google-site-verification: googlea24dc57d362d0454.html
म्हणूनच तिला लक्ष्मी म्हणतात........
भारतामध्ये गाईला फार महत्व आहे. गाय हा असा एकमेव असा प्राणी आहे जिला “गोमाता”
म्हटले जाते. आईच्या नंतर गाईला प्राधान्य दिले गेले आहे. सुरवातीला गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिक विधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा पाळीव प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला आनंद जीवन,
आरोग्य, सुख, शांती,समाधान देतात. अतिशय शांत आणि सौम्य जनावर म्हणजेच गाय. हिंदू धर्मात अतिशय पवित्र आणि पूजनीय मानली गेली आहे.ज्योतिश शास्त्रात तसेच अनेक शास्त्रांमध्ये
गायीची विशेषता दर्शवण्यात आलेली आहे.
१) ज्योतिष शास्त्रामध्ये गोधूली मुर्हूत विवाहासाठी
महत्त्वाचा मानला आहे.
२) जर प्रवास प्रारंभ करताना गाय समोर
दिसली किंवा ती आपल्या बछड्याला दूध पाजताना दिसली तर प्रवास यशस्वी पार पडेल
समजावे.
३) घरात गाय असल्यास वास्तू दोष होत नाही. म्हणूनच तीला गोमाता म्हणतात
४) दररोज सकाळी आपल्या आहारातून एक पोळी पांढर्या गायीला
खायला दिसल्यास शुक्राचे नीचत्व किंवा शुक्र संबंधी कुदोष स्वत: समाप्त होतात.
५) जर एखाद्याला पितृदोष असल्यास गायीला
दररोज किंवा अमावस्येला पोळी, गूळ आणि चारा खाऊ घातल्याने पितृदोषापासून मुक्ती
मिळते.
६) आपल्या जन्मपत्रिकेत सूर्य अशुभ
स्थितीत असल्यास किंवा केतूमुळे समस्या येत असल्यास गायीची पूजा करावी तर आपले दोष नाहीसे होतात.
७) रस्त्यावर समोरहून गाय येताना दिसली तर तिला आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे,
प्रवासात किंवा कामात यश मिळते.
८) झोपेत वाईट स्वप्न दिसत असल्यास
गायीच्या नावाने स्मरण करावे. मन शांत होईल, आणि अशा स्वप्नांपासून मुक्ती मिळेल.
९) गायीच्या तुपाचे एक नाव आयू असेही
आहे- आयुर्वै घृतम्: याचा अर्थ गायीच्या दूध-तूप याने व्यक्ती आयुष्य दीर्घ होते.
१०) जन्मपत्रिकेत बृहस्पती अशुभ स्थिती असल्यास तर गायीच्या
कुबडाचे दर्शन करावे. गूळ आणि चण्याची डाळ ठेवून गायीला पोळी खाऊ घालावी.
११) तसेच जन्मपत्रिकेत सूर्य-चंद्र कमजोर
असल्यास त्या व्यक्तीने गायीच्या डोळ्यांचे दर्शन करावे त्याने लाभ प्राप्ती होईल.
१२) गाय ही एक पाळीव प्राणी आहे ज्या घरात गाय असते त्या ठिकाणी
किंवा परिवारात आर्थिक टंचाई निर्माण होत नाही
शिवाय परिवारातील एकही व्यक्ति आजारी पडत नाही.म्हणूनच तिला लक्ष्मी म्हणतात.
१३) गाय ही ऑक्सीजन ग्रहण करते व ऑक्सीजनच
सोडते.
१४) गायचे दूध फॅक्ट रहित असून ते जर घेतले तर स्त्री व पुरुषांचा जाडेपणा किंवा स्थूलपणा राहत
नाही.
१५) गायच्या शेणापासून घर सारावले किंवा घरात गौरी करून जाळली असता मच्छर, किडे व घाण वास येत नाही.
|| श्री स्वामी समर्थ ||
0 Comments
Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.