खुप सुंदर लेख आहे.......
सुसंस्कृत स्त्रिया ज्या घरात असतात,तिथे उत्तम संस्कार होतात व अशा कुटुंबात कधीच गरीबी येत नाही.
१) आपआपल्या धर्म मार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री...
जी स्त्री दररोज भगवंताचे व तुळशीची पूजा करते व त्याच बरोबर दररोज घरामध्ये देवाजवळ व तुळशी जवळ दिवा लावते व स्वयंपाक झाला की अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवते,व नंतर सर्वजण भोजन करतात या स्त्री मुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते व अशा वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व आनंदी असते...
२) समाधानी वृत्ती........
जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते,जास्त हव्यास करीत नाही तिचा पती देखील तिच्यावर आनंदी असतो, काही स्त्रीया जर शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असे वर्तन करतात. यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतींच्या नाकीनव येतात व कधी कधी त्यांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला कठीण व वाईट कामे देखील करावी लागतात व त्यामुळे त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात.म्हणून जर स्त्री समाधानी असेल व तिच्या गरजा लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीला देखील जास्त कष्ट करावे लागत नाही व घरातील वातावरण आनंदी व समाधानी राहते...
३) स्त्री मध्ये धैर्य असावे,धाडस असावे… कोणतीही परिस्थिती असली तरी देखील न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद स्त्रीमध्ये असावी व कितीही वाईट परिस्थिती असली तरी स्त्री भक्कम पणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असायला हवी. जर अशी सय्यमी,धैर्यवान, जबाबदार आणि धाडसी स्त्री घरामध्ये असेल तर वाईट परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही...
४) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राग न येणे….
पाहायला गेले तर हा गुण असणाऱ्या स्त्रिया मिळणे अवघड आहे,कारण राग येणे हा स्त्री चा जन्मताचाच स्वभाव असतो. परंतु अति राग करणे, चिडचिड करणे, कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत, थोडा फार राग सर्वच स्त्रियांना येतो व तो यायलाच हवा. त्या रागाचा आतल्या आत मोठा साठा होऊन कधीतरी त्याचा मोठा स्फोट होऊ शकतो व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून जर स्त्री सारखी राग राग करीत असेल किंवा चीड चीड करीत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व भांडणे आणि वाद विवाद होत राहतात म्हणून स्त्रीने संयमित व शांत असावे.
५) समजूतदारपणा असावा ........
स्त्री प्रत्येक गोष्टीत समजूतदार पणाने घेते व शांत पणे सर्व समजून घेते, जे आहे ते आहे व जे नाही ते नाही याचा शांतपणे विचार करून स्वीकार करते तसेच सर्वांशी चांगले वागते, गोड बोलते, त्यामुळे ते घर देखील सुखी व आनंदी असते, ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते, ती सर्वांशी चांगले बोलून त्यांच्यातील संबंध अधिक चांगले बनवते आणि सर्वांना समजून घेते त्यामुळे वेळ प्रसंगी ते सर्व लोक तिच्या कुटुंबियांसाठी धावून येतात...
शेवटी जिथे कलह नाही, घरातील सर्व सदस्य एकोप्याने राहतात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात, स्वच्छतेचं पालन करतात अशा ठिकाणी सुख,शांती, समृद्धी आणि सफलता सदैव नांदत असते.
|| श्री स्वामी समर्थ ||
0 Comments
Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.