google-site-verification: googlea24dc57d362d0454.html कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्तता.. ......सत्य अनुभव-लक्ष्मण पाटील(आईचे नाव- निर्मला पाटील बदलापूर सेवा केंद्र)

कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्तता.. ......सत्य अनुभव-लक्ष्मण पाटील(आईचे नाव- निर्मला पाटील बदलापूर सेवा केंद्र)

                 

                         सर्व सेवेकऱ्यांना माझ्या आईच्या बाबतीत आलेला अनुभव सांगत आहे. आई जळगाव ला असते आणि आम्ही इथे बदलापूर ला राहतो. आईला दोन वर्षा पासून कँसर सारख्या मोठ्या आजाराने ग्रासले होते. आई ला बदलापूर ला घेऊन आलो आणि उपचार सुरू केले पण दोन वर्षे झाली जास्त काही फरक पडला नाही. आम्ही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र रमेशवाडी येथे नियमित पणे जातो.
                महाराजांच्या चरणी विनंती करत होतो की आईला या आजारातून मुक्त करा. मध्यंतरी आजार जास्त बळावला गेला आणि डॉक्टर ने सांगितले की आता जास्त काळ जगू शकणार नाही कारण कँसर चा प्रादुर्भाव जास्त झाला आहे.आई नेहमी येता जाता स्वामींचे नामस्मरण करायची.
                अचानक एके दिवशी आई म्हणाली मला दिंडोरी ला जायचे आहे. आम्ही विचार केला की एकदा जाऊन बघूया अनेक दुःखी लोकांचे प्रश्न तिथे सुटतात हे ऐकून होतो. आणि ठरल्याप्रमाणे एका रविवारी आम्ही आईला घेऊन दिंडोरी येथे गेलो. सकाळची आरती मिळाली आणि माऊलींचे हितगुज ऐकायला मिळाले. खूप प्रसन्न वातावरण होते.
                 थोड्याच वेळात पालखी सोहळा सुरू झाला आणि आश्चर्य म्हणजे स्वतः आईने उठून पालखी सोहळ्यात सहभाग घेतला आणि स्वतः पालखी ला खांदा दिला. आम्ही सर्व आश्चर्याने थक्क झालेलो. इतके दिवस आजाराने तिला थकवा होता आणि आज स्वतः उत्साहाने पालखी सोहळ्यात रंगून गेलेली.
                 थोड्या वेळानंतर माऊलींकडे आम्ही प्रश्न मांडला व माउलींनी आईला सेवा करायला दिली. घरी आल्यावर आईने सेवा सुरू केली २१ दिवस नियमितपणे सेवा केल्यावर पुन्हा आम्ही तपासणीसाठी हॉस्पिटल ला गेलो. डॉक्टरांनी टेस्ट केल्या आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले.रिपोर्ट एकदम नॉर्मल. डॉक्टर सुद्धा चकित झाले. म्हणाले हे अशक्य आहे. मी म्हणालो " अहो अशक्य ही शक्य करणारे आमचे स्वामी आमच्या पाठीशी आहेत." त्यांच्या मुळेच हा चमत्कार घडला.
                 आज आई या आजारातून पूर्ण बरी झालेली आहे. ही फक्त स्वामी महाराज आणि गुरुमाऊलींची कृपा आहे.तुम्हा सेवेकऱ्यांना सांगू इच्छितो की, आपले प.पु. गुरुमाऊली हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात परमेश्वराचा अवतार आहेत. साक्षात स्वामी महाराज आहेत. दिंडोरी दरबार हा अनेक दुःखी पीडितांसाठी आधार आहे.

                ||गुरुमाऊली सुखाची सावली,गुरुमाऊली कृपेची सावली||


                ह्या अनुभवातून आपल्या लक्षात येईल की,परमपूज्य गुरुमाऊली साक्षात धन्वंतरी आहे. जनकल्याण योजनेतुन आपण आपली देणगी हॉस्पिटलसाठी दिली तर भविष्यात कितीतरी गोरगरीब, गरजू लोकं उपचार घेऊन सुखी होतील.... म्हणून आजच आपला जनकल्याण योजनेत फॉर्म भरून घ्यावा. ही नम्र विनंती

                                         

                                           ||श्री स्वामी समर्थ || 


Post a Comment

0 Comments

Close Menu