंतवणूकदारांच्या सर्व
शंकांचे समाधानकारक निरसन केले पाहिजे.
५) पारदर्शकता राखणे : गुंतवणूकदार
व्यवसाय संस्थेकडे व्यवसाय कार्यक्षमपणे चालवण्यासाठी दीर्घमुदतीचे व
खेळते भांडवल पुरवत असतात. त्यामुळे व्यवसाय संस्थेने
व्यवसायामध्ये आर्थिक कारभारात
उच्च प्रतिची पारदर्शकता राखली पाहिजे.
६) माहिती योग्यरितीने प्रकट करणे :
व्यवसाय व्यवस्थापनाने भागधारक व
गुंतवणूकदारांना संपूर्ण वस्तूस्थितीवर आधारित माहिती पुरवली
पाहिजे. गुंतवणूकदारांना ही माहिती अहवाल, परिपत्रके, नफा- तोट्याबाबतची
निवेदने या स्वरूपात वेळोवेळी पाठवली पाहिजे. त्यामुळे
गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक सुरक्षित असल्याची खात्री पटते
व यापुढेही ते आपली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतील.
७) प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे :
व्यवसाय संस्थेने आपली मजबूत आर्थिक स्थिती (Solvency),
नावलौकिक,
प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे. कारण या आधारावरच ते
गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करू
शकतात. कंपनी सर्व प्रकारची कर्जे फेडण्यास सक्षम आहेत,
असा नावलौकिक मिळवला पाहिजे. कंपनीने व्यवसायात संशोधन
व विकास, नवीन बदल व विस्तार यासाठी सातत्याने प्रयत्न केले
पाहिजेत.
(ब)
शासनाप्रति समाजाची जबाबदारी
(१)
नियमितपणे कर भरणा : व्यवसाय संस्थेने शासनाचे विविध कर
जसे, विक्री कर, उत्पन्न कर, संपत्ती कर, उत्पादन शुल्क, कंपन कर वेळच्या वेळी नियमितपणे शासनाकडे भरणा केले
पाहिजेत. कारण या कर स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नातून शासन
लोकोपयोगी प्रकल्प हाती घेऊ शकते.
(२) नियम व कायदयाचे पालन : व्यवसाण
संस्थेगे, शासनाने व्यवसाय संचालकासाठी वेळोवेळी तयार केलेले कायदे व
निया गांचे संतोतंत पालन केले पाहिजे. विशिष्ट व्यवसायासाठी
परतावा मिळवणे, व्यवसायाची कार्यप्रणाली, वस्तूची किंमत निश्चिती,
उत्पादन पद्धती यांबाबत शासनाने केलेल्या नियमांचे पालन करून
व्यवसाय कायदेशीर मार्गानी चालवला पाहिजे.
(३)
परकीय चलन मिळवणे : जास्तीत जास्त परकीय चलन मिळवण्यासाठी
व्यवसाय संस्थेने जास्तीत जास्त निर्यात वाढवण्याचा प्रयत्न
करावा अशी शासनाची अपेक्षा असते. कारण देशामध्ये उदयोग व्यवसाय
जेवढ्या मोठ्या प्रमाणात निर्यात वाढवतील, तेवळे अधिक परकीय
चलन उपलब्ध होऊ शकेल, या परकीय चलनामधून शासन अत्यंत
गरजेच्या व आपल्या देशात उत्पादन न होणाऱ्या वस्तूंची आयात
करू शकेल.
(४) आर्थिक विकास : शासन नेहमी देशाच्या संतुलित आर्थिक विकासासाठी व जलद आर्थिक विकासासाठी ध्येये निश्चित करीत असते. ही शासनाची ध्येये व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी व्यवसाय संस्थेने शासनाला सहकार्य केले पाहिजे.
(५) सामाजिक-आर्थिक धोरणांची अंमलबजावणी :
देशामध्ये सामाजिक व आर्थिक विकास व्हावा अशी शासनाची इच्छा
असते, त्यासाठी शासन काही धोरण ठरवते. व्यवसाय संस्थेने
शासनाला योग्य सूचना केल्या पाहिजेत व सर्वतोपरी सहकार्य केले
पाहिजे व वेळ पडल्यास त्यासाठी निधी पुरवला पाहिजे.
७) शासनाला सूचना करणे : देशाचे आर्थिक
धोरण निश्चित करीत असताना, व्यवसाय संस्थेने शासनाला आपल्या
अनुभवातून, आलेल्या सूचना करणे आवश्यक असते. जसे, औदयोगिक
धोरण, आयात निर्यात धोरण, परवाना धोरण आखणी होताना अशा
सूचना मौल्यवान ठरतात. व्यवसायाभिमुख धोरण आखताना
व्यवसायांच्या सूचना किंवा मार्गदर्शन उपयुक्त ठरते.
८) अनुचित लाभ : व्यवसाय संस्थेने अनुचित
प्रथा पाडू नयेत व तसे लाभ उठवू नयेत. उदा., अधिकाऱ्यांना लाच
देणे, अधिकाऱ्यांवर दहशत, दबाव
आणून कामे करवून घेणे अशी कोणतीही गोष्ट व्यवसाय संस्थेने
करू नये.
९) शासकीय कोषागारासाठी योगदान : व्यवसाय संस्थेने देशामध्ये
येणाऱ्या अचानक आपत्ती प्रसंगी, संकट समयी शासनाला देणगी
देऊन मदत केली पाहिजे. जसे, भूकंप, पूर, वादळ, इतर नैसर्गिक
आपत्तीमध्ये शासनाला निधी पुरवला पाहिजे.
लवकर !!!
0 Comments
Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.