google-site-verification: googlea24dc57d362d0454.html प्रकरण ४. व्यवसाय सेवा , इयत्ता- १२ वी , विषय- वाणिज्य संघटन

प्रकरण ४. व्यवसाय सेवा , इयत्ता- १२ वी , विषय- वाणिज्य संघटन

shrikant89.blogspot.com

  स्वाध्याय 
प्र. १ अ) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा.

१)  रस्ते  वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते.

२) गोदाम  समय उपयोगिता निर्माण करते.

3) नाशवंत वस्तु शीतगृह गोदामात साठविल्या जातात.

४) जहाज बंदरावर असताना सर्व धोक्याचा समावेश  बंदर धोके  विमापत्रात होतो.

५) आयुर्विम्यास नुकसान भरपाई तत्व लागू होत नाही.

ब) योग्य जोड्या जुळवा.

'अ' गट                               ब गट (उत्तरे)

अ) हवाई वाहतूक-    १)  जलद वाहतुकीचे साधन

ब) गोदाम सेवा -      २) समय उपयोगिता

क) पैसे पाठविणे-     ३) वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर

ड) नलिकेद्वारे वाहतूक (Pipe Line)-   ४) पेट्रोलियम आणि गॅस

इ) व्यावसायिक सेवा-  ५)अमूर्त स्वरूप

क) खालील वाक्यांसाठी योग्य शब्द, शब्द समूह, संज्ञा सुचवा.

१) केंद्र शासन, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची मालकी, व्यवस्थापन आणि नियंत्रण असलेला गोदामाचा प्रकार- सहकारी

२) एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, वस्तुस्थिती, माहिती इ. चे देवाण घेवाण करण्याची कला- संप्रेषण

३) एकाच रुळावरून धावणारी रेल्वे- मोनोरेल

४) पेट्रोलियम आणि वायूच्या वाहतुकीसाठी वापरला जाणारा वाहतूक प्रकार- पाईपलाईन वाहतूक

५) देशभरातील भूपृष्ठ वाहतुकीचा विकास करणारे मंत्रालय -  भू पृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालय 

ड) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

१) व्यवसायाच्या विस्तारासाठी व्यवसायिक सेवा महत्वाच्या आहेत.- बरोबर

२) चालु खाते कर्मचारी उघडतात.-चूक

३) NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर- चूक

४) हवाई वाहतूक हे सर्वात स्वस्त वाहतुकीचे साधन आहे.- चूक

५) इंटरनेट ही जागतिक स्तरावरील संगणकांना विशिष्ट प्रणाली ने संगणकांना जोडणारे माध्यम आहे.- बरोबर

इ) गटात न बसणारा शब्द शोधा.

१) प्राथमिक पतसंस्था, सहकारी संस्था, राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक, विनिमय बँक

२) नाबार्ड, आर.बी.आय. सिडबी, एक्झिम

३) थेट मेल, लॉजिस्टिक पोस्ट, व्यवसायिक पोस्ट, पार्सल

४) इंडोमेंट विमा पॉलिसी, संपूर्ण जीवन विमा, पैसे परतावा योजना, सर्वसमावेशक विमापत्र

फ) खालील विधाने पूर्ण करा.

१) बँक हा शब्द बँको फ्रेंच शब्दापासून आला आहे.

२) शीतगृह गोदाम नाशवंत वस्तुसाठी साठवणूकीची सुविधा उपलब्ध करून देतात.

३) ताफा  विम्यात एकाच मालकाच्या अनेक जहाजांचा विमा उतरवला जातो.

४) मोबाईल फोन द्वारे पुरविल्या जाणाऱ्या बँकिंग सुविधेत मोबाइल  बँकिंग असे म्हणतात.

ग) कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा.


ई. एक वाक्यात उत्तरे द्या. 

१) डेबीट कार्ड म्हणजे काय ?

उत्तर : डेबिट कार्ड म्हणजे असे कार्ड ज्याचा उपयोग बचत व चालू खातेदार स्वत:जवळ रोख पैसे न बाळगता, या कार्डच्या साहाय्याने मालाची खरेदी करू शकतात व देणी देऊ शकतात, नंतर ही रक्कम त्यांच्या खात्यावर 'नावे' केली जाते.

२) विषय बाब म्हणजे काय?

उत्तर-ज्या  कारणासाठी विमा उतरवलेला असतो ते कारण होय उदय. जीवन ,मालमत्ता,ई. 

३) सरकारी गोदाम म्हणजे काय?

उत्तर- शासन किंवा पूर्णपणे सरकारची मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण असलेल्या गोदामाला ‘सरकारी (शासकीय) गोदाम’ म्हणतात. शेतकरी, छोटे व्यापारी, व्यावसायिक यांना काही नाममात्र भाडे आकारून माल साठवणुकीची सोय करतात.

४) हवाई वाहतूक म्हणजे काय ?

उत्तर- आकाश मार्गे होणाऱ्या वाहतुकीस हवाई वाहतूक म्हणतात. हवाई वाहतूक हा वाहतुकीचा आधुनिक प्रकार आहे. हवाई वाहतुकीत विमाने, जेट विमाने, हेलिकॉप्टर इत्यादींचा वापर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी केला जातो. हवाई वाहतूक इतर वाहतूक साधनांच्या तुलनेने जास्त वेगवान आहे.

५) संदेशवहन म्हणजे काय ?

उत्तर- व्यापाराला साहाय्यभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक आहे. संदेशवहन ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, वस्तुस्थिती, माहिती इत्यादींची देवाण-घेवाण करण्याची प्रक्रिया आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एखादया माध्यमाच्या साहाय्याने माहितीचे वहन करण्याची प्रक्रिया म्हणजेच संदेशवहन किंवा संप्रेषण होय. 

ई) खालील वाक्यातील अधोरेखीत शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा.

१) बँका अधिविकर्ष सवलत बचत खातेधारकांना उपलब्ध करून देतात.- चालू

२) सेवा दृश्य स्वरुपात असतात.- अदृश्य

३) विमा व्यवसायातील धोके वाढविण्यास मदत करते.- कमी करण्यास

४) विदेशी बँक ही राष्ट्राच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे.-मध्यवर्ती

५) RTGS FEUG Reasonable Time Gross Settlement- Real

ज) योग्य क्रम लावा.

१) दावा, अपघात, पॉलिसी घेणे, नुकसान भरपाई

उत्तर- पॉलिसी घेणे,अपघात,दावा, नुकसान भरपाई

२) इ-मेल, आंतर्देशीय पत्र, कुरिअर सेवा

उत्तर- आंतर्देशीय पत्र,कुरिअर सेवा,इ-मेल,

प्र.२. खालील संज्ञा / संकल्पना स्पष्ट करा.

) वाहतूक -

उत्तर : (१) वाहतूक म्हणजे व्यक्ती. प्राणी आणि मालाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यात येणारी ने-आण होय. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वाहतूक महत्त्वाची भूमिका बजावते. १९९०-९१ पासून मुक्त अर्थव्यवस्थेमुळे पायाभूत घटकांचा (रस्ते, रेल्वे) जलद गतीने विकास झाला. आज वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब वाहतुकीसाठी केला जातो. जसे, रस्ते, रेल्वे, जल आणि हवाई वाहतूक, व्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीची गरज असते. त्यामध्ये रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग, कालवा मार्ग (पोट मार्ग), नलिका मार्ग आणि यांना जोडणारी स्थानके. जसे, विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानके, मोटार थांबे आणि बंदरे. या सर्व स्थानकांचा उपयोग प्रवासी आणि मालाच्या चढ-उतारासाठी केला जातो. (२) वाहतुकीमुळे उत्पादन कार्याला चालना मिळते. कारण ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध आहे तेथून तो उत्पादनाच्या ठिकाणी नेणे शक्य होते. मजुरांची ने-आण होते. वाहतुकीमुळे बाजारपेठेचाही विस्तार होतो. मालाचे वितरण व बाजारपेठ यामध्ये वाहतूक महत्त्वाची  भूमिका बजावते. आंतरराष्ट्रीय पर्यटन व बाजारपेठेचाही विस्तार हवाई वाहतुकीमुळे होतो. वाहतुकीमुळे स्थळ (ठिकाण) उपयोगिता निर्माण होते; कारण ज्या ठिकाणी वस्तू मुबलक आहे, तेथून त्यांची कमतरता जेथे आहे तेथे त्या वाहतुकीद्वारे घेऊन जाणे शक्य होते. तसेच वाहतुकीमुळे ग्राहकांना आवश्यक असलेला माल योग्य वेळी पुरवल्यामुळे मागणी आणि पुरवठा यांमध्ये समतोल साधला जातो व किमती स्थिर राहतात. तसेच वाहतुकीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात, राहणीमान उंचावते व आर्थिक विकास शक्य होतो.

२) संदेशवहन-

         व्यापाराला साहाय्यभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक आहे. संदेशवहन ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, वस्तुस्थिती, माहिती इत्यादींची देवाण-घेवाण करण्याची प्रक्रिया आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एखादया माध्यमाच्या साहाय्याने माहितीचे वहन करण्याची प्रक्रिया म्हणजेच संदेशवहन किंवा संप्रेषण होय. संदेश प्राप्त करणारी व्यक्ती तो संदेश समजून घेऊन त्यानुसार पुढील कार्य करते. पत्र, टेलिफोन, इंटरनेट, मोबाईल, दूरदर्शन आणि वर्तमानपत्रे, आकाशवाणी इतर छापील माध्यमे इत्यादी संदेशवहनाचे वेगवेगळे प्रकार किंवा माध्यमे आहेत. (२) जॉर्ज टेरी यांच्या मतानुसार, “संदेशवहन, ही कल्पना वस्तुस्थिती व कृती यांचे संक्रमण व विनिमय करणारी एक प्रक्रिया आहेसंप्रेषणामुळे व्यावसायिक माहिती अतिशय जलद व सुलभपणे दुसऱ्या व्यावसायिकापर्यंत जाते व त्याचा फायदा व्यापार, उदयोगात होतो. दोन व्यक्ती, संस्था, कंपनीमधील अंतराची समस्या सहजपणे संप्रेषणामुळे दूर होते. परिणामकारक संप्रेषणामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विस्तार होतो व त्याचा फायदा शेती उत्पादने, तसेच औदयोगिक उत्पादने सर्वदूर विकली जातात व देशाच्या विकासाला हातभार लागतो.

३) बँकिंग-

उत्तर : (१) बँक ही संज्ञा फ्रेंच शब्द 'बँको' या शब्दापासून  आलेली आहे. बँको म्हणजे 'खंडपीठ' किंवा 'बेंच, टेबल' होय.प्राचीन काळामध्ये सावकार लोक कर्ज देण्या-घेण्याच्या उद्देशाने चलनी नाण्यांचा मोठा ढीग टेबलावर ठेवून देवाण-घेवाणीचे व्यवहार करीत असत. यावरून ही संज्ञा रूढ झाली. बँक म्हणजे असे, संघटक बल जे पैशासंबंधित व्यवहार करीत असते. अशी वित्तीय संस्था जी च्या दुसऱ्यांचे पैसे स्वीकारून सुरक्षित ठेवते व गरजू लोकांना कर्ज स्वरूपात वाटप करते, अशा आर्थिक संस्थेला 'बँक' म्हणतात.(२) बँकिंग व्यवसायामध्ये मागणी करताच परत करण्याच्या अटींवर ठेवी स्वीकारणे व नंतर त्या रकमेतून कर्ज देणे किंवा गुंतवणूक करण्याच्या कार्याचा समावेश होतो. कमी व्याजदराने ठेवी स्वीकारणे व अधिक व्याजदराने कर्ज वाटप करून बँक नफा कमावते. देशाच्या गुण रोख भांडवल वितरणात व संरक्षणात बँक महत्त्वाचे कार्य करते. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कार्यक्षम बँकिंगचा मोठा वाटा असतो.

४) विमा-

उत्तर- विशिष्ट फी ज्याला विमा हप्ता म्हणतात, तो आकारून विमा कंपन्या व्यावसायिकांचा धोका स्वतः स्वीकारतात. व्यवसायामध्ये वस्तूच्या उत्पादन पायरीपासून ते वस्तू ग्राहकापर्यंत उपभोगासाठी पोहोचेपर्यंत अनेक धोके संभवत असतात. विमा कंपनी विमा करारावर सही घेऊन व करार करून विमेदाराला एका ठरावीक मुदतीनंतर अथवा एखादया दुर्घटनेच्या वेळी विशिष्ट ठरावीक रक्कम देण्याचे वचन देते. अशा प्रकारे विमा कंपनी व्यावसायिकांना विम्याच्या वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देऊन, व्यावसायिक धोक्यापासून संरक्षण करते व त्यांना त्यांच्या दैनंदिन कारभारावर लक्ष केंद्रित करण्यास साहाय्य करते.

५) साठवणूक-

उत्तर : (१) गोदामामध्ये मालाचा साठा किंवा संग्रहण करण्यासाठी जी कार्य करावी लागतात, त्या सर्व कार्यांना 'साठवण' म्हणतात. मालाचे संग्रहण करणे हे विपणनाचे एक प्रमुख कार्य आहे. साठवण ही संज्ञा देखील मालाचे संग्रहण करण्यासाठी वापरली जाते. जेव्हा मालाचा साठा हा मोठ्या प्रमाणात व विशेष पद्धतीने केला जातो, तेव्हा त्याला ‘साठवणूक’ म्हणतात. ज्या इमारतीत अथवा ठिकाणी मालाची साठवण केली जाते, त्याला ‘गोदाम’ म्हणतात. (२) साठवणुकीमध्ये मालाच्या उत्पादनापासून प्रत्यक्ष वापरापर्यंतचे मालाच्या सुरक्षिततेचे योग्य व्यवस्थापन केले जाते. साठवणूक क्रियेमध्ये मालाचे उष्णता, वारा, पाऊस, आग यांपासून संरक्षण केले जाते. गोदामातून जेव्हा माल साठवला जातो, तेव्हा तेथे मालाच्या प्रतीनुसार वर्गवारी व चिन्ह देण्याचे कार्य उत्पादक, घाऊक व्यापारी करतात. गोदामामुळे किंमत स्थिर राखण्यास मदत होते. तसेच मालाच्या साठवणुकीबरोबरच प्रतवारी, संवेष्टन, मुद्रीकरण ही कार्ये गोदामांत पूर्ण केली जातात.

प्र.३. पुढील घटना/परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा.

) सौ. हर्षाली यांनी दोन वर्षांपूर्वी नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या व्यवसायाचे ग्राहक संपूर्ण देशभर असल्याने, ग्राहक बिलाची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा करतात, त्याचवेळी सौ. हर्षालीसुद्धा विविध देणी व्यवसायाच्या खात्यातूनच करते.

१) सौ. हर्षाली यांच्या खात्याचा प्रकार ओळखा.

उत्तर : सौ. हर्षाली या एक व्यावसायिक आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी ‘चालू खाते’ उपयुक्त खाते आहे.

) सौ. हर्षाली यांना पैसे पाठवण्याचा कोणताही एक आधुनिक मार्ग सुचवा.

उत्तर : सौ. हर्षाली NEFT या सुविधेचा उपयोग करून पैसे पाठवू. (National Electronic Fund Transfer)

) सौ. हर्षाली त्यांच्या बँक खात्यावर कोणकोणत्या सुविधा घेऊ शकतात?

उत्तर : सौ. हर्षाली यांचे ‘चालू खाते’ असल्यामुळे गरजेच्या वेळी अधिविकर्ष सवलत घेऊ शकतात.


)  श्री. जगन हे पगारी कर्मचारी आहेत. ते आपल्या दोन वर्षांच्या मुलाची संरक्षण आणि सज्ञान झाल्यानंतर आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची खात्री देणारी विमा पॉलिसी (योजना) घेऊ इच्छितात.

) श्री. जगन यांना त्यांच्या मुलासंबंधीच्या गरजा समाधानकारक पूर्ण करणारी विमा पॉलिसी (योजना) सुचवा.

उत्तर : श्री. गजानन यांचा दोन वर्षांचा मुलगा (अज्ञान) आहे. त्याच्या भविष्यातील गरजांच्या पूर्ततेसाठी बाल विमा पॉलिसी (योजना) घ्यावी.

२) विमा पॉलिसीचा (योजनेचा) लाभार्थी कोण आहे?

उत्तर : श्री. जगन यांचा दोन वर्षांचा मुलगा हा या विमा पॉलिसीचा (योजनेचा) लाभार्थी असेल.

) वरील घटनेमध्ये कोणत्या तत्त्वाचा समावेश होतो?

उत्तर : वरील घटनेमध्ये, वडिलांनी आपल्या लहान मुलाच्या हितासाठी बाल विमा पॉलिसी (योजना) घेतली आहे, त्यामुळे त्यात विम्याचे ‘विमाहित तत्त्व’ समाविष्ट आहे.


) श्री. शरण एक यशस्वी उत्पादक आहेत. त्यांचे विविध ठिकाणी उत्पादनाचे कार्य चालते. ते मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे कार्य करीत असल्याने, त्यांच्याकडे कच्चा आणि उत्पादित मालाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यांना कोणत्याही अनपेक्षित आर्थिक धोक्यापासून मालाच्या संरक्षणासंबंधी काळजी वाटते. तसेच त्यांना कच्चा व पक्का माल एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पाठवावा लागतो; परंतु त्यासाठीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यांना व्यवसाय विस्तारासाठी निधीची सुद्धा आवश्यकता आहे.

) श्री. शरण यांना मालाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण देणारी सेवा सुचवा.

उत्तर : श्री. शरण यांना आपल्या उत्पादित मालाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण मिळण्यासाठी ‘साठवणूक’ सेवा उपयुक्त आहे.

) श्री. शरण यांची विविध स्थाना (ठिकाणा) मुळे निर्माण होणारे अडथळे दूर करणारी सेवा कोणती?

उत्तर : श्री. शरण यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहण्यासाठी, वाहतूक सेवा साहाय्यभूत ठरेल.

) श्री. शरण कोणत्या सेवेद्वारे अर्थसाहाय्य मिळवू शकतात?

उत्तर : श्री. शरण यांना गोदाम पावतीच्या आधारावर बँकेकडून किंवा अन्य वित्तीय संस्थाकडून अर्थ साहाय्य मिळवता येईल.

४) श्री. अमित हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. श्री. अमित हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना ५ आणि ८ वर्षे वयाच्या दोन मुली आहेत.

1) श्री. अमित हे त्यांच्या पत्नी व दोन मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का?

उत्तर : श्री. अमित हे त्यांच्या पत्नीसाठी संपूर्ण जीवन विमा किंवा एन्डोमेंट विमा घेऊ शकतात व दोन मुलींच्या भविष्यासाठी बाल विमा योजना घेऊ शकतात.

2) श्री.अमित हे त्यांच्या कारखान्यासाठी सागरी विमा घेऊ शकतात का?

उत्तर : श्री. अमित यांचा व्यवसाय पुणे व नाशिक येथे असल्याने त्यांना सागरी विमा घेता येणार नाही.

3) आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री. अमित घेऊ शकतात?

उत्तर : श्री. अमित हे आगीपासून संरक्षण मिळवण्यासाठी तरल अग्नी विमा घेऊ शकतात.

प्रश्न ४ फरक स्पष्ट करा.

१) करदत्त गोदाम आणि करदेय गोदाम
२) मध्यवर्ती बँक आणि व्यापारी बँक
३) रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूक
४) जीवन विमा आणि सागरी विमा
५) बचत खाते आणि चालु खाते
६) जीवन विमा आणि अग्नीविमा
७) रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक
८) रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक
९) चालु खाते आणि मुदत ठेव खाते 

 

 


 प्र.५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

) ठेवींचे कोणतेही चार प्रकार सांगा.

उत्तर : (१) मुदत ठेव : मुदत ठेव खाते म्हणजे, ज्या खात्यामध्ये एक निश्चित रक्कम ठेवली जाते, त्या ठेवींचा कालावधी व व्याजदर अगोदरच निश्चित केलेला असतो. इतर ठेव खात्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा मुदत ठेव खात्यावर अधिक व्याजदर दिला जातो. मुदत ठेव खात्यावरील व्याजदर कालावधीनुसार बदलत असतो. काही मुदत ठेव खात्यावरील देय व्याज ३ महिन्यानंतर, ६ महिन्यानंतर किंवा वार्षिक दिले जाते. अंतिम मुदती पूर्वी देय व्याज खातेदार घेत असेल, तर व्याजदर कमी राहतो. मुदत ठेव खात्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर खातेदाराला मुदत ठेवीची पावती दिली जाते. खातेदाराला गरज असेल, तर ठेव पावती तारण ठेवून कर्ज दिले जाते.

) आवर्ती ठेव : आवर्ती ठेव खाते म्हणजे असे खाते ज्यामध्ये खातेदाराला ठरावीक रक्कम, साधारणपणे दरमहा नियमितपणे या खात्यात जमा करावयाची असते. आवर्ती ठेव खात्यामध्ये सर्वसाधारणपणे पगारदार लोक किंवा व्यावसायिक, ज्यांना नियमित उत्पन्न मिळते, तेच पैसे गुंतवतात. या खात्याची मुदत संपल्यावर खातेदाराला खात्यात जमा केलेली रक्कम व त्यावरील देय व्याज अशी एकूण रक्कम देण्यात येते. या खात्यावर बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर दिला जातो व हा व्याजदर कालावधीनुसार बदलत राहतो. खातेदाराला नियमित भरत असलेल्या रकमेचे पासबुक देण्यात येते.

) मागणी ठेव : मागणी ठेव खाते म्हणजे असे खाते, ज्यामधील रक्कम खातेदाराला मागणी करताक्षणी देण्यात येते. या खात्यातील रकमेची परतफेड खातेदाराद्वारे ‘मागणी स्लीप’ भरून, धनादेशाद्वारे, ATM कार्डाद्वारे किंवा परताव्याद्वारे (Online transfer) केली जाते.

) बचत खाते : वैयक्तिक बचतीला प्रोत्साहन देणे व बचत सवय वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने या खात्याची निर्मिती करण्यात आलेली असते. बचत खाते हे ज्या व्यक्तींना नियमित उत्पन्न मिळते किंवा पगारदार लोकांसाठी अधिक उपयुक्त मानले जाते. बचत खात्यामध्ये पैसे भरण्याबाबत कोणतीही बंधने नसतात; परंतु वारंवार पैसे काढण्याबाबत काही बंधने मात्र निश्चित असतात. या खात्यामध्ये शिल्लक रकमेवर सहा महिन्यामधून एकदा व्याज जमा केले जाते. बचत खातेधारकाला झालेल्या व्यवहारांची माहिती SMS द्वारे दिली जाते. खात्यासंबंधी सर्व माहिती समजण्यासाठी मागणी केल्यास अकाउंट स्टेटमेंट देण्यात येते. काही बँका बचत खातेधारकांना लवचीक ठेवीची (Flexible Deposit) ची सुविधा पुरवतात. या सुविधेअंतर्गत, बचत खाते व मुदत ठेव खाते या दोन्हीचे लाभ खातेदाराला देण्याचा प्रयत्न केला जातो. हे वेगळे खाते नसून त्याच खात्यावरील विशिष्ट मर्यादेनंतरची अतिरिक्त रक्कम आपोआप मुदत ठेवीमध्ये वर्ग केली जाते. तसेच जर खातेदाराचा धनादेश वटवण्यासाठी बचत खात्यात पुरेशी शिल्लक नसेल, तर या मुदत ठेवीमधून धनादेश वटवण्यात येतो.


प्र २. वाहतुकीचे कोणतेही चार प्रकार लिहा.

) रस्ते वाहतूक –

रस्ते वाहतूक हा सर्वांत जुना वाहतुकीचा प्रकार मानला जातो. रस्ते वाहतुकीची जी विविध माध्यमे आहेत ती सर्व रस्त्यांवरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. विविध छोटी, मोठी गावे, शहरे जोडण्याचे काम रस्ते वाहतुकीमुळे होते. लोकांचा, लोकांशी संपर्क वाढवण्याचे काम रस्ते वाहतूक करते. कच्चे रस्ते, पक्के रस्ते, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग यांवरून विविध प्रकारची वाहने धावत असतात. शहरे, गावे, राज्य जोडली जातात. रस्ते वाहतुकीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची व मालाची वाहतूक होते. देशांतर्गत विविध पर्यटनस्थळे पाहणे रस्ते वाहतुकीमुळे शक्य होते. बाजारपेठेचा स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर विस्तार होतो. या व्यतिरिक्त सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रस्ते सर्वदूर असल्याने लहान भागातूनही वस्तू ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवता येतात. रस्ते वाहतुकीमध्ये बैलगाडी, सायकल, मोटार सायकल, रिक्षा, ट्रक, टेम्पो, बसेस इत्यादी माध्यमांचा उपयोग केला जातो.

) रेल्वे वाहतूक :

 रेल्वे वाहतूक म्हणजे भूपृष्ठावरून दोन  समांतर रूळांच्या रेल्वे मार्गाच्या मदतीने डिझेल इंधनाच्या अथवा इलेक्ट्रिकच्या साहाय्याने एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर संपूर्ण भारतभर धावणाऱ्या रेल्वे गाड्या तसेच प्रवासी अथवा मालगाड्या यांची रेल्वे मार्गावरून, रेल्वे गाड्यातून होणाऱ्या वाहतुकीला रेल्वे वाहतूक म्हणतात. भारतामध्ये जमिनीवरून होणाऱ्या वाहतुकीमध्ये सर्वांत लोकप्रिय असा प्रकार आहे. माल व प्रवाशांची दूर अंतरावर कमी खर्चामध्ये या माध्यमाद्वारे वाहतूक होते. भारतामध्ये रेल्वे यंत्रणेची संपूर्ण मालकी भारत सरकारची असते. भूपृष्ठावरील वाहतूक माध्यमांमध्ये रेल्वेचा वेग जास्त असतो. हा वाहतूक प्रकार जड व मोठे आकारमान असलेल्या मालासाठी व दरच्या पल्ल्यासाठी योग्य ठरतो. रेल्वेगाड्यांची निर्मिती, रेल्वेमार्ग तयार करणे, रेल्वे स्टेशनांची बांधणी व त्यांचा देखभाली खर्च यासाठी प्रचंड भांडवलाची गरज असते. वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वे गाड्या रेल्वे मंत्रालयाकडून चालवल्या जातात. प्रवासी गाड्या, मालगाड्या, पेट्रोलियम, कच्चे तेल वाहतूक करणाऱ्या गाड्या चालवल्या जातात. रेल्वेकडून काही लोकप्रिय प्रवासी गाड्या चालवल्या जातात. जसे, राजधानी एक्सप्रेस, दुरांतो, शताब्दी, इंटरसिटी इत्यादी. पर्यटन विकासासाठी काही विशेष गाड्याही चालवल्या जातात. जसे, डेक्कन ओडिसी, रामायण, महाराजा इत्यादी.

) हवाई वाहतूक : आकाश मार्गे होणाऱ्या वाहतुकीस हवाई वाहतूक म्हणतात. हवाई वाहतूक हा वाहतुकीचा आधुनिक प्रकार आहे. हवाई वाहतुकीत विमाने, जेट विमाने, हेलिकॉप्टर इत्यादींचा वापर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी केला जातो. हवाई वाहतूक इतर वाहतूक साधनांच्या तुलनेने जास्त वेगवान आहे. हवाई वाहतुकीच्या साहाय्याने हलक्या व मौल्यवान वस्तूंची वाहतूक केली जाते. हवाई वाहतूक आणीबाणीच्या प्रसंगी, विशेषकरून युद्धजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती वेळी अधिक उपयुक्त असते. रेल्वे डब्यांच्या तुलनेत विमानांची वाहन क्षमता मर्यादित असते. उंच डोंगराळ प्रदेश, टेकडी, जेथे इतर प्रकारचे वाहतुकीचे मार्ग उपलब्ध नाहीत तेथे हवाई वाहतूक सोयीची असते. हवाई वाहतुकीचे दोन प्रकार प्रत्येक देशात आढळतात. एक देशांतर्गत हवाई वाहतूक व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, हवाई वाहतुकीची मालकी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खाजगी संस्थांकडे व काही अंशी सरकारकडे असते. उदा., स्पाईस जेट (खाजगी क्षेत्र), देशांतर्गत सेवा-एअर इंडिया इत्यादी.

) जल वाहतूक : जल वाहतूक म्हणजे, ज्यामध्ये प्रवाशांची व मालाची वाहतूक पाण्यावरून जसे, समुद्र, मोठी नदी, कालवे यांवरून केली जाते. जल वाहतूक हा जुना, पारंपरिक व तुलनेने स्वस्त वाहतूक प्रकार आहे. जल वाहतुकीद्वारे प्रवासी व मालाची वाहतूक प्रवासी बोटी, मालवाहू जहाजे, द्रवपदार्थ वाहून नेणारी जहाजे, मोठी जहाजे (Liner) यांच्या साहाय्याने केली जाते. जल वाहतुकसुद्धा दोन भागांमध्ये विभागली जाते. एक म्हणजे देशांतर्गत जल वाहतूक व आंतरराष्ट्रीय जल वाहतूक. भारतामध्ये शिपींग व खाण मंत्रालय जल वाहतूक विकास व विस्तारीकरण, पायाभूत सुविधांची उभारणी यांवर लक्ष ठेवते. मोठ्या आकारमानाच्या व अवजड वस्तू (उदा.मशिनरी, तेल पिंपे, धान्य) लांब अंतरावर वाहून नेण्यासाठी ही वाहतूक उपयुक्त आहे.

 ) आयुर्विम्याचे कोणतेही चार प्रकार सांगा.

उत्तर : (१) संपूर्ण जीवन विमा : या प्रकारामध्ये व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा, विमा उतरवला  जातो. विमेदार व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विमा कंपनीकडून कोणतीही रक्कम त्याला मिळत नाही. विम्याचा हप्ता अतिशय कमी असतो. विमाधारकाच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम त्याच्या वारसदाराला मिळते, कुटुंबासाठी ही पॉलिसी अतिशय उपयुक्त आहे; कारण विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाचा विमा पॉलिसीमुळे आर्थिक फायदा होतो.

(२) एन्डोमेन्ट विमा योजना : एन्डोमेन्ट विमा योजनेनुसार विमा हा ठरावीक कालावधीसाठी घेतला जातो. विमेदाराच्या मृत्यूनंतर किंवा ठरावीक कालावधी संपल्यानंतर या दोन्हीपैकी जी घटना प्रथम घडेल त्याप्रमाणे वारसदारास किंवा विमाधारकाला विम्याची रक्कम अधिक बोनस दिला जातो. विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबासाठी संरक्षण किंवा विमेदाराला उतारवयात पेन्शन म्हणून ही विमा योजना अतिशय प्रसिद्ध आहे.

) मुदत विमा : मुदत विमा हा ठरावीक कालवधीसाठी घेतला जातो. ही विमा योजना सर्वांत कमी विमा हप्ता असलेली योजना आहे. या विमा योजनेच्या विम्याचा हप्ता विम्याच्या कालावधीत कधीच बदलत नाही. विमाधारकाच्या अकाली मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्याना विमा करारात ठरल्याप्रमाणे वा अधिक फायदयाची रक्कम मिळते.

) वार्षिक विमा : वार्षिक विमा योजनेनुसार विमाधारकास ठरावीक रक्कम किंवा हप्ते ठरावीक कालावधीसाठी भरावे लागतात. त्यानंतर विमाधारकास ठरावीक रक्कम वेळेला किंवा निश्चित तारखेनंतर त्याच्या आयुष्यभर किंवा निश्चित वर्षांसाठी मिळते. सर्वसाधारणपणे ज्याच्याकडे भरपूर पैसे शिल्लक आहेत आणि त्याला असे वाटते की, निवृत्तीनंतर त्या पैशाचा उपयोग व्हावा अशी व्यक्ती ही योजना घेते.

) पैसे परतफेड विमा : पैसे परतफेड विमा योजनेनुसार जेवढ्या रकमेचा विमा काढलेला असेल, त्यापैकी ठरावीक कालावधीनंतर ठरावीक रक्कम परत मिळते आणि विर्माधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला संपूर्ण विमा रक्कम देण्याची खात्री या योजनेमध्ये दिली जाते. ज्या व्यक्तींना बचत करावी व परतावाही दर ५ वर्षांनी मिळावा; तसेच जीवन विम्याचे संरक्षण ही मिळावे, असे वाटते अशा लोकांसाठी ही योजना फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे पैसे परतफेड विमायोजना १५ वर्षे, २० वर्षे व २५ वर्षे मुदतीसाठी उपलब्ध असते.

) बाल विमा : बाल विमा योजना बचत व गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी विमा योजना आहे. लहान मुलांच्या भविष्यातील गरजांची पूर्तता करण्यासाठी ही विमा पॉलिसी घेतली जाते. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या योजनेची मदत होते. मुलाच्या जन्मापासून पालकांना मुलासाठी बचत करण्यास प्रेरणा मिळते. मूल सज्ञान झाल्यावर रक्कम काढण्याची मुभा असते. काही विशिष्ट बाल विमा विशिष्ट अंतराने पैसे काढण्याची मुभा देतात.

) सेवानिवृत्ती विमा योजना : विमाधारकाला बचत व गुंतवणुकीची सवय निर्माण होण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. विशिष्ट वय (निवृत्ती वय) येईपर्यंत या योजनेत विमा हप्त्याद्वारे गुंतवणूक केली जाते. त्यानंतर एकदम मोठी रक्कम गुंतवून दरमहा ठरावीक रक्कम निवृत्तीनंतर कायमस्वरूपी मिळत राहते, यालाच निवृत्ती/वार्षिकी असे म्हणतात.

) ULIP विमा योजना : (युनिट लिंक्ड इन्स्यूरन्स पॉलिसी) या विमा योजनेद्वारे विमेदारास जीवन विमा व म्युच्युअल फंड गुंतवणूक (भाग बाजारातील) या दोन्हीचे लाभ होतात.

४) व्यावसायिक सेवांची कोणतीही चार वैशिष्ट्ये सांगा.

उत्तर : व्यावसायिक सेवांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

) अदृश्य स्वरूप : सेवा अदृश्य असतात. त्या पाहता येत नाहीत. त्यांना स्पर्श करता येत नाहीत. तसेच त्यांचा वासही घेता येत नाही. मात्र सेवेचे अस्तित्व जाणवते. लोकांना विम्यापासून होणारे लाभ उपभोगता येतात. विमा दाखवा म्हटले, तर दाखवता येणार नाही म्हणूनच सेवा पुरवठादारांना उत्तम सेवा ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी देणे आवश्यक असते. उदा., आपणास विमा कंपनीची इमारत दिसते परंतु विमा सेवा दृश्य स्वरूपात दिसत नाहीत.

) अविभाज्य : सेवांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सेवा पुरवठादार व सेवा या दोन गोष्टी एकमेकांपासून अलग करता येत नाही. त्याचप्रमाणे सेवा प्रदान करीत असताना त्या ठिकाणी सेवापुरवठादार उपलब्ध असणे आवश्यक आहे. उदा., जेव्हा एखादया रुग्ण व्यक्तीस आरोग्य सेवा देण्यात येते, अशा वेळी डॉक्टर त्याठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे. सेवा व सेवेचा उपभोग या क्रमाने होणाऱ्या क्रिया आहेत.

) विसंगती : व्यावसायिक सेवा एकजिनसी नसतात. सर्वांना एकसारख्या दिल्या जातील असे नाही. व्यक्तीपरत्वे त्या भिन्न भिन्न असू शकतात. सेवा पुरवठादार मात्र एकच असतो. अशाप्रकारे व्यावसायिक सेवांमध्ये विसंगती असते. उदा., एखादया मॉलमधील विक्रेता एखादया ग्राहकाशी अत्यंत आपुलकीने, सौजन्याने बोलेल, त्याचवेळी दुसऱ्या भिन्न स्वभावाच्या विक्षिप्त ग्राहकाशी थोडा कठोरपणे बोलेल.

) नाशवंतपणा : सेवेचे उत्पादन व त्याचा वापर ही क्रिया अविभाज्य आहे, कारण सेवा साठवून ठेवता येत नाही. ज्याप्रमाणे आपण वस्तू साठवून ठेवू शकतो, त्याप्रमाणे सेवा साठवता येत नाही. उदा., सकाळी पुणे ते मुंबई जाणाऱ्या बसमध्ये काही जागा रिक्त असतील, तर त्या जागांचा उपयोग सायंकाळी जाणाऱ्या फेरीच्यावेळी होऊ शकत नाही.

) अहस्तांतरणीय : व्यावसायिक सेवा अहस्तांतरणीय असतात. इतर उत्पादित वस्तूंप्रमाणे त्या दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरीत करता येत नाहीत. उदा., जर एखादी स्त्री/युवती ब्युटीपार्लरमध्ये जाते व त्या ठिकाणी काही पैसे देऊन तेथील सेवांचा लाभ घेते. अशा वेळी त्या सेवांची मालकी त्या स्त्री/युवतीकडे येत नाही. पुन्हा दुसऱ्या वेळी जायचे असेल, तर पुन्हा स्वतंत्र फी/पैसे देऊन सेवा विकत घ्यावी लागते.

) ग्राहकांचा सहभाग : व्यावसायिक सेवांसाठी ग्राहकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. सेवा पुरवण्यासाठी समोर ग्राहक असणे व त्याचा सहभाग असणे आवश्यक असते. सेवा देणारा व घेणारा दोघेही समान महत्त्वाचे आहे.

) पोस्ट विभागामार्फत पैसे पाठवण्याच्या सेवेची माहिती लिहा.

उत्तर-(१) डाक सेवा प्रकार :

(अ) टपाल सेवा :

         भारतात टपाल सेवा भारत सरकार अंतर्गत पोस्ट व टेलिग्राम विभाग माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत व्यवस्थापित व नियंत्रित केला जातो. भारतामध्ये टपाल विभागाचे फार मोठे जाळे निर्माण झालेले आहे. भारतात टपाल विभागाअंतर्गत १,५४,९६५ डाक घर शाखा आहेत. यांपैकी १,४९,०६७ शाखा ग्रामीण विभागात कार्यरत आहेत.

(१) अंतर्देशीय पत्र : अंतर्देशीय पत्र हा संदेशवहनाचा एक स्वस्त प्रकार आहे. मजकूर लिहिल्यावर दर्शवलेल्या ठिकाणी घडी करून पत्र बंद करता येते. हे पत्र चिकटवता येत असल्यामुळे त्यातील मजकूर गुप्त राहू शकतो. या पत्राच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ठेवता येत नाहीत. अंतर्देशीय पत्रांचा वापर संदेशवहनासाठी भारतीय सीमांतर्गत केला जातो.

(२) बंद पाकीट : लहान आकाराचा लिफाफा अथवा वेस्टन ज्यावर विशिष्ट मूल्याचे तिकीट (Postage stamp) छापलेले असते. त्यास पोस्ट पाकीट म्हणतात. लिखित मजकूर व इतर दस्तऐवज पाकिटात ठेवण्यासाठी याची एक बाजू उघडी असते. या पाकिटात कागदपत्रे घालून ते बंद करता येते.

(३) पार्सल : एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लहान अथवा मध्यम आकाराच्या वस्तू पाठवायच्या असतील, तर त्या पोस्ट पार्सलने पाठवणे सोयीस्कर असते. पोस्ट खाते पोस्ट पार्सलद्वारे वस्तू पोहोचवण्यासाठी स्वस्त व विश्वसनीय सेवा प्रदान करते. ज्या वस्तूंवर शासनाने बंदी घातलेली आहे, अशा वस्तू वगळून पार्सलद्वारे वस्तू पाठवता येतात. देशांतर्गत तसेच विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी विशिष्ट वजनाच्या व आकारमानाच्या वस्तू पोस्टपार्सलने पाठवता येतात. पार्सलच्या वजनाप्रमाणे टपाल हशिलाची तिकिटे लावावी लागतात. पोस्ट पार्सलची काही विशिष्ट रक्कम भरून विमा उतरवता येतो. विमा उतरवल्यास पार्सल गहाळ झाल्यास पोस्ट खाते नुकसानभरपाई देते.

 (४) बुक-पोस्ट-

पोस्ट सेवेद्वारे सेवेद्वारे छापील वर्तमानपत्रे, मासिके, चित्रे, नकाशे, आराखडे, कार्यक्रमांची व सभांची आमंत्रणे, विवाहपत्रिका इत्यादी साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वस्त दरात पाठवता येते. या सेवेद्वारे पाठवण्यात येणारे साहित्य तपासणी करता यावी म्हणून पाकिटाचे आवरण खुले ठेवले जाते. अशा पाकिटावर ' Book-Post ' असे स्पष्टपणे लिहावे लागतात.

(ब) विशेष टपाल सेवा :

(१) व्यवसाय पोस्ट : व्यवसाय पोस्ट पूर्णतः 'मेल' सर्व्हिस आहे. ज्या अंतर्गत मेल मजकूर (ड्राफ्ट) तयार करण्यापासून ते पाठवण्यापर्यंत सर्व क्रियांचा समावेश होतो. व्यवसाय पोस्ट ही सेवा छोटे व्यापारी, व्यावसायिक तसेच मोठ्या संस्था व कंपन्यासाठी उपयुक्त आहे. ग्राहक त्यांना आवश्यक सेवेची निवड करू शकतात, की ज्यामध्ये छपाई, तपासणी इत्यादींचा समावेश होतो. भारतीय डाक विभागाने व्यवसाय पोस्ट सेवा देण्याच्या उद्देशाने भारतातील विविध शहरामध्ये 'व्यवसाय पोस्ट केंद्रे' सुरू केली आहेत. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात 'मेल' पाठवायचे असतात, तेव्हा व्यवसाय पोस्ट सेवा ग्राहकांच्या जागेवरूनही दिली जाते.

(२) लॉजिस्टिक पोस्ट : जेव्हा मोठ्या आकारमानाचे व असंख्य पार्सल पाठवायचे असतात, त्यासाठी लॉजिस्टिक पोस्ट ही सेवा उत्कृष्ट सेवा मानली जाते. लॉजिस्टिक पोस्ट या सेवेअंतर्गत वस्तू किंवा माल एकत्रित करण्यापासून, संचयापासून ते त्याच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवण्यापर्यंत सर्व सेवांचा समावेश होतो. थोडक्यात, या सेवेद्वारे व्यावसायिक ग्राहकांना अल्प व रास्त किमतीमध्ये वेळेत सेवा पुरवली जाते. लॉजिस्टिक पोस्टच्या प्रभावी संपर्क यंत्रणेद्वारे मोठ्या वस्तू देशाबाहेरही व्यवस्थितरीत्या पाठवल्या जातात. रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग व जलमार्गाचा उपयोग करून वस्तू वितरणाचे काम परिणामकारक व कमी खर्चात केले जाते.

) देयके सेवा : वित्तीय निवेदने, देयके, मासिक खाते देयके किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची संप्रेषणे सेवा घेणाऱ्याने (वित्तीय कंपन्या, म्युच्युअल फंड इत्यादी) ९० दिवसांतून एकदा आपल्या सर्व ग्राहकांना पाठवणे अनिवार्य असते. डाक विभागामार्फत ही निवेदने पाठवण्यासाठी दस्तऐवजांची किमान संख्या ५,००० असावी लागते. देयके सेवा विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट पोस्ट विभागामार्फत, पिनकोडच्या मदतीने त्या विभागात वितरित केल्या जातात.

(क) निधी पाठवण्याची सुविधा :

(१) इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर (EMO) : मनीऑर्डरद्वारे विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट व्यक्तीला पैसे पाठवणे हा एक सर्वांत सोयीचा मार्ग मानला जातो. एका पोस्ट कार्यालयाने दुसऱ्या ठिकाणच्या पोस्ट कार्यालयाला, ज्याचे नाव त्या मनीऑर्डरवर लिहिले आहे त्याला पैसे देण्याचा आदेश मानले जाते. या सेवेअंतर्गत पैसे घेणाऱ्या (ग्राहक)च्या दिलेल्या पत्त्यावर घरपोच (मुक्कामी) सेवा उपलब्ध करून दिली जाते.

) त्वरित निधी सेवा (IMO) : पोस्ट विभागामार्फत तात्काळ किंवा त्वरित निधी हस्तांतरण सुविधा ग्राहकाला दिली जाते. हीसुद्धा इंटरनेट (Web based) सेवा असते. ही सेवा सर्वांत जलद, सुलभ, किफायतशीर आणि विश्वासार्ह मानली जाते. भारतातील दोन रहिवासी जवळच्या डाकघरामार्फत संगणकाच्या साहाय्याने ही सेवा वापरू शकतात. या सुविधेअंतर्गत किमान ₹ १,००० पासून ते अधिकतम ₹ ५०,००० पर्यंत रक्कम डाक घरामार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरीत केली जाऊ शकते. ही सुविधा सोपी, जलद व आर्थिकदृष्ट्या परवडणारी असते.

) आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण (IMT) : आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधेअंतर्गत परदेशातून भारतातील वैयक्तिक लाभार्थ्यांनाच पैसे पाठवता येतात. ही सुविधा फक्त वैयक्तिक (कुटुंब) लाभार्थ्यांनाच दिली जाते. संस्था, कंपनी, संघटना यांना उपलब्ध नसते. हा आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी हस्तांतरणाचा जलद व सोपा मार्ग आहे. भारतीय डाक विभाग, भारत सरकार आणि वेस्टर्न युनियन फिनान्शियल सर्व्हिसेसच्या प्रगत प्रणालीद्वारे डाक घरातून ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. या प्रगत प्रणालीद्वारे जगभरातील १९५ देश व प्रांतामधून भारतात त्वरित पैसे पाठवले जाऊ शकतात.

(ड) सामान्य सेवा :

(१) सामान्य पोस्ट : सामान्य पोस्ट या सेवेअंतर्गत डाक विभाग सामान्य लोकांना सेवा पुरवण्याचे कार्य करते. निवडक पोस्ट कार्यालयांमार्फत तृतीय पक्ष उत्पादने (विजेचे बिल, शासनांचे कर) ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य या सेवेअंतर्गत करून दिले जाते. या सेवेअंतर्गत विविध सेवा प्रदान केल्या जातात. जसे, वीज  बिल कलेक्शन, टेलिफोन बिल, विमा हप्ते, कर संकलन, शासनाच्या विविध फी इत्यादी. या सेवेअंतर्गत पोस्ट कार्यालय शासनाच्या MPSC, UPSC इतर परीक्षांच्या अर्जाचे वाटप व स्वीकृतीही करते.

) ई-पोस्ट : आधुनिक काळामध्ये पोस्ट विभागामार्फत ई-पोस्ट ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या सुविधेअंतर्गत ग्राहकांचे लिखित संदेश किंवा काही वेळेस हस्तलिखित सुद्धा स्कॅन करून इंटरनेटचा वापर करून ई-मेलद्वारे पाठवले जातात. अशा प्रकारे ई-पोस्टद्वारे इलेक्ट्रॉनिक तसेच छापील प्रत अशा दोन्ही स्वरूपात ही सुविधा मिळते. पोस्ट कार्यालयातून पोस्टमनमार्फत लिखित नाव व पत्त्यावर असे संदेश, लिखित स्वरूपात, पाकिटे स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात. या माध्यमातून १,५५,००० डाक घरांमार्फत भारतातील कोणत्याही पत्त्यावर त्यांचे विविध प्रकारचे संदेश सहज पाठवू शकतात. मोठ्या कंपन्या ई-पोस्टची विशेष सेवा अधिक दर देऊन स्वीकारतात.

(२) आधुनिक संप्रेषण साधने

(१) कुरिअर सेवा : कुरिअर सेवेद्वारे एखादया व्यक्तीला किंवा संस्थेला आपले पार्सल किंवा विशिष्ट वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येते. विविध कंपन्यांकडून सरसकट दरआकारणी करून विविध लोकांना कुरिअर सेवा नियमित दिल्या जातात. सामान्य डाक सुविधेपेक्षा वेग, सुरक्षा व जलद सेवेच्या बाबतीत कुरिअर सेवा भिन्न असतात. सामान्य कुरिअर सेवा डाक सेवेपेक्षा अधिक खर्चीक असतात. DHL – Dalsey Hillblom, Lynn, DTDC – Desk to Desk Courier and cargo इत्यादी कुरिअर सेवेची उदाहरणे सांगता येतील.

) इंटरनेट : आधुनिक काळामध्ये इंटरनेटचा उपयोग संप्रेषणासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. इंटरनेट हे एकमेकांशी संगणकाद्वारे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे (मोबाईल) जोडलेल्या प्रणालीचे जाळे असून, ज्याचा जगभरात विशिष्ट पद्धतीने (World Wide Web) संकेतांक वापरून संगणक जोडण्यासाठी उपयोग केला जातो. या प्रणालीमध्ये खाजगी, सार्वजनिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि स्थानिक ते जागतिक व्याप्तीच्या सरकारी नेटवर्कचा समावेश होतो.

) ई-मेल : ई-मेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल होय. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग करून विविध प्रकारचे संदेश इंटरनेटच्या साहाय्याने एकमेकांमध्ये देवाण-घेवाण करण्याच्या प्रक्रियेला ई-मेल म्हणतात. ई-मेल सेवेअंतर्गत स्वीकारणे (Accept), पुढे पाठवणे (Forward) व संग्रह (साठा) (Store) संदेश अशी आदेश प्रक्रिया असते. ई-मेलसाठी प्राप्तकर्त्याला सतत संगणकासमोर (online) रहावे लागत नाही; कारण संदेश संग्रहित ठेवला जातो.

(टीप-वरील प्रकारातून मुख्य प्रकार फक्त चार लिहा)

प्र.६  पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

१) हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वांत जलद प्रकार आहे.

उत्तर : (१) हवाई वाहतूक म्हणजे वाहतुकीचा असा प्रकार ज्यामध्ये आकाशमार्गे वाहतूक होते. हवाई वाहतूक ही इतर वाहतुकीच्या तुलनेत वेगवान वाहतुकीचा प्रकार आहे. विसाव्या शतकामध्ये हवाई वाहतुकीला खूपच महत्त्व आले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासी व माल वाहतुकीसाठी हा प्रकार अत्यंत उपयुक्त आहे. प्रवाशी विमाने, माल वाहतूक विमाने, हेलिकाप्टर्स यांच्या साहाय्याने ही वाहतूक होते.

(२) वाहतुकीच्या इतर सर्व साधनांपेक्षा हवाई वाहतूक हा प्रकार सर्वांत जलद व वेगवान आहे. हवाई वाहतुकीसाठी नैसर्गिक मार्ग उपलब्ध असतो. त्यासाठी स्वतंत्र रस्त्यांची निर्मिती करावी लागत नाही. कारण आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत यंत्रसामग्री, इंजिने, उच्च गुणवत्ताधारक तंत्रज्ञ व वैमानिक यांच्यामुळे जलद वाहतुकीला मदत होते. याशिवाय हवाई वाहतूक आकाशमार्गे होत असल्याने ट्रॅफिक जॅम, जंगल, उंच डोंगर, लांबच लांब समुद्र यांचा वाहतुकीमध्ये अडथळा येत नाही. हवाई वाहतुकीसाठी जवळचे मार्ग निश्चित केले जातात. रडारच्या साहाय्याने मार्गदर्शन व दिशा देण्याचे, वेगासंबंधी आदेश वैमानिकाला मिळत राहतात. हवाई वाहतूक वेगाने सेवा देत असल्याने युद्धजन्य परिस्थिती, भूकंप, पूर अशा आणीबाणीच्या प्रसंगी विमान वाहतुकीची वेगवान सेवा फायदेशीर ठरते.

) व्यवसायाच्या विस्तारासाठी संदेशवहन आवश्यक आहे.

उत्तर : (१) संदेशवहन ही कल्पना, वस्तुस्थिती, माहिती यांची एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देवाण-घेवाण असते. एका ठिकाणाहून, दुसऱ्या ठिकाणी तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काही विशिष्ट माध्यमांच्या साहाय्याने माहिती पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे संदेशवहन होय. संदेशवहनासाठी विविध माध्यमे उपयोगात आणली जातात. जसे, नियतकालिके, वर्तमानपत्रे, पोस्ट विभाग, माहिती व प्रसारण विभाग म्हणजे रेडिओ, दूरदर्शन, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट, ई-मेल इत्यादी व्यवसाय वाढ व विस्तारासाठी संप्रेषणाची अत्यंत आवश्यकता असते. व्यापार, वाणिज्य, उदयोगधंदे, व्यापाराची आनुषांगिक साधने या सर्वांच्या वाढीमध्ये संदेशवहनाची भूमिका महत्त्वाची असते.

(२) दोन व्यक्ती किंवा संस्थामधील अंतराची समस्या संप्रेषणामुळे दूर केली जाते. संप्रेषणामुळे कोणत्याही स्वरूपातील व्यावसायिक माहिती अत्यंत जलदपणे दुसऱ्या व्यावसायिकापर्यंत पोहोचते. परिणामकारक संप्रेषणामुळे कच्चा माल व इतर आवश्यक घटक, पक्क्या मालाच्या उत्पादना ठिकाणी योग्य त्या संदेशाद्वारे पाठवता येते. तसेच योग्य संदेशवहनाद्वारे तयार झालेला पक्का माल, विविध बाजारपेठेत उपभोक्त्यापर्यंत पाठवणे शक्य होते. त्यामुळे वेगाने बाजारपेठेचा विस्तार होतो व देशाची प्रगती शक्य होते.

(३) ज्या ठिकाणी व ज्या वेळी माहितीची मागणी आहे, त्या ठिकाणी, त्या वेळी त्वरित माहिती व संदेश संदेशवहनाच्या माध्यमाद्वारे देणे शक्य होते. परिणामकारक संदेशवहनामुळे आंतरराष्ट्रीय संपर्कात वाढ होते. शंका व अडथळे दूर होतात. तसेच राष्ट्रीय बाजारपेठेचाही विकास शक्य होतो. शेती उत्पादने, औदयोगिक उत्पादने जगाच्या व राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संदेशवहनाद्वारे पोहोचवणे शक्य होते व त्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागतो.

(४) परिणामकारक संप्रेषणामुळे उत्पादन खर्च मर्यादित ठेवणे व मालाची वितरण साखळी अधिक सक्षम व प्रभावी करणे शक्य होते. मागणीनुसार जेथे गरज आहे तेथे पुरवठा करणे संप्रेषणामुळे शक्य होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनाला व व्यवसाय विकासाला हातभार लागतो.

) प्रत्यासनाचे तत्त्व हे सर्व नुकसानभरपाईच्या करारांस लागू पडते.

उत्तर : १) प्रत्यासनाच्या तत्त्वानुसार विमाधारकाच्या ज्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यासंबंधी पूर्ण नुकसानभरपाई दिल्यानंतर, सदर मालमत्तेचा हक्क विमा हमीदार किंवा विमा कंपनीकडे वर्ग होतो. नुकसानभरपाई मिळाल्यानंतर विमेदार वस्तू ताब्यात ठेवू शकत नाही.

) प्रत्यासन तत्त्वानुसार ज्या मालमत्तेची हानी झाली, मालमत्तेचे काही मूल्य शिल्लक असेल, तरच हे अधिसत्तेचे तत्त्व लागू होते. कारण आगीमध्ये, पुरामध्ये, वादळामध्ये अथवा अन्य कोणत्याही कारणाने जर मालमत्तेचा/वस्तूचा काही भाग संरक्षित (वाचला) असेल, तर विमेकरी सदर शिल्लक मालमत्ता स्वत:कडे ठेवून घेऊ शकत नाही. ती विमा कंपनीकडे सुपूर्त करावी लागते; कारण संपूर्ण मालमत्तेची नुकसानभरपाई कंपनीने घेतलेली असते.

३) नुकसानभरपाईच्या तत्त्वाप्रमाणेच प्रत्यासनाचे तत्त्व सर्व प्रकारच्या विमा योजनेसाठी लागू असते. फक्त जीवन विमा यासाठी अपवाद मानला जातो. कारण जीवनविम्यामध्ये व्यक्तीच्या मृत्यूचे मूल्य करता येत नसते. जीवन विम्यामध्ये नुकसानभरपाई व प्रत्यासन याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण इतरबाबतीत मालमत्तेच्या हानीची भरपाई झालेल्या निश्चित नुकसानीच्या साहाय्याने विमेकरी करू शकतो. नुकसानकारक घटना घडून गेल्यानंतरही ज्या मालमत्तेला मूल्य शिल्लक राहते, अशाच स्थितीत हे तत्त्व लागू असते.

) ‘साठवणूक’ ही महत्त्वपूर्ण आहे.

उत्तर : (१) साठवणूक म्हणजे गोदामांमध्ये मालाचा साठा करण्यासंबंधीच्या सर्व क्रिया होय. आधुनिक काळामध्ये उत्पादन एकाविशिष्ट वेळी होते, तर त्याचा उपभोग किंवा मालाची विक्री दुसऱ्या अन्य वेळी केली जाते. उत्पादन व उपभोग यामधील अंतर खूप पाद असते. या काळामध्ये मालाच्या साठवणुकीचे महत्त्व अधिक असते. ते. अनेक शेती उत्पादने विशिष्ट हंगामामध्ये घेतली जातात; परंतु त्यांचा उपभोग वर्षभर घेतला जातो. उदा., तांदूळ, साखर, गहू,

विविध कडधान्ये इत्यादी. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साठवून ठेवणे गरजेचे असते.

(२) काही उत्पादने अशी असतात ज्यांच्यावर प्रक्रिया करावी लागते, स्थिती कायम टिकवावी लागते. जसे, मासे, फळे, इत्यादी. बाजारपेठेमध्ये नफा खरेदी रोखणे, किंमत नियंत्रण राखणे यासाठी मालाची साठवण व मागणीनुसार मालाचा पुरवठा आवश्यक असतो. अशा प्रकारे साठवणूक कार्यामुळे मागणी व पुरवठ्याचे संतुलन साधले जाऊन किंमत नियंत्रित राहते. साठवणुकीची आवश्यकता नाशवंत मालासाठी खूप असते. अशा वस्तू शीतगृहामध्ये ठेवून सुरक्षित राहतात. उदा., फळे, मटण, मासे, अंडी, भाजीपाला, औषधे, दुग्धजन्य पदार्थ पनीर, बटर इत्यादी. तसेच विविध बाजारपेठेत वाहतूक साधनाने मालाचा सुरळीत पुरवठा करणे साठवणूक कार्यामुळे शक्य होते. साठवणुकीमुळे विपणनाची इतर कार्येही पूर्ण होतात. जसे, संवेष्टन, मुद्रांकन, प्रमाणीकरण, प्रतवारी इत्यादी.

)  ए.टी.एम. मधून कधीही पैसे काढता येतात.

उत्तर : (१) ATM हे Automated Teller Machine याचे संक्षिप्त रूप आहे. या यंत्राद्वारे 'दिवसाच्या सर्वकाळ रकमेची सोय (All Time Money)' असते. दिवसात कोणत्याही वेळेला (Any Time Money) रकमेची सोय असते. ATM हे इलेक्ट्रॉनिक्स (ऋण विद्युतकणांच्या गतीवर चालणारे यंत्र) पद्धतीने पैसे काढण्याचे यंत्र आहे. हे एक स्वयंसेवा देणारे मानवरहित स्थिर यंत्र आहे.

(२) ATM ही बँकेकडून खातेधारकांना पुरवल्या जाणाऱ्या अनेक सुविधांपैकी एक महत्त्वाची सुविधा आहे. अशी सुविधा देण्यासाठी बँका ATM यंत्रे बँकेत अथवा बँकेच्या आवारात, तसेच रेल्वे स्टेशन खरेदीगृह (Mall), विमानतळ, गजबजलेल्या रस्त्याच्या कडेला इत्यादी सार्वजनिक सोयींच्या ठिकाणी स्थापन करतात.

(३) ATM मधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक खातेधारकास बँक विशिष्ट सांकेतिक संख्या (Code Number) देते. कोणत्याही वेळेस किंवा आर्थिक अडचणींच्या प्रसंगी खातेदार ATM यंत्र कार्यरत करून व सांकेतिक संस्थेचा वापर करून १०० रुपयांच्या पटीत कमीत कमी ₹१०० व जास्तीत जास्त एका विशिष्ट मर्यादेपर्यंत किंवा त्यांच्या खात्यात शिल्लक असलेली रक्कम यांपैकी कमी असलेली रक्कम काढू शकतो.

 (४) ATM प्रणालींमुळे खातेधारकास बँकेत शिल्लक असलेल्या रकमेची पूर्णपणे रोकड सुलभता प्राप्त होते. बँकेच्या कामकाजाच्या वेळे व्यतिरिक्त, रजेच्या दिवशी, रविवारी किंवा कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी खातेधारक (ATM User) अशा यंत्रातून पैसे काढू शकतो. ही सेवा २४ तास उपलब्ध असते.

         अशी सुविधा देशाच्या विविध भागात, तसेच देशाच्या बाहेरही उपलब्ध असते. तसेच या सुविधेमुळे खातेधारकास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना अथवा पर्यटनाला जाताना भरपूर रोकड सोबत न्यावी लागत नाही.

प्रश्न ७ खालील प्रश्न सोडवा.

) पोस्टाने पैसे पाठविण्याच्या सेवा लिहा.

उत्तर- प्रश्न क्र. ८ मधील उपप्रश्न ५ पहा.

२) सागरी विम्याचे प्रकार लिहा

उत्तर- • सागरी विम्याचे प्रकार पुढीलप्रमाणे :

) प्रवास विमा : सागरी विमापत्रात जहाजावरील मालाचे ठरावीक प्रवासासाठी विमापत्र घेतले जाते. यामध्ये वेळेचे बंधन नसते जहाजाने प्रवास सुरू केल्यानंतरच धोक्यांपासून होणाऱ्या संरक्षणास सुरुवात होते. उदा., मुंबई ते टोकियो सागरी प्रवास.

) वेळ विमा : वेळ विमापत्र म्हणजे समुद्रामध्ये उद्भवणाऱ्या धोक्यांपासून एका ठरावीक वेळेपर्यंत संरक्षण देणे. वेळ विमापत्र एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी नसते. परंतु हे विमापत्र पुढे चालू ठेवता येते. विमापत्र पुढे चालू ठेवणे म्हणजे ठरावीक वेळेत त्या जहाजाने प्रवास पूर्ण केला नाही, तर जोपर्यंत ते जहाज तो प्रवास पूर्ण करीत नाही किंवा ते जहाज बंदरावर पोहोचत नाही, तोपर्यंत धोक्यांपासून संरक्षण मिळते.

) मिश्र विमा : मिश्र विमापत्र हे वेळ विमापत्र व सागरी विमापत्र यांचे एकत्रीकरण आहे. या विमापत्रात ठरावीक प्रवासाचा मार्ग आणि ठरावीक वेळ या दोन्ही विमापत्रातील धोक्यांपासून संरक्षण मिळते. उदा., मुंबई ते सिंगापूर प्रवास २५ फेब्रुवारी २०१९ ते २५ मार्च २०१९ असे विमापत्र घेता येते.

) मूल्याधारित विमा : मूल्याधारित विमापत्रामध्ये ज्या मालाचा विमा उरतवला जातो, त्याचे मूल्य विमा कंपनी व विमेदार दोघे मिळून ठरवतात व त्या मूल्याचा उल्लेख विमापत्रामध्ये केला जातो. ज्या मालाची किंमत ठरवणे (मूल्यांकन करणे) अवघड असते, अशा मालासाठी मूल्यनिर्धारण करणे सोपे होते. गृहीत धरलेले मूल्य हे वास्तविक किमतीपेक्षा जास्त असते.

(५) ब्लंकेट (संपूर्ण) विमा : या विमा योजनेमध्ये ज्या मालाला किंवा जहाजाला विमा संरक्षण घ्यावयाचे आहे, ते जास्तीत जास्तमर्यादेसाठी घेतले जाते. या योजनेनुसार विमा हप्त्याची संपूर्ण रक्कम विम्याच्या सुरुवातीलाच विमाधारकाकडून विमा कंपनी वसूल करते. तसेच विमापत्रामध्ये ज्या मालाचा विमा उतरवला आहे, त्या मालाचे संपूर्ण वर्णन, स्वरूप आणि विशिष्ट मार्ग, प्रवासाची ठिकाणे याचे वर्णन असते.

(६) बंदर जोखीम विमा : ठरावीक कालावधीसाठी जहाज बंदरावर नांगरलेले असताना असलेले धोके बंदर जोखीम विमापत्रात समाविष्ट असतात. बंदरावर जहाज जोपर्यंत थांबलेले आहे. त्या कालावधीसाठी म्हणजेच जहाज बंदर सोडेपर्यंत असणाऱ्या धोक्यापासून या विम्यामुळे संरक्षण मिळते.

(७) संमिश्र विमा : संमिश्र विमा एकापेक्षा जास्त विमा कंपन्यांकडून घेतला जातो. प्रत्येक विमा कंपनीची देयता स्वतंत्र व भिन्न असते. ज्या वेळेस विम्याची रक्कम खूप मोठी असते, त्या वेळेस हे विमापत्र घेतले जाते. प्रत्येक विमा कंपनीचे दायित्व निश्चित व स्वतंत्र असते.

(८) एक जहाज विमा : एक जहाज विमा हा प्रकार सागरी विम्यामध्ये लहान जहाज मालकांसाठी उपयुक्त प्रकार आहे. संपूर्ण ताफ्यामध्ये फक्त एकच जहाज ज्या मालकाचे असते, तो जहाज मालक या प्रकारचा विमा घेतात.

(९) ताफा किंवा एकगठ्ठा विमा : या सागरी विमा प्रकारामध्ये जेव्हा एकाच मालकाकडे अनेक जहाजे असतात, अशी व्यक्ती अनेक जहाजांचा एकत्र विमा उतरवते. एकगठ्ठा विमा प्रकारानुसार मालवाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जहाजांचा नुकसानीचा विमा घेतला जातो. यामध्ये ते जहाज जेव्हा रेल्वे, रस्ता आणि समुद्रमार्गे येत असते, तेव्हा ते होणाऱ्या नुकसानींचा यात अंतर्भाव होतो.

) गोंदमांचे प्रकार सांगा.

उत्तर- प्रश्न ८ मधील उपप्रश्न ३ पहा.

) बँकेची (उपयुक्तता) कार्ये सांगा.

उत्तर : (१) धनादेश व ड्राफ्ट देणे : 'धनादेश' म्हणजे खातेदाराने आपल्या बँकेला पतपत्रावर ज्याचे नाव आहे, त्याला पैसे देण्याचा दिलेला आदेश, तर व्यक्तीरिक्त खातेदाराने दिलेल्या माहितीनुसार एका बँकेने दुसऱ्या बँकेला, ज्याचे नाव प्रपत्रावर आहे त्याला पैसे द्यावेत असा दिलेला आदेश म्हणजे 'ड्राफ्ट' होय. बँक ड्राफ्ट हा खातेदार किंवा खातेदार नसलेली व्यक्ती बनवू शकते. परंतु चेक हा ज्याचे बँकेत खाते आहे, त्यालाच वितरीत केला जातो. चेक किंवा ड्राफ्टच्या व्यवहारांसाठी बँक काही खर्च (Charges) आकारते.

(२) लॉकर सुविधा : बँक आपल्या खातेदारांना लॉकर्स उपलब्ध करून देते. त्यामध्ये खातेदार मौल्यवान वस्तू, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे इत्यादी सुरक्षित ठेवू शकतात. बँक आपल्या खातेदारांना ही सुविधा भाड्याने सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा लॉकर रेंट (भाडे) आकारून उपलब्ध करून देते.

(३) प्रकल्प अहवाल : खातेदाराला नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करावयाचा असल्यास, सुरुवातीला प्रकल्पाविषयीचा सविस्तर अहवाल तयार करणे आवश्यक असते. बँक आपल्या खातेदारासाठी अभ्यासपूर्ण व सर्व तांत्रिक बाजू, आकडेवारी संग्रहित करून, व्यवहार्य अशा प्रकारचा अहवाल तयार करते. प्रकल्प अहवालाचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे व्यवसायासाठी भांडवल (फंड) उभे करण्यासाठी, वित्तीय संस्थांच्या निरीक्षणासाठी व शासकीय मान्यतेसाठी हा प्रकल्प अहवाल उपयुक्त ठरतो.

(४) भेट धनादेश व सुवर्ण नाणी : बँक आपल्या खातेदारांना किंवा बिगर खातेदारांनासुद्धा नाममात्र खर्च आकारून भेट धनादेश, तसेच मागणीनुसार सुवर्ण नाणी उपलब्ध करून देते. रोख स्वरूपात भेट देण्याऐवजी या स्वरूपात भेट देणे, ही पद्धत भारतात अधिक स्वीकारार्ह व रास्त वाटते. साधारणपणे वाढदिवस, लग्न समारंभ, नामकरण विधी इत्यादी समारंभात भेट धनादेश व सुवर्ण नाणी उपयोगात आणली जातात.

(५) भाग विमेकरी : कंपनी स्थापना प्रक्रियेमध्ये 'भागविमेदाराची आवश्यकता असते. बँक कंपनी व सरकारी अस्थापनांना भांडवल उभारणीसाठी मदत व्हावी यासाठी 'विमेदार' म्हणून सेवा उपलब्ध करून देते. यामध्ये बँक कंपनी किंवा सरकारी अस्थापनांना भांडवल (भाग व कर्ज रोखे) उभारणीबाबत खात्री देते. यासाठी बँक काही खर्च (charges) आकारते.

(६) सोने गुंतवणुकी संदर्भात सेवा : आधुनिक काळामध्ये मोठे व्यापारी सोने गुंतवणुकी संदर्भात आपल्या ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देतात. म्हणजेच विविध बँका ग्राहकांच्यावतीने सोने व सोन्याचे दागिने खरेदीचे व्यवहार करतात. तसेच काही बँका गोल्ड फंड, गोल्ड ETF इत्यादींमध्ये गुंतवणुकीसाठी सल्ला देते.

) संप्रेक्षणाची पारंपरिक साधने लिहा.

उत्तर-प्रश्न क्र ८ मधील उपप्रश्न ५ पहा.

६) हवाई वाहतुकीच्या मर्यादा (दोष) स्पष्ट करा.

उत्तर : हवाई वाहतुकीच्या मर्यादा पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील.  सर्वांत महागडा प्रकार : इतर वाहतूक साधनांचा विचार करता हवाई वाहतूक खूप महाग किंवा खर्चीक असते..

) विपरीत हवामानाचा परिणाम : हवेत झालेले अचानक बदल जसे, खूप मोठा पाऊस, बर्फ पडणे, ढग दाटून येणे याचा परिणाम हवाई वाहतुकीवर होतो.

) कमी अंतरासाठी अयोग्य : हवाई वाहतुकीद्वारे प्रवासी व मालाची वाहतूक खूप लांब अंतरावर करणे सोयीचे असते. जड व मोठ्या आकारमानाच्या वस्तू वाहतुकीसाठीही हा प्रकार कमी अंतरासाठी अयोग्य व खर्चीक असतो.

) खूप मोठी भांडवल गुंतवणूक : इतर वाहतूक साधनांचा विचार केला असता, हवाई वाहतुकीसाठी खूप मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. जसे, विमानतळांचे बांधकाम, धावपट्टी, रडार यंत्रणा, विमाननिर्मिती यासाठी खूप मोठे भांडवल लागते.

) आंतरराष्ट्रीय निबंध : हवाई वाहतूक ही आकाशमार्गे अनेक देशांच्या सीमा ओलांडून होत असते. त्यासाठी अनेक देशांच्या अनुमतीची आवश्यकता असते. काही देश अनुमती देत नाहीत. आंतरराष्ट्रीय अनेक बंधनांचे पालन करावे लागते.

) मर्यादित वहन क्षमता : इतर वाहतूक साधनांबरोबर तुलना केली असता, हवाई वाहतुकीद्वारे प्रवाशांच्या तसेच माल वाहतुकीवरही मर्यादा येते. मर्यादित प्रवासी संख्या वाहून नेता येते. अवजड व मोठे आकारमान असलेल्या वस्तूंची वाहतूक अशक्य असते.

७) गोदामांची कार्ये पुढीलप्रमाणे स्पष्ट करा.

(१) मालाची साठवण : मालाची साठवण हे गोदामांचे मूलभूत कार्य आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादित झालेला माल चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवण्यासाठी गोदामे भरपूर जागा उपलब्ध करून देतात. मालाचे उत्पादन अथवा खरेदी झाल्यापासून ते माल अंतिम उपभोक्त्याला विकला जाईपर्यंत त्याचे गोदामात व्यवस्थित संग्रहण केले जाते.

२) किंमत स्थिरीकरण : मालाची किंमत बाजारपेठेमध्ये स्थिर ठेवण्यामध्ये गोदामे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. गोदामांमुळे मागणी व पुरवठ्याचे संतुलन राखले जाते. गोदामांच्या कार्यामुळे 'वेळ उपयोगिता' निर्माण होते. बाजारपेठेमध्ये वस्तूला जेव्हा मागणी निर्माण होते, तेव्हा मालाचा पुरवठा गोदामातून केला जातो. मागणी व पुरवठ्यांचा योग्य समन्वय साधल्यामुळे वस्तूंच्या किमतीत वाढ न होता वस्तूंची किंमत स्थिर राहण्यास मदत होते.

) जोखीम पत्करणे : गोदामांमध्ये जेव्हा मालाचा साठा केला जातो, तेव्हा चोरी, आग, ऊन, वारा, पाऊस, जंतू, कीटक यांपासून उत्पादकांच्या मालाचे नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाते व आहे त्या परिस्थितीत किंवा सुस्थितीत परत केला जातो. जर साठवणूक काळामध्ये मालाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी गोदाम चालकावर असते. अशा प्रकारे जोखीम मालकाकडून, गोदाम चालकावर येऊन पडते.

) वित्त पुरवठा : गोदामामधील मालाच्या साठ्याच्या आधारे विविध संस्था किंवा गोदाम चालकाकडून कर्ज उभारणी करता येते. गोदामामधील मालाचा साठा त्यासाठी तारण म्हणून उपयोगात आणला जातो. घेतलेल्या कर्ज रकमेतून व्यवसायाच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या जातात.

) वर्गवारी आणि प्रतवारी : साठवणूक काळामध्ये अनेक विपणन कार्ये गोदामांमध्ये केली जातात. जसे, वर्गवारी करणे, मालाला वेस्टन करणे, त्यांना चिन्ह देणे इत्यादी कार्ये उत्पादक, घाऊक व्यापारी, आयातदार, निर्यातदार यांच्यावतीने करण्यासाठी कर्मचारी व पुरेशी जागा तसेच विविध सुविधा गोदामे पुरवतात.

) वाहतूक : काही गोदाम संस्था व्यापाऱ्यांना वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देतात. अशा वाहतूक व्यवस्था उत्पादन स्थळातून अथवा बाजारपेठेतून माल गोळा करतात व गोदामापर्यंत पोहोचवतात. तसेच साठवण केलेला माल विविध बाजारपेठांत अथवा उपभोग केंद्रापर्यंत पोहोचवतात.

७) वेळ आणि स्थल उपयोगिता : मागणीनुसार योग्य वेळी मालाचा पुरवठा करून गोदामे वेळ (समय) उपयोगिता निर्माण करतात. तसेच ज्या ठिकाणी मालाला मागणी असते, त्या ठिकाणी मालाचा पुरवठा करून स्थल उपयोगिता निर्माण करतात.

) प्रक्रिया करणे : काही विशिष्ट माल वापरण्यायोग्य अथवा उपभोगयोग्य करण्यासाठी काही प्रक्रियांची आवश्यकता असते. उदा., फळे पिकवणे, तांदूळ पॉलिश करणे, लाकडाचे ओंडके विशिष्ट आकारात कापणे इत्यादी प्रक्रिया मालकांच्या वतीने करण्यासाठी गोदामे पुरेशी जागा, कर्मचारी व सुविधा देतात.

 

प्रश्न ८. पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा.

१) विमा म्हणजे काय? विम्याची विविध तत्त्वे स्पष्ट करा.

उत्तर : अर्थ : विमा हा एक करार असून, त्याद्वारे विमा कंपनी विमेदाराने दिलेल्या मोबदल्यात विमेदाराला करारात नमूद केलेल्या संभाव्य धोक्यांपासून नुकसान झाल्यास, त्याची भरपाई करण्याचे आश्वासन देते.

व्याख्या : विमा कायदा १९३८ मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार, विमा ही एक तरतूद आहे. जी एका जाणकार व्यक्तीने भविष्यातील अनिश्चित बाबींबद्दल केलेली असते.

          विम्याची विविध तत्त्वे पुढीलप्रमाणे वर्णन करता येतील :

(१) परमोच्च विश्वास तत्त्व : विमा उतरवण्याचा हेतू म्हणजे नुकसानभरपाई मिळवणे हा असतो. त्यामुळे विम्याचा करार करताना विमेदार व विमा कंपनी दोन्ही पक्षांनी विम्याशी संबंधित अशी सर्व माहिती एकमेकांना स्पष्ट, सत्य व असंदिग्ध भाषेत स्पष्ट करणे आवश्यक असते, यालाच परमोच्च विश्वास (किंवा परस्पर विश्वास) तत्त्व म्हणतात. जर विमेदाराने काही माहिती खोटी किंवा अवास्तव सांगितली किंवा काही माहिती हेतुपुरस्सर गुप्त ठेवली असे आढळून आले, तर विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास बंधनकारक नसते. विमा कंपनीनेसुद्धा हे तत्त्व पाळले पाहिजे. विमा कंपनीने विमेदाराला विम्याचा करार व अटी यासंबंधी संपूर्ण व खरी माहिती दिली पाहिजे. उदा., विमा उतरवते वेळी श्री. हरी यांनी त्यांच्या किडनी आजाराविषयी माहिती दिली नाही व त्यांच्या मृत्यूनंतर जर ते कारण निष्पन्न झाले, तर त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळत नाही.

(२) विमाहित तत्त्व : ज्या वस्तूचा विमा उतरवायचा आहे. त्या वस्तूमध्ये विमेदाराचे विमाहित (किंवा विमेय हित) असल्याशिवाय, त्या वस्तूचा विमा उतरवता येत नाही. याचा अर्थ असा की, ज्या वस्तूचा विमा उतरवायचा असेल, त्या वस्तूच्या अस्तित्वामुळे विमेदाराचा आर्थिक फायदा होत आहे किंवा त्या वस्तूच्या नाशामुळे त्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. हे विमेदारास सिद्ध करता आले पाहिजे. तसेच एखादा मनुष्य स्वत:चा किंवा तो ज्या व्यक्तीवर अवलंबून आहे त्या व्यक्तीचा आयुर्विमा उतरवू शकतो; कारण त्यामध्ये त्याचे विमायोग्य हित असते. यानुसार व्यापाऱ्याला स्वत:च्या गोदामात, धनकोला ऋणकोच्या जीवितामध्ये, तसेच बँकेला गहाण म्हणून ठेवून घेतलेल्या वस्तूंमध्ये विमेय हित असते.

(३) नुकसानभरपाईचे तत्त्व : जीवन विमा कराराव्यतिरिक्त सर्व विम्यांचे करार हे नुकसानभरपाईचे करार असतात. विमित धोका प्रत्यक्षात घडला, तर विमा कंपनी विमेदाराला विम्याची संपूर्ण रक्कम किंवा त्यांचे जेवढे आर्थिक नुकसान झाले आहे ती रक्कम, या दोन रकमांपैकी जी रक्कम कमी असेल, तेवढीच भरपाई देण्याचे आश्वासन देते. या तत्त्वाला, 'नुकसानभरपाई तत्त्व' म्हणतात. कोणत्याही परिस्थितीत विमेदाराला विम्यापासून जास्त नुकसानभरपाईद्वारा नफा मिळणार नाही, याची खबरदारी विमा कंपनीकडून घेतली जाते. उदा., एखादया व्यक्तीने आपल्या मालमत्तेचा ५ लाखांचा अग्नी विमा उतरवला व त्याच्या मालमत्तेचे अग्नीपासून २ लाखांचे नुकसान झाले, तर त्या व्यक्तीला फक्त २ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळेल. परंतु ते तत्त्व जीवन विम्याला लागू नाही. जर जीवन विमा ₹ १० लाख असेल, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा कालावधी संपल्यानंतर, दोन्हीपैकी जे आधी घडेल त्याप्रमाणे विम्याची पूर्ण रक्कम मिळते

(४) प्रत्यासन तत्त्व : प्रत्यासन तत्त्व हे नुकसानभरपाईच्या तत्त्वापासूनच निर्माण झाले आहे. हे तत्त्व सर्व प्रकारच्या नुकसान- भरपाईंच्या करारांना लागू आहे; परंतु जीवन विमा कराराला हे तत्त्व लागू पडत नाही. या तत्त्वानुसार विमा कंपनीने विमेदाराला कराराप्रमाणे नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम दिल्यानंतर विमा कंपनीला विमेदाराचे त्या वस्तूसंबंधी सर्व हक्क समर्पित होतात. म्हणूनच या तत्त्वाला अधिकार समर्पणाचे तत्त्व' असेही म्हणतात. उदा., एका कार मालकाने आपल्या कारसाठी ₹ २,००,०००/- किमतीचा अपघात विमा उतरवला असेल व भविष्यात सदर कारला अपघात होऊन पूर्ण नुकसान झाले, तर विमा कंपनी विमेदाराला ₹ २,००,०००/- नुकसानभरपाई देते. परंतु नुकसान झालेल्या कारचा ताबा विमा कंपनीकडे येतो. ती सदर अपघाती कार विकून विमा कंपनी आपला तोटा कमी करू शकते.

(५) योगदानाचे तत्त्व : एखादी व्यक्ती आपल्या मालमत्तेचा विमा दोन किंवा जास्त विमेकरी संस्थाकडून उतरवून घेऊ शकते. भरपूर सुरक्षितता मिळावी या उद्देशाने असा विमा उतरवला जाते. जर नुकसान झाले, तर विमेदाराला दोन्ही विमा कंपन्यांकडून संपूर्ण नुकसानभरपाई मिळू शकत नाही. सर्व विमा कंपन्या संयुक्तपणे नुकसानभरपाईची एकूण रक्कम देतात. अशावेळी अंशदायित्व/योगदान कार्यान्वित होते. या तत्त्वानुसार, विमापत्राच्या मूल्यांच्या प्रमाणात प्रत्येक विमा कंपनी नुकसानभरपाईसाठी रक्कम देईल. विमेदाराने नुकसानभरपाईची रक्कम एका विशिष्ट कंपनीकडून घेण्याचे ठरवले, तर ती विमा कंपनी इतर विमा कंपन्याकडून विमापत्राच्या मूल्यांच्या प्रमाणात नुकसानभरपाईची रक्कम वसूल करू शकते. उदा., डॉ. अशोक यांनी आपल्या मालमत्तेचा एकूण ₹ २,००,००० चा विमा 'X' विमा कंपनीकडे ६०% रक्कम म्हणजेच ₹ १,२०,००० व 'Y' विमा कंपनीकडे ४०% रक्कम म्हणजेच ₹८०,००० चा विमा उतरवला आहे. समजा डॉ. अशोक यांच्या मालमत्तेचे आगीमुळे एकूण नुकसान ₹ १,५०,०००/- चे झाले, तर हे नुकसान 'X' कंपनी ६०% म्हणजेच ₹ ९०,०००/- भरपाई म्हणून देईल व 'Y' कंपनी ४०% म्हणजेच ₹६०,००० भरपाई म्हणून देइल. यालाच योगदानाचे तत्त्व म्हणतात.

६) नुकसान कमी करण्याचे तत्त्व : ज्या वेळी विमित धोक्यासंबंधीची नुकसानकारक घटना घडते, उदा., आग लागणे, जहाज बुडणे इत्यादी, त्या वेळी विमित संपत्तीचे होणारे नुकसान कमीत कमी करण्यासाठी शक्य तेवढ्या उपाययोजना करणे हे विमेदाराचे कर्तव्य असते. या तत्त्वाला 'नुकसान कमी करण्याचे तत्त्व' म्हणतात. मालमत्तेचा विमा उतरवलाच नाही, असे समजूनच विमेदाराने मालमत्तेची काळजी घेणे अपेक्षित आहे. विमा उतरवला आहे म्हणून त्याने गाफील राहता कामा नये. उदा., किशोर यांनी आपल्या घराचा विमा उतरवला आहे व अचानक शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली, तर अशा वेळी किशोर यांनी सर्व संभाव्य उपाय त्वरित करायला सुरुवात करणे आवश्यक आहे.

(७) सर्वसाधारण कारण तत्त्व : ज्या वेळेस विमा काढलेल्या मालमत्तेचे नुकसान अनेक कारणांनी झालेले असेल, त्या वेळेस विमा कंपनी नुकसानभरपाई देताना जवळचे कारण कोणते आहे, हे निश्चित करते. यालाच 'सर्वसाधारण कारण तत्त्व' म्हणतात. मालमत्तेचा विमा ठरावीक कारणांसाठीच उतरवला जातो. मालमत्तेच्या नुकसानीचे सर्वसाधारण कारण जर त्या ठरावीक कारणांमधील एक असेल, तर विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास जबाबदार ठरते, अन्यथा नाही.

) बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा.

उत्तर : अर्थ : पैसा आणि पत यांचा व्यवहार करणाऱ्या संस्थेस 'बँक' म्हटले जाते. सर्वसामान्य जनतेकडून ठेव रूपाने पैसे गोळा करून त्या पैशातून विविध कारणांसाठी अथवा उद्देशांसाठी ज्यांना कर्ज व उचल रकमांची गरज आहे, त्यांना ते उपलब्ध करून देण्याचे कार्य बँक करतात.

व्याख्या : बँकिंग नियमन कायदा, १९४९ नुसार, “जी संस्था कर्ज देण्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी, लोकांकडून मागताक्षणी ताबडतोब वा मुदतीप्रमाणे परत करण्यासाठी ठेवी स्वीकारते व या ठेवी परत काढण्यासाठी चेक्स, ड्राफ्ट वा अन्य प्रकारे सुविधा उपलब्ध करून देते ती संस्था म्हणजे 'बँक' होय.

बँकांचे प्रकार :

(१) मध्यवर्ती बँक : कोणत्याही देशाच्या अंतर्गत बँक व्यवसायातील संस्थांमध्ये सर्वोच्च असणारी शिखर बँक म्हणजे 'मध्यवर्ती बँक' (Central Bank) होय. या बँकेची स्थापना विशेष कायद्यान्वये केलेली असते. संपूर्ण देशाच्या बँक रचनेमध्ये या बँकेला मध्यवर्ती स्थान असते; म्हणून ही बँक देशातील सर्व बँकांचे नियंत्रण व नियमन करते. सर्व व्यापारी बँकांची बँक आणि सरकारची बँक म्हणून ही बँक कार्य करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कायदा १९४४ अन्वये, तिची स्थापना १९४५ मध्ये झाली. तसेच बँक ऑफ इंग्लंड, इंग्लंड; फेडरल रिझर्व्ह बँक, अमेरिका यासुद्धा मध्यवर्ती बँका म्हणून ओळखल्या जातात.

 (२) व्यावसायिक बँका : व्यावसायिक बँका देशाच्या अर्थ- व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. देशाच्या आर्थिक, औद्योगिक व सामाजिक विकासाला चालना देतात. व्यावसायिक बँक प्रामुख्याने दोन प्रकारची कार्ये करतात.

(i) प्राथमिक कार्ये : ज्यामध्ये लोकांकडून ठेवी स्वीकारणे व त्यांना त्यांच्या गरजेनुसार कर्जे देणे.

(ii) दुय्यम/उपयुक्त कार्ये : बँक या कार्यांमध्ये मध्यस्थ स्वरूपाची कार्ये करून ग्राहकांना अधिक बँकिंग सेवा प्रदान करतात.

              व्यापारी बँकेचे प्रकार पुढीलप्रमाणे सांगता येतील

(अ) सार्वजनिक क्षेत्रातील बँका : ज्या बँकाच्या मालकी हक्कात तसेच भांडवलामध्ये, व्यवस्थापनामध्ये भारत सरकारचा मोठा सहभाग असतो, त्या बँकांना ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँका' म्हणतात. उदा., स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया इत्यादी.

(ब) खाजगी क्षेत्रातील बँका : ज्या बँकांच्या मालकी हक्कात, तसेच भाग भांडवलामध्ये व व्यवस्थापनात खाजगी व्यक्तींचा मोठा हिस्सा असतो, त्या बँकांना ‘खाजगी क्षेत्रातील बँका' म्हणतात. उदा., सारस्वत बँक, अॅक्सीस बँक, एच.डी.एफ.सी. बँक इत्यादी.

(क) परदेशी बँका : ज्या बँकांची नोंदणी व स्थापना परदेशात झालेली असते व ज्यांचे मुख्य कार्यालय परदेशात असते, तसेच त्यांच्या अनेक शाखा अनेक देशांत कार्यरत असतात, त्या बँकांना 'परदेशी बँका' म्हणतात. उदा., स्टँडर्ड चार्टर्ड बँक, अमेरिकन एक्स्प्रेस बँक, हाँगकाँग ॲण्ड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन इत्यादी.

(३) सहकारी बँक : सहकारी बँका या प्रत्येक राज्यातील सहकारी संस्थांच्या कायदयानुसार स्थापन झालेल्या असतात. या बँका, व्यावसायिक बँक व्यवसायाची सर्वसाधारण कार्ये तर करतातच, त्याचबरोबर शेतकरी, कारागीर, पगारी कर्मचारी, स्वयं व्यावसायिक, लघू उदयोजक अशांची आर्थिक गरज भागवतात. ग्रामीण व निमशहरी भागांमध्ये या बँका कार्यरत असतात.

     सहकारी बँका पुढील तीन स्तरावर कार्यरत असतात.

(अ) प्राथमिक पतसंस्था : ग्रामीण क्षेत्रामध्ये अथवा छोट्या शहरात राहणारे कर्जदार, बिगर कर्जदार सभासदांनी स्थापन केलेल्या पतपुरवठा सहकारी संस्थेला 'प्राथमिक पतसंस्था' म्हणतात. अशा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र त्याच स्थानिक गावापुरते अथवा शहरापुरते मर्यादित असते. या सहकारी संस्था आपल्या सदस्यांना बी-बियाणे, खते, शेतीची अवजारे इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याकडील पैसा अल्पमुदतीच्या कर्ज रूपाने देतात.

(ब) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : ज्या सहकारी बँका जिल्हा पातळीवर कार्यरत असतात, त्या सहकारी बँकांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका' म्हणतात. प्राथमिक पतसंस्था या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सभासद असतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका प्राथमिक पतसंस्थांना आर्थिक पुरवठा करतात.

) राज्य सहकारी बँक : जी सहकारी बँक राज्य पातळीवर सहकारी पतपुरवठ्याची शिखर बँक म्हणून कार्य करते, त्या सहकारी बँकेला ‘राज्य सहकारी बँक’ म्हणतात. या बँका राज्यातील लोकांकडे असलेली बचत ठेवी स्वरूपात एकत्र करतात व तो पैसा उत्पादकीय कार्यामध्ये प्रवाहित करतात. तसेच या बँका जिल्हा बँकांमार्फत व प्राथमिक पतसंस्थांमार्फत कर्जदारांना पतपुरवठा करतात.

) औद्योगिक विकास बँक : औदयोगिक विकास बँका व्यावसायिक संस्थांना मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज देतात. यंत्रसामग्री खरेदी, आधुनिक तंत्रज्ञान, उद्योग व्यवसायाचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण इत्यादी कारणांसाठी या बँका वित्तपुरवठा करतात. IFCI (Industrial Finance Corporation of India), SFC (State Financial Corporation), MSFC (Maharashtra State Finance Corporation) इत्यादी नावाने विकास बँक वित्तपुरवठ्याचे कार्य करतात. औदयोगिक विकास बँक पुढीलप्रमाणे कार्य करतात.

 १) विस्तार व आधुनिकीकरणासाठी मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणे.

२) सार्वजनिक मर्यादित कंपनीच्या वतीने भागविमेदार म्हणून कार्य करणे.

३) विक्रीस काढलेले भाग व कर्जरोखे खरेदी करणे.

) विनिमय बँका : विनिमय बँका या प्रामुख्याने आयात व निर्यात व्यापाराच्या वृद्धीसाठी वित्तपुरवठा करतात. अमेरिकन एक्स्प्रेस बँक, बँक ऑफ टोकियो, बारक्लेस बँक इत्यादी बँका विनिमय बँका म्हणून प्रसिद्ध आहेत. विनिमय बँका पुढील प्रकारची कार्ये करतात.

 १) परदेशी व्यापार (आयात-निर्यात) व्यवहारांना वित्तपुरवठा करणे.

 २) निर्यातदारांना मागणीनुसार पतपत्र देणे.

 ३) विनिमय व्यवहारात (बिलामध्ये) सूट देणे.

 ४) लाभांश, व्याज आणि नफा इत्यादी खात्यावर पाठवणे.

) प्रादेशिक ग्रामीण बँक : प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना १९७५ मध्ये झाली. या बँकांचे प्रायोजकत्व सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकांनी केले. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भांडवल रचनेमध्ये केंद्र सरकार ५०%, राज्य सरकार १५% आणि प्रायोजित बँकांनी ३५% सहभाग घेतलेला असतो. प्रादेशिक ग्रामीण बँका प्रामुख्याने ग्रामीण व निमशहरी भागातील ठेवी एकत्र करतात. यामधून लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांना कर्ज देण्याचे काम या बँका करतात.

) बचत बँका : बचत बँक म्हणजे अशी बँक जिचा मुख्य उद्देश सर्वसामान्य जनतेमध्ये बचतीची सवय वृद्धींगत करणे हा असतो. सर्वसामान्य लोकांकडे असलेली बचत, जी ग्रामीण, शहरी, निमशहरी लोकांकडे विखुरलेल्या स्वरूपात असते, ती एकत्रित करणे व उत्तम आणि फायदेशीर प्रतिभूतीमध्ये गुंतवणे हा उद्देश असतो. भारतामध्ये पोस्टल सेव्हींग बँक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. व्यापारी बँका, तसेच सहकारी बँकांमध्येसुद्धा स्वतंत्र बचत खाते असल्याने त्याचे कार्यही बचत बँकेसारखेच असते.

) गुंतवणूक बँक : गुंतवणूक बँक आपल्या ग्राहकांना अर्थविषयक गुंतवणुकीसाठी सल्ला व मार्गदर्शन करण्याचे काम करते. या बँकेचे ग्राहक सर्वसाधारणपणे व्यावसायिक संस्था व सरकारी संस्था असतात. या बँका मुख्यतः गुंतवणूकविषयक मार्गदर्शन करतात. दोन संस्थांचे एकत्रीकरण, समापन यांसंबंधी संशोधनात्मक माहिती पुरवतात. या बँकांचा सर्वसामान्य लोकांशी प्रत्यक्ष संपर्क येत नाही.

) विशेष बँका : ज्या बँका विशिष्ट क्षेत्रातील गरजा ओळखून त्याप्रमाणे व्यावसायिकांच्या गरजेनुसार व्यवसाय स्थापनेसाठी व तो पुढे चालवण्यासाठी पतपुरवठा व इतर आवश्यक साहाय्य पुरवतात, त्या बँकांना ‘विशेष बँका’ म्हणतात.

) भारतीय आयात-निर्यात बँक (EXIM) : जी निर्यातदारांना व आयातदारांना त्यांच्या आयात-निर्यातीचा व्यवसाय स्थापन करण्यासाठी, तसेच तो व्यवसाय चालवण्यासाठी, तसेच वाढ व विस्तार यासाठी आर्थिक मदत व साहाय्य करते, त्या बँकेला भारतीय आयात-निर्यात बँक’ म्हणतात. ही बँक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसंबंधीची आवश्यक ती माहिती पुरवण्याचेही काम करते. आंतरराष्ट्रीय व्यापारवृद्धी व विस्तार यासाठी प्रयत्न करणारी बँक म्हणून ही बँक ओळखली जाते.

(ब) भारतीय लघू उद्योग विकास बँक (SIDBI) : SIDBI या बँकेची स्थापना संसदेमध्ये विशेष कायदा संमत करून २ एप्रिल १९९० रोजी करण्यात आली. या बँकेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश लघू उदयोगांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे हा असतो. ही बँक लघू उदयोगांना नवीन यंत्रसामग्री विकत घेण्यासाठी व आधुनिकीकरण करण्यासाठी आवश्यक तो वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याचे कार्य करते.

) राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) : या बँकेची, ग्रामीण बँकांची ‘शिखर बँक’ म्हणून कार्य करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे. ही बँक प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या माध्यमातून कृषी व ग्रामीण क्षेत्राला वित्तपुरवठा करणारी सर्वोच्च संस्था आहे. ही बँक सर्वसामान्य लोकांना सेवा देत नाही. फक्त शेतीविषयक पतपुरवठ्या संबंधीची कार्य करते.

) गोदामे म्हणजे काय? गोदामांची प्रकार  स्पष्ट करा.

उत्तर : अर्थ : ज्या इमारतीत अथवा ठिकाणी मालाची साठवण केली जाते, त्याला 'गोदाम' म्हणतात. मोठ्या गोदामात मालाचा साठा किंवा संग्रहण करण्यासाठी जी जी कार्ये करावी लागतात, त्या सर्वांना ‘साठवण' म्हणतात. मालाचे संग्रहण करणे हे विपणनाचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. साठवण ही संज्ञादेखील मालाचे संग्रहण करण्यासाठीच वापरली जाते. मालाचा साठा मोठ्या प्रमाणात व विशेष पद्धतीने केला जातो, तेव्हा त्याला ‘साठवणूक' म्हणतात.

उत्तर : गोदामांचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील :

) खाजगी गोदामे : जी गोदामे उत्पादक व घाऊक व्यापारी यांच्या मालकीची असतात व ज्या गोदामांचा उपयोग त्यांना फक्त त्यांच्याच मालाची साठवणूक करण्यासाठी होतो, अशा गोदामांना खाजगी गोदामे म्हणतात. फक्त मोठ्या कंपन्या म्हणजे ज्यांची उलाढाल मोठ्या प्रमाणात असते व भांडवल प्रचंड असते, अशा कंपन्या इतरांवर अवलंबून न राहता, स्वत:ची खाजगी गोदामे बांधतात. सार्वजनिक क्षेत्रातील अनेक संघटनांचीसुद्धा खाजगी गोदामे आहेत. या प्रकारची गोदामे खाजगी उदयोजकांच्या कारखान्यांच्या जवळच बांधलेली असतात. या प्रकारच्या गोदामांची देशभर संपर्क यंत्रणा तयार असते.

(२) सार्वजनिक गोदामे : जी गोदामे भाडे तत्त्वावर मालाची साठवण करण्याची सुविधा सर्व व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना पुरवण्यासाठी प्रस्थापित झालेली असतात, त्या गोदामांना 'सार्वजनिक/ व्यावसायिक गोदामे' म्हणतात. अशी गोदामे वैयक्तिक व्यापारी, भागीदारी संस्था, खाजगी कंपन्या इत्यादींच्या मालकीची असतात व त्यांच्याकडूनच त्यांचे व्यवस्थापन केले जाते. सर्व प्रकारच्या व्यावसायिक धोक्यांपासून मालाला संरक्षण देण्यासाठी खास बांधलेल्या इमारतीमध्ये अशी गोदामे रेल्वे स्टेशन, महामार्ग, विमानतळ, बंदरे अशा ठिकाणी बसलेली असतात.

(३) करदेय गोदामे : ज्या गोदामांना आयात केलेला माल सीमाशुल्क भरेपर्यंत स्वीकारण्याचा व साठवून ठेवण्याचा सरकारने परवाना दिलेला असतो. त्या गोदामांना 'करदेय गोदामे' म्हणतात. जोपर्यंत आयात मालाचे सीमाशुल्क भरले जात नाही, तोपर्यंत आयातदाराला मालाचा ताबा दिला जात नाही. जर आयातदार सीमाशुल्क पूर्ण भरू शकत नसेल, तर जेवढा माल तो घेऊन जातो त्यावरच शुल्क आकारले जाते. अशा रितीने, हप्ते भरून प्रमाणशिल शुल्क भरून माल सोडवून घेऊ शकतो. अशी गोदामे बंदराजवळ उभारली जातात व सरकारमार्फत अथवा सीमाशुल्क अधिकाऱ्यांमार्फत व्यवस्थापित व नियंत्रित केली जातात.

(४) करदत्त गोदामे : अशी गोदामे बंदराच्या जवळ वसलेली असतात, पण ती गोदीच्या हद्दीबाहेर असतात. या प्रकारची गोदामे गोदी अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतात. ज्यावेळी आयातकर्ता सीमाशुल्क भरतो, त्या वेळी त्याला माल बाहेर काढायची परवानगी मिळते. परंतु सर्व मालाला एकदम मागणी नसते. तसेच माल बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी लगेच वाहतूक व्यवस्था होणे कठीण असते. अशा परिस्थितीत या मालाचे बाजारपेठेत वितरण होईपर्यंत तो साठवून ठेवणे आवश्यक असते. ही सोय ‘करदत्त गोदामे' देतात. करदेय गोदामातील माल सीमाशुल्क भरल्यानंतर करदत्त गोदामात ठेवता येतो. जोपर्यंत माल अशा गोदामात आहे तोपर्यंत गोदी कारभार नियंत्रण मंडळ, जसे मुंबई पोर्ट ट्रस्ट मालाची संपूर्ण काळजी घेते.

(५) शासकीय गोदामे : ज्या गोदामांची मालकी व व्यवस्थापन व नियंत्रण केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सार्वजनिक कंपनी अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असते, त्या गोदामांना 'शासकीय गोदामे म्हणतात. ही गोदामे लहान व्यापारी, शेतकरी व व्यावसायिक इत्यादींना भाडे तत्त्वावर मालसाठा करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. अन्नधान्य व इतर मालाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय केंद्रीय गोदाम महामंडळ, राज्य गोदाम महामंडळ व भारतीय अन्नधान्य महामंडळ इत्यादींनी स्वत:ची गोदामे विविध राज्यांमध्ये उभारली आहेत.

(६) सहकारी गोदामे : सहकारी गोदामे म्हणजे सहकारी संस्थांची मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण असलेली गोदामे होय. त्यांचा उपयोग शेतकीमाल, ग्राहकोपयोगी वस्तू, कारखान्यांना लागणारा कच्चा माल यांचा साठा करण्यासाठी केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, छोट्या उत्पादकांना, छोट्या व्यापाऱ्यांना आपल्या मालाचे संरक्षण करण्यासाठी या गोदामांचा फार उपयोग होतो. कारण त्यांना सार्वजनिक किंवा व्यापारी गोदामांचे भाडे परवडत नाही.

(७) शीतगृहे : नाशवंत मालाचे दीर्घ काळापर्यंत रक्षण करण्यासाठी शीतगृहे' उपयुक्त ठरतात. आधुनिक काळात शीतगृहांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. उदा., भाजीपाला, फळे, फुले, अंडी मासे, मास, दुग्धजन्य पदार्थ, औषधे, पेये इत्यादी वस्तू शीतगृहात ठेवल्या तर त्या दीर्घ काळपर्यंत ताज्या व चांगल्या अवस्थेत राहतात शीतगृहांमुळे विशिष्ट हंगामामध्ये मिळणाऱ्या आणि नाशवंत वस्तु वर्षभर उपयोगात आणता येतात. हंगामी उत्पादन असणाऱ्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ शीतगृहामुळे उपलब्ध होते. जसे, हिरवे वटाणे, आंबे इत्यादी.

४) व्यावसायिक सेवा म्हणजे काय? विविध व्यावसायिक सेवा स्पष्ट करा.

उत्तर : अर्थ : व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी ज्या सेवांची आवश्यकता असते, त्यांना व्यावसायिक आनुषंगिक सेवा म्हणतात. वस्तू किंवा सेवा उत्पादित झाल्यापासून ते अंतिम ग्राहकापर्यंत उपभोगासाठी पोहोचेपर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या व्यावसायिक सेवा उपयुक्त ठरतात. यामध्ये एखादया व्यावसायिक प्रक्रियेला एकतर मदत होते किंवा संबंधितांना त्या प्रत्यक्षपणे देण्यात येतात.म्हणूनच सेवा अदृश्य आहेत व ग्राहकांसाठी त्या सहउत्पादित आहेत;

सेवांचा साठा करून ठेवता येत नाही. त्या एकाच वेळी उत्पादित व उपभोगल्या जातात. सेवा या निसर्गत: अदृश्य, भिन्न, अविभाज्य, विसंगत व नाशवंत आहेत. व्यवसाय सेवांमध्ये प्रामुख्याने पुढील प्रकार आहेत.

) बँकिंग (२) विमा (३) परिवहन (४) गोदाम (५) संचार.

व्याख्या : अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने व्यावसायिक सेवांची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे :

            “विक्री किंवा वस्तूंच्या विक्रीसंदर्भात देण्यात येणाऱ्या कृती, फायदे किंवा समाधान

 व्यावसायिक सेवांचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे

) बँकिंग सेवा : आधुनिक काळात प्रत्येक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे लागते. या उत्पादनासाठी भांडवल/ वित्तपुरवठ्याची आवश्यकता असते. व्यवसायाला आवश्यक वित्तपुरवठा करणाऱ्या व्यावसायिक सेवेला ‘बँकिंग सेवा’ म्हणतात. व्यवसायाला आवश्यक त्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी कर्जरूपाने बँका वित्तपुरवठा करतात. म्हणजेच व्यवसायाची कर्जाची गरज बँका भागवतात. या व्यतिरिक्त बँका धनाकर्ष (ड्राफ्ट), धनादेश, लॉकर, अधिविकर्ष सवलत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांसारख्या इतर सुविधाही बँका व्यवसायांना पुरवतात.

) विमा सेवा : विशिष्ट फी ज्याला विमा हप्ता म्हणतात, तो आकारून विमा कंपन्या व्यावसायिकांचा धोका स्वतः स्वीकारतात. व्यवसायामध्ये वस्तूच्या उत्पादन पायरीपासून ते वस्तू ग्राहकापर्यंत उपभोगासाठी पोहोचेपर्यंत अनेक धोके संभवत असतात. विमा कंपनी विमा करारावर सही घेऊन व करार करून विमेदाराला एका ठरावीक मुदतीनंतर अथवा एखादया दुर्घटनेच्या वेळी विशिष्ट ठरावीक रक्कम देण्याचे वचन देते. अशा प्रकारे विमा कंपनी व्यावसायिकांना विम्याच्या वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देऊन, व्यावसायिक धोक्यापासून संरक्षण करते व त्यांना त्यांच्या दैनंदिन कारभारावर लक्ष केंद्रित करण्यास साहाय्य करते.

) वाहतूक सेवा : वाहतूक सेवेमुळे ‘स्थान’ उपयोगिता निर्माण होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू अथवा व्यक्ती यांना स्थलांतरीत करण्याची सेवा म्हणजे वाहतूक होय. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, कच्चा माल, पक्का माल, मनुष्यबळ इत्यादी नेण्याची सुविधा म्हणजे वाहतूक होय. व्यवसायाच्या विकासामध्ये वाहतुकीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कारण या सुविधेमुळेच कच्चा माल, उत्पादित पक्का माल व मजुरांसारखे मनुष्यबळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करणे शक्य होते. जगातल्या सर्व विकसित देशांमधील वाहतुकीच्या साधनांच्या उपलब्धतेमुळेच त्या देशांचा विकास झाला आहे.

(४) साठवणूक (गोदामे) सेवा : साठवणूक या कार्यामुळे 'वेळ' उपयोगिता निर्माण होते. योग्य वेळी, योग्य वस्तू उपलब्ध होते. सध्याच्या आधुनिक जगात माल साठवणूक व्यवस्थेस अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. नियमितपणे माल साठवून ठेवण्याची व्यवस्था करणे म्हणजे मालसाठा व्यवस्था होय. वस्तू उत्पादित होण्याची वेळ आणि तिचा वापर होण्याची वेळ (उपभोग) यात अनेकदा अंतर असते. अशावेळी तो उत्पादित माल व त्या मालाचा प्रत्यक्ष वापराच्या वेळेपर्यंत सुरक्षित ठेवण्याची सुविधा ही ‘साठवणूक' असेल, तरच सहज शक्य होते. साठवणूक कार्यामुळे प्रमाणीकरण, प्रतवारी, वजन, बांधणी, नावछपाई इत्यादी कार्ये शक्य होतात व मागणीनुसार पुरवठा शक्य झाल्यामुळे किमतीवर नियंत्रण राखता येते.

(५) संदेशवहन सेवा : संदेशवहन हा व्यापाराला साहाय्यभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक आहे. जॉर्ज टेरी यांच्या मतानुसार, संदेशवहन ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, वस्तूस्थिती, माहिती इत्यादीची देवाण-घेवाण करण्याची प्रक्रिया होय.' पत्र, टेलिफोन, इंटरनेट, मोबाईल, दूरदर्शन, टेलेक्स, फॅक्स, कुरिअर्स, आकाशवाणी, छापील माध्यमे इत्यादी संदेशवहनाचे विविध प्रकार आहेत. या सर्व माध्यमांच्या मदतीने व्यावसायिक माहिती व संदेश

वेगाने दिले जातात.

)  संप्रेषण म्हणजे काय? संप्रेषणाचे विविध प्रकार थोडक्यात स्पष्ट करा.

उत्तर : अर्थ व व्याख्या-

                व्यापाराला साहाय्यभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक आहे. संदेशवहन ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, वस्तुस्थिती, माहिती इत्यादींची देवाण-घेवाण करण्याची प्रक्रिया आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एखादया माध्यमाच्या साहाय्याने माहितीचे वहन करण्याची प्रक्रिया म्हणजेच संदेशवहन किंवा संप्रेषण होय. संदेश प्राप्त करणारी व्यक्ती तो संदेश समजून घेऊन त्यानुसार पुढील कार्य करते. पत्र, टेलिफोन, इंटरनेट, मोबाईल, दूरदर्शन आणि वर्तमानपत्रे, आकाशवाणी इतर छापील माध्यमे इत्यादी संदेशवहनाचे वेगवेगळे प्रकार किंवा माध्यमे आहेत.

         जॉर्ज टेरी यांच्या मतानुसार,  

        “संदेशवहन, ही कल्पना वस्तुस्थिती व कृती यांचे संक्रमण व विनिमय करणारी एक प्रक्रिया आहे

(१) डाक सेवा प्रकार :

(अ) टपाल सेवा :

         भारतात टपाल सेवा भारत सरकार अंतर्गत पोस्ट व टेलिग्राम विभाग माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत व्यवस्थापित व नियंत्रित केला जातो. भारतामध्ये टपाल विभागाचे फार मोठे जाळे निर्माण झालेले आहे. भारतात टपाल विभागाअंतर्गत १,५४,९६५ डाक घर शाखा आहेत. यांपैकी १,४९,०६७ शाखा ग्रामीण विभागात कार्यरत आहेत.

(१) अंतर्देशीय पत्र : अंतर्देशीय पत्र हा संदेशवहनाचा एक स्वस्त प्रकार आहे. मजकूर लिहिल्यावर दर्शवलेल्या ठिकाणी घडी करून पत्र बंद करता येते. हे पत्र चिकटवता येत असल्यामुळे त्यातील मजकूर गुप्त राहू शकतो. या पत्राच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ठेवता येत नाहीत. अंतर्देशीय पत्रांचा वापर संदेशवहनासाठी भारतीय सीमांतर्गत केला जातो.

(२) बंद पाकीट : लहान आकाराचा लिफाफा अथवा वेस्टन ज्यावर विशिष्ट मूल्याचे तिकीट (Postage stamp) छापलेले असते. त्यास पोस्ट पाकीट म्हणतात. लिखित मजकूर व इतर दस्तऐवज पाकिटात ठेवण्यासाठी याची एक बाजू उघडी असते. या पाकिटात कागदपत्रे घालून ते बंद करता येते.

(३) पार्सल : एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लहान अथवा मध्यम आकाराच्या वस्तू पाठवायच्या असतील, तर त्या पोस्ट पार्सलने पाठवणे सोयीस्कर असते. पोस्ट खाते पोस्ट पार्सलद्वारे वस्तू पोहोचवण्यासाठी स्वस्त व विश्वसनीय सेवा प्रदान करते. ज्या वस्तूंवर शासनाने बंदी घातलेली आहे, अशा वस्तू वगळून पार्सलद्वारे वस्तू पाठवता येतात. देशांतर्गत तसेच विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी विशिष्ट वजनाच्या व आकारमानाच्या वस्तू पोस्टपार्सलने पाठवता येतात. पार्सलच्या वजनाप्रमाणे टपाल हशिलाची तिकिटे लावावी लागतात. पोस्ट पार्सलची काही विशिष्ट रक्कम भरून विमा उतरवता येतो. विमा उतरवल्यास पार्सल गहाळ झाल्यास पोस्ट खाते नुकसानभरपाई देते.

 (४) बुक-पोस्ट-

पोस्ट सेवेद्वारे सेवेद्वारे छापील वर्तमानपत्रे, मासिके, चित्रे, नकाशे, आराखडे, कार्यक्रमांची व सभांची आमंत्रणे, विवाहपत्रिका इत्यादी साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वस्त दरात पाठवता येते. या सेवेद्वारे पाठवण्यात येणारे साहित्य तपासणी करता यावी म्हणून पाकिटाचे आवरण खुले ठेवले जाते. अशा पाकिटावर ' Book-Post ' असे स्पष्टपणे लिहावे लागतात.

(ब) विशेष टपाल सेवा :

(१) व्यवसाय पोस्ट : व्यवसाय पोस्ट पूर्णतः 'मेल' सर्व्हिस आहे. ज्या अंतर्गत मेल मजकूर (ड्राफ्ट) तयार करण्यापासून ते पाठवण्यापर्यंत सर्व क्रियांचा समावेश होतो. व्यवसाय पोस्ट ही सेवा छोटे व्यापारी, व्यावसायिक तसेच मोठ्या संस्था व कंपन्यासाठी उपयुक्त आहे. ग्राहक त्यांना आवश्यक सेवेची निवड करू शकतात, की ज्यामध्ये छपाई, तपासणी इत्यादींचा समावेश होतो. भारतीय डाक विभागाने व्यवसाय पोस्ट सेवा देण्याच्या उद्देशाने भारतातील विविध शहरामध्ये 'व्यवसाय पोस्ट केंद्रे' सुरू केली आहेत. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात 'मेल' पाठवायचे असतात, तेव्हा व्यवसाय पोस्ट सेवा ग्राहकांच्या जागेवरूनही दिली जाते.

(२) लॉजिस्टिक पोस्ट : जेव्हा मोठ्या आकारमानाचे व असंख्य पार्सल पाठवायचे असतात, त्यासाठी लॉजिस्टिक पोस्ट ही सेवा उत्कृष्ट सेवा मानली जाते. लॉजिस्टिक पोस्ट या सेवेअंतर्गत वस्तू किंवा माल एकत्रित करण्यापासून, संचयापासून ते त्याच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवण्यापर्यंत सर्व सेवांचा समावेश होतो. थोडक्यात, या सेवेद्वारे व्यावसायिक ग्राहकांना अल्प व रास्त किमतीमध्ये वेळेत सेवा पुरवली जाते. लॉजिस्टिक पोस्टच्या प्रभावी संपर्क यंत्रणेद्वारे मोठ्या वस्तू देशाबाहेरही व्यवस्थितरीत्या पाठवल्या जातात. रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग व जलमार्गाचा उपयोग करून वस्तू वितरणाचे काम परिणामकारक व कमी खर्चात केले जाते.

) देयके सेवा : वित्तीय निवेदने, देयके, मासिक खाते देयके किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची संप्रेषणे सेवा घेणाऱ्याने (वित्तीय कंपन्या, म्युच्युअल फंड इत्यादी) ९० दिवसांतून एकदा आपल्या सर्व ग्राहकांना पाठवणे अनिवार्य असते. डाक विभागामार्फत ही निवेदने पाठवण्यासाठी दस्तऐवजांची किमान संख्या ५,००० असावी लागते. देयके सेवा विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट पोस्ट विभागामार्फत, पिनकोडच्या मदतीने त्या विभागात वितरित केल्या जातात.

(क) निधी पाठवण्याची सुविधा :

(१) इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर (EMO) : मनीऑर्डरद्वारे विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट व्यक्तीला पैसे पाठवणे हा एक सर्वांत सोयीचा मार्ग मानला जातो. एका पोस्ट कार्यालयाने दुसऱ्या ठिकाणच्या पोस्ट कार्यालयाला, ज्याचे नाव त्या मनीऑर्डरवर लिहिले आहे त्याला पैसे देण्याचा आदेश मानले जाते. या सेवेअंतर्गत पैसे घेणाऱ्या (ग्राहक)च्या दिलेल्या पत्त्यावर घरपोच (मुक्कामी) सेवा उपलब्ध करून दिली जाते.

) त्वरित निधी सेवा (IMO) : पोस्ट विभागामार्फत तात्काळ किंवा त्वरित निधी हस्तांतरण सुविधा ग्राहकाला दिली जाते. हीसुद्धा इंटरनेट (Web based) सेवा असते. ही सेवा सर्वांत जलद, सुलभ, किफायतशीर आणि विश्वासार्ह मानली जाते. भारतातील दोन रहिवासी जवळच्या डाकघरामार्फत संगणकाच्या साहाय्याने ही सेवा वापरू शकतात. या सुविधेअंतर्गत किमान ₹ १,००० पासून ते अधिकतम ₹ ५०,००० पर्यंत रक्कम डाक घरामार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरीत केली जाऊ शकते. ही सुविधा सोपी, जलद व आर्थिकदृष्ट्या परवडणारी असते.

) आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण (IMT) : आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधेअंतर्गत परदेशातून भारतातील वैयक्तिक लाभार्थ्यांनाच पैसे पाठवता येतात. ही सुविधा फक्त वैयक्तिक (कुटुंब) लाभार्थ्यांनाच दिली जाते. संस्था, कंपनी, संघटना यांना उपलब्ध नसते. हा आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी हस्तांतरणाचा जलद व सोपा मार्ग आहे. भारतीय डाक विभाग, भारत सरकार आणि वेस्टर्न युनियन फिनान्शियल सर्व्हिसेसच्या प्रगत प्रणालीद्वारे डाक घरातून ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. या प्रगत प्रणालीद्वारे जगभरातील १९५ देश व प्रांतामधून भारतात त्वरित पैसे पाठवले जाऊ शकतात.

(ड) सामान्य सेवा :

(१) सामान्य पोस्ट : सामान्य पोस्ट या सेवेअंतर्गत डाक विभाग सामान्य लोकांना सेवा पुरवण्याचे कार्य करते. निवडक पोस्ट कार्यालयांमार्फत तृतीय पक्ष उत्पादने (विजेचे बिल, शासनांचे कर) ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य या सेवेअंतर्गत करून दिले जाते. या सेवेअंतर्गत विविध सेवा प्रदान केल्या जातात. जसे, वीज  बिल कलेक्शन, टेलिफोन बिल, विमा हप्ते, कर संकलन, शासनाच्या विविध फी इत्यादी. या सेवेअंतर्गत पोस्ट कार्यालय शासनाच्या MPSC, UPSC इतर परीक्षांच्या अर्जाचे वाटप व स्वीकृतीही करते.

) ई-पोस्ट : आधुनिक काळामध्ये पोस्ट विभागामार्फत ई-पोस्ट ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या सुविधेअंतर्गत ग्राहकांचे लिखित संदेश किंवा काही वेळेस हस्तलिखित सुद्धा स्कॅन करून इंटरनेटचा वापर करून ई-मेलद्वारे पाठवले जातात. अशा प्रकारे ई-पोस्टद्वारे इलेक्ट्रॉनिक तसेच छापील प्रत अशा दोन्ही स्वरूपात ही सुविधा मिळते. पोस्ट कार्यालयातून पोस्टमनमार्फत लिखित नाव व पत्त्यावर असे संदेश, लिखित स्वरूपात, पाकिटे स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात. या माध्यमातून १,५५,००० डाक घरांमार्फत भारतातील कोणत्याही पत्त्यावर त्यांचे विविध प्रकारचे संदेश सहज पाठवू शकतात. मोठ्या कंपन्या ई-पोस्टची विशेष सेवा अधिक दर देऊन स्वीकारतात.

(२) आधुनिक संप्रेषण साधने

(१) कुरिअर सेवा : कुरिअर सेवेद्वारे एखादया व्यक्तीला किंवा संस्थेला आपले पार्सल किंवा विशिष्ट वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येते. विविध कंपन्यांकडून सरसकट दरआकारणी करून विविध लोकांना कुरिअर सेवा नियमित दिल्या जातात. सामान्य डाक सुविधेपेक्षा वेग, सुरक्षा व जलद सेवेच्या बाबतीत कुरिअर सेवा भिन्न असतात. सामान्य कुरिअर सेवा डाक सेवेपेक्षा अधिक खर्चीक असतात. DHL – Dalsey Hillblom, Lynn, DTDC – Desk to Desk Courier and cargo इत्यादी कुरिअर सेवेची उदाहरणे सांगता येतील.

) इंटरनेट : आधुनिक काळामध्ये इंटरनेटचा उपयोग संप्रेषणासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. इंटरनेट हे एकमेकांशी संगणकाद्वारे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे (मोबाईल) जोडलेल्या प्रणालीचे जाळे असून, ज्याचा जगभरात विशिष्ट पद्धतीने (World Wide Web) संकेतांक वापरून संगणक जोडण्यासाठी उपयोग केला जातो. या प्रणालीमध्ये खाजगी, सार्वजनिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि स्थानिक ते जागतिक व्याप्तीच्या सरकारी नेटवर्कचा समावेश होतो.

) ई-मेल : ई-मेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल होय. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग करून विविध प्रकारचे संदेश इंटरनेटच्या साहाय्याने एकमेकांमध्ये देवाण-घेवाण करण्याच्या प्रक्रियेला ई-मेल म्हणतात. ई-मेल सेवेअंतर्गत स्वीकारणे (Accept), पुढे पाठवणे (Forward) व संग्रह (साठा) (Store) संदेश अशी आदेश प्रक्रिया असते. ई-मेलसाठी प्राप्तकर्त्याला सतत संगणकासमोर (online) रहावे लागत नाही; कारण संदेश संग्रहित ठेवला जातो.

६) रस्ते वाहतूक म्हणजे काय? रस्ते वाहतुकीचे गुण आणि दोष स्पष्ट करा.

उत्तर : अर्थ : रस्ते वाहतूक हा सर्वांत जुना वाहतुकीचा प्रकार मानला जातो. रस्ते वाहतुकीची जी विविध माध्यमे आहेत ती सर्व रस्त्यांवरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. विविध छोटी, मोठी गावे, शहरे जोडण्याचे काम रस्ते वाहतुकीमुळे होते. लोकांचा, लोकांशी संपर्क वाढवण्याचे काम रस्ते वाहतूक करते. कच्चे रस्ते, पक्के रस्ते, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग यांवरून विविध प्रकारची वाहने धावत असतात. शहरे, गावे, राज्य जोडली जातात. रस्ते वाहतुकीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची व मालाची वाहतूक होते. देशांतर्गत विविध पर्यटनस्थळे पाहणे रस्ते वाहतुकीमुळे शक्य होते. बाजारपेठेचा स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर विस्तार होतो. या व्यतिरिक्त सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रस्ते सर्वदूर असल्याने लहान भागातूनही वस्तू ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवता येतात. रस्ते वाहतुकीमध्ये बैलगाडी, सायकल, मोटार सायकल, रिक्षा, ट्रक, बसेस इत्यादी माध्यमांचा उपयोग केला जातो.

(अ) रस्ते वाहतुकीचे फायदे :

१) सर्वांत स्वस्त वाहतूक : इतर वाहतूक प्रकारांचा (रेल्वे हवाई, जल) विचार करता रस्ते वाहतूक अधिक स्वस्त माध्यम आहे. त्याचा देखभाल खर्चही तुलनेने कमी असतो.

) नाशवंत मालासाठी उपयुक्त : रस्ते वाहतूक ही नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी अधिक योग्य व उपयुक्त असते. जसे, दूध, भाजीपाला, फळे, अंडी, मासे, फुले इत्यादी. कमी अंतरावर व कमी वेळेत या वस्तू पोहोचवता येतात.

) लवचीकता : रस्ते वाहतूक हा इतर माध्यमांपेक्षा लवचीक प्रकार आहे. माल चढवणे, उतरवणे हे कोणत्याही ठिकाणी शक्य असते. शिवाय मार्गांची निवड, वेळेची निवड, वाहन प्रकाराची निवड यामध्ये लवचीकता असते.

४) घरपोच सेवा : केवळ रस्ते वाहतुकीमध्येच ग्राहकाला घरपोच सेवा देणे शक्य असते. प्रवासी व वस्तू (माल) उत्पादन ठिकाणापासून ते निवासी वस्त्यांपर्यंत वाहन पोहोचू शकते. उंच व ५) ५) डोंगराळ भागात वाहतूक शक्य : लोकांना ज्या ठिकाणी दळणवळणाचे तसेच, कोणतेही साधन उपलब्ध नसल्यास अशा ठिकाणी जसे, घाटामध्ये, उंच जागी, छोटी वाहने टेम्पो, कार प्रवाशांना घेऊन जाऊ शकतात.

) कमी भांडवल गुंतवणूक : रेल्वे, हवाई व जल वाहतुकीशी तुलना केली, तर रस्ते वाहतुकीसाठी कमी भांडवल गुंतवणूक करावी लागते. रस्त्यांची बांधणी व देखभाल यासाठी तुलनेने कमी खर्च येतो.

(ब) रस्ते वाहतुकीतील दोष (मर्यादा):

१) दूर अंतराच्या प्रवासासाठी अयोग्य : इतर वाहतूक माध्यमांचा विचार केला, तर रस्ते वाहतुकीमधून फार मोठ्या प्रमाणात माल व प्रवाशांची वाहतूक होऊ शकत नाही. वाहनक्षमता मर्यादित असते. तसेच इंधनांचे वाढते दर, टोल, कमी वेग यांमुळेही वाहतूक खर्चीक होते.

२) अवजड व मोठ्या वस्तूंसाठी अयोग्य : मोठी यंत्रे, अवजड सामान यांची वाहतूक करण्यासाठी रस्ते वाहतूक सोयीची नसते. लांब अंतर व अधिक खर्च यांमुळे अवजड मालास ही वाहतूक उपयुक्त नसते.

) विपरीत हवामानाचा परिणाम : पूर, पाऊस, दरड कोसळणे इत्यादी हवामानातील बदलांचा प्रभाव रस्ते वाहतुकीवर पडतो. धुके असेल तर ड्रायव्हर गाडी चालवू शकत नाही

४) अपघात : वाहतुकीच्या इतर प्रकारांपेक्षा सर्वांत जास्त अपघात रस्ते वाहतुकीमध्ये होतात. वाहनांचा दोष, ड्रायव्हरचा निष्काळजीपणा इत्यादींमुळे अधिक अपघात होतात.

५) प्रदूषण समस्या : सर्वांत जास्त हवेचे प्रदूषण रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमुळे होते. वाहनांमधून निघणारा धूर, वायू यांमुळे हवेमध्ये प्रचंड प्रदूषण होते व त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो.


धन्यवाद !!!

 कृपया शेयर करा 


Post a Comment

1 Comments

Thank you / आभारी आहोत.
Please share and follows.

Close Menu