2023 मध्ये तुर्कीमध्ये भयानक भूकंप झाला होता. हजारो लोक मृत्युमुखी पडले होते.हजारो म्हणजे कमीत कमी 50,000 लोक मिळे होते. संपूर्ण जग तटस्थपणे पाहत होतं पण भारताने ताबडतोप ऑपरेशन दोस्त सुरू केलं आमचे एनडीआरएफ जवान डॉक्टर आणि मदतीचा सारा ताफा तुर्कीमध्ये पोहोचला. कुठलाही राजकीय विचार न करता एक मानवताचा संदेश देत.
त्याच तुर्कीने मग भारताच्या या उपकाराची परतफेड कशी केली तर पाकिस्तानने पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांची हत्या केल्यानंतर भारताने पाकिस्तान मधले दहशतवादाचे तळ उद्ध्वस्त केले त्यावेळी याच तुर्कीन पाकिस्तानला आपले ड्रोन आणि मिसाईल वापरायला दिले भारतावर हल्ला करण्यासाठी तुर्की पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे या युद्धात उभा राहिला त्यांनी भारताच्या या मिसाईल अटॅकचा निषेध देखील केला पण भारताबरोबर पंगा घेणं आता आता 21साव्या शतकात इतकं सोपं राहिलेल नाही तुर्कीने पंगा घेतला पण त्याची किंमत त्यांना आता चुकवावी लागते आहे आणि आता ते ऑलरेडी गुडघ्यावर बसलेले आहेत नक्की काय काय घडलंय आणि भारतान तुर्कीला कसं वाकवलय तेही एक आठवड्याभरात ते थोडक्यात सांगतो मी आहे.
तुर्की हा देश कुठे आहे युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांना जोडणारा एक छोटासा पूल आहे असा हा देश आहे ज्याचा मोठा भाग हा आशियात आहे तर थोडासा भाग युरोपमध्ये आहे म्हणजे असा हा एक दोन्ही खंडामध्ये असणारा हा देश आहे तुर्की तुर्की हा एक इस्लामिक देश आहे पण तो युरोपच्या जवळ असल्यामुळे जवळजवळ एक युरोपियन देशासारखा आहे म्हणजे विकसित वगैरे आहे तो इस्लामिक देश असला तरी पाकिस्तान किंवा अफगाणणिस्तान किंवा इतर इस्लामिक देशांप्रमाणे भिकेला लागलेला देश नाही एक चांगला युरोपियन देश आहे.
7 मे 2025 ला भारतीय लष्करान ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान व पीओके मधल्या नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष केलं आणि त्यावर कारवाई केली देशभरात उत्साह होता आहे कारण ही कारवाई फक्त पहलगामचा बदला नव्हती तर भारताच्या आत्मसन्मानाच हे उत्तर होतं पण याच वेळी तुर्की आणि अरबैजान या दोन मुस्लिम राष्ट्रांनी भारताचा निषेध करत पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला त्यांनी म्हटलं की भारताने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला केलाय आणि निरपराध नागरिकांची हत्या केली निरपराध नागरिक म्हणजे कोण दहशतवादी तुम्ही म्हणाल अरबैजान कुठे आहे तर तुर्कीच्या शेजारी थोडस उजवीकडे हा अर्मेनियाचा गॅप सोडला तर हा अजरबैजान हा देश आहे तुर्की म्हणेल तेच अरबैजान म्हणत असतो या देशाला स्वतःच असं वेगळं मत नाही फक्त भारताचा निषेध करून हे दोन्ही देश थांबले नाहीत.

त्यांनी पाकिस्तानला शस्त्र देखील पुरवली ड्रोन्स पुरवले भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमन पाकिस्तानचे ड्रोन्स पाडले ते ड्रोन्स चेक केल्यानंतर भारताच्या लष्करानेच हा खुलासा असा केला की हे ड्रोन्स तुर्कीने बनवलेले सोंग ड्रोन्स या प्रकारातले आहेत. त्यामुळे तुर्कीचा या युद्धातला उघड सहभाग भारताच्या आणि जगाच्या लक्षात आला.
भारताने 2023 मध्ये केलेल्या उपकाराची जाणीव तुर्की विसरला. तुर्कीच्या या युद्धातला हा रोल उघड झाल्यानंतर भारतात बॉयकॉट तुर्की आणि बॉयकॉट अरबैजान हे ट्रेंड सुरू झाले. भारताचे लोक हे जगातले सर्वात जास्त मोठं असं टरिझम मार्केट आहे आणि भारतीय लोकांनी तुर्की आणि अरबैजान यांना बॉयकॉट करायचं ठरवलं म्हणजे या देशांमध्ये जायचं नाही असं ठरवलं.
इज माय ट्रिप इझिगो वडरऑन कॉक्स अँड किंग्स या ट्रॅव्ल कंपन्यांनी तुर्की आणि अरबैजान बरोबर असलेले आपले करार मोडून काढले टर्किश एअरलाई्स बरोबर आपले जे करार होते जे भागीदारी होती ती मोडून काढली तिथले हॉटेल्स आणि विमानांच बुकिंग घेणं बंद केलं हे केलं नसतं तर फटका या कंपन्यांना देखील बसला असता म्हणून त्यांनी ते बंद केलं अनेक पर्यटकांनी आपली तिकीट रद्द केली
तुर्कीची हॉलिडे बुकिंग जी पॅकेजेस वेबसाईटवर उपलब्ध होती ती सगळी काढून टाकण्यात आली 2024 मध्ये 3.3 लाख भारतीयांनी तुर्कीला भेट दिली जवळपास एक हज कोटी रुपयांची उलाढल फक्त भारतीय पर्यटकांच्याकडून झाली होती दहा वर्षात तुर्कीला जाणाऱ्या भारतीयांची संख्या तीन पट झाली होती. अरबैजानला जाणाऱ्या भारतीयांची संख्या मागच्या दहा वर्षात 50 पट झाली होती. अरबैजान मध्ये 2024 मध्ये 2.43 लाख भारतीय पर्यटक गेले दहा वर्षापूर्वी तिथे फक्त 5oooo भारतीय लोक जायचे. भारत अजरबैजान साठी चौथ्या क्रमांकाचा टॉप टरिस्ट देश आहे.
या कंपनीन ट्विटर वर म्हणजे एक्स वर जे स्टेटमेंट दिले त्यात त्यांनी असं सांगितलं की आमच्या देशाबरोबर आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे एक्झिोन तुर्की आणि अरबैजान आणि चीन या तीन देशांमध्ये हॉटेल्स आणि विमान बुकिंग करणं बंद केलेल आहे. जेव्हा प्रश्न भारताचा येतो तेव्हा आम्ही दुसऱ्यांदा विचार करणं जरुरी समजत नाही.
विशाल मिश्रा नावाच्या एका सिंगरन म्हणजे गायकान आपण आयुष्यात कधीही तुर्कीमध्ये कुठलाही कार्यक्रम करणार नाही असं जाहीर केलय. हर्ष गोयंकांनी देखील तुर्कीवर बहिष्कार टाकायची भाषा केली आहे. म्हणजे सामान्य माणसापासून बिझनेसमॅन पर्यंत सर्वांच एक नक्की झालंय की जो भारताचा शत्रू तो आपला स्वतःचा शत्रू. पुण्यातल्या फळ विक्रेत्यांनी तुर्की कडून भारतात येणारे जे सफरचंद आहेत त्याच्यावर बहिष्कार घातलाय तुर्की भारताला दरवर्षी 160 मिलियन डॉलर्स चे फक्त सफरचंद विकतो तेही तीन महिन्यात त्याच्यावर आता बंदी येणार आहे कारण फळ विक्रेत्यांनी सांगितलं की आम्ही तुर्कीचे सफरचंद घेणार नाही असं लोक स्वतः म्हणतायत त्यामुळे आम्ही ते विकूच शकत नाही.
आता मग या सगळ्याचा परिणाम काय झाला तर तुर्कीच्या टुरिझम डिपार्टमेंटन एक ट्वीट केलय त्यामध्ये त्यांनी भारतीयांना आवाहन केलय की तुम्ही तुमचे प्लॅन पुढे ढकलू नका. तुर्कीमध्ये आम्ही तुमच स्वागत करतो तुर्की अतिशय सेफ आहे इथं तुम्हाला आम्ही चांगली सर्विस देऊ वगैरे पण या गोष्टीला अनेक भारतीयांनी उत्तर देताना सांगितलं की तुमची सर्विस तुमची सेफ्टी या गोष्टींचा आम्हाला फरकच पडत नाही तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा देता तर तुमच्याकडे टरिस्ट पण आता पाकिस्तानशीच येतील आम्ही येणार नाही .
ग्रीस आणि तुर्की हे शेजारी देश आहेत ग्रीस हा देखील एक सुंदर देश आहे त्यामुळे ग्रीक लोक म्हणतात आता तुम्ही तुर्कीमध्ये जाणार नसाल तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला ते सगळं जेऊ तर तुर्की देते पण त्यामुळेच आता लोक तुर्की कॅन्सल करून ग्रीसला चाललेत त्यामुळे तुर्कीच्या टूरिझम मार्केटमध्ये सध्या घबराट आहे
अरबैजानच मार्केट तर नक्की कोलमटणार आहे कारण मागच्या दोन-तीन वर्षात इंस्टाग्राम मुळे अरबैजान भारतात इतकं पॉप्युलर झालं की अझरबैजान मध्ये भारत हा चौथ्या क्रमांकाचा टरिस्ट कंट्री आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं कारण सगळ्यात जास्त भारतीय पर्यटक अरबैजान मध्ये दरवर्षी जात असतात अनेक भारतीयांनी तुर्कीला ट्विटर वर हे देखील सांगितलं की आम्हाला तुर्कीला फिरायला येण्यात इंटरेस्ट नाही कारण जे पैसे आम्ही तुर्कीला देणार त्याच पैशातून तुम्ही आमच्या शत्रूला मदत करणार आणि भारतीयांच रक्त वाहणार, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते की पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही तसं लोकांनीही मग तुर्कीला सांगितलं की टेररिझम आणि टुरिझम एकत्र होऊ शकत नाही तुम्हाला पाकिस्तानची मदत करायची आहे तर ती तुम्ही खुशाल करा पण भारत या तुमच्या दहशतवादाला यापुढे मदत करणार नाही.
मागच्या वर्षी मालदीवच्या एका नेत्यान पंतप्रधान मोदींच्या बद्दल अपशब्द वापरल्यानंतर भारतीयांनी मालदीवला बॉयकॉट केलं होतं त्यानंतर मालदीवला दोन बिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ 16 हजार कोटींचा फटका टुरिझम मध्ये बसला होता कारण त्यानंतर बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सुरू झाला आणि तीच अवस्था आता तुर्कीची होणार आहे. नंतर मालदीवन त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकलं
पण त्यामुळे जास्त काही फरक पडला नाही कारण भारत अशा गोष्टी चटकन विसरत नाही तोपर्यंत नवीन टुरिझम मार्केट भारताने डेव्हलप केलं जसं की लक्षद्वीप श्रीलंका थायलंड वगैरे तुर्कीनही या ठिकाणी फक्त एखादं स्टेटमेंट दिलं असतं तर प्रश्न नव्हता पण तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांनी अत्यंत उघडपणे भारताच्या विरोधात शस्त्र पाकिस्तानला पुरवलेली आहेत त्याचा फटका या दोन्ही देशांना येणाऱ्या काळात बसणार आहे.
यामध्ये आणखी काय काय घडामोडी घडतात किंवा अपडेट्स येतात ते आम्ही तुम्हाला सांगत राहूच पण तुरतास तुर्की भारतासमोर विनंती करायला लागलाय.
आपले मत कमेंट मध्ये जरूर नोंदवा.
0 Comments
Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.