google-site-verification: googlea24dc57d362d0454.html साक्षात श्री स्वामी समर्थ वृद्धाच्या रूपात येऊन मला आत्महत्या करण्यापासून वाचवले - श्री स्वामी समर्थ सेवेच्या अनुभव (माहिती - युवराज भोसले)

साक्षात श्री स्वामी समर्थ वृद्धाच्या रूपात येऊन मला आत्महत्या करण्यापासून वाचवले - श्री स्वामी समर्थ सेवेच्या अनुभव (माहिती - युवराज भोसले)


अनुभुती स्वामी सेवेची.........
                माझ्या सोबत घडलेला एक दृष्टांत सांगु इच्छितो......
                1990 मध्ये माझी परिस्थिती हालाखीची होती. अगदी कुढे गावालाही जायचे म्हटल्यावर मला पैशाची तडजोड करावी लागत होती.  95 ला माझा विवाह झाला बायको स्वामी समर्थाची कट्टर भक्त होती स्वामी समर्थ म्हटले की मग कशाचाही तडजोड नाही.असा तिचा स्वभाव......

            पण माझ याऊलट होतं मी आधीपासूनच नास्तीक आता नास्तीक म्हटले म्हणजे दारू मटण इ.हे सगळं आलच बायकोचे आणि माझे सुरवातीला खुप भांडणं व्हायची बघता बघता मी अट्टल बेवडा झालो होतो माझा परिवार माझ्यापुढे हतबल झाला होता.मी निराशेच्या शेवटच्या टोकावर होतो.
             कर्जबाजारी झालोहोतो आत्महत्ये शिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.
खुप डिप्रेशन मध्ये होतो मी,ठरवल होत हा देहत्यागायचा  म्हणून हायवेला आलो त्यावेळी मी खुप नशेत होतो.
              मला शेवटच बायको सोबत बोलायच होत म्हणून मी तीला काॅल केला आणि बोलु लागलो तिला माझ्या बोलण्यावरून सगळा अंदाज अला होता मी जिवाच बरवाईट करतोय म्हणून..ती मला विनंत्या करु लागली रडु लागली तुम्ही घरी या म्हणून हाक देऊ लागली पण मी कांहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो.
             मी फोन बंद केला आणि एखादी गाडी येईल म्हणून वाट बघु लागलो दुरवर बघीतले तर भरधाव वेगाने एक ट्रक येतानी दिसत होता. मी देहत्यागायचा निश्चय केला होता.
             तेवढ्यात मला मागणं कुणीतरी आवाज दिला.."ऐ पोरा, अरं हा रस्ता कुठं जातो रे" मी मागे वळून पाहिले तर एक वयोवृद्ध माणूस होता. मी त्या वृध्दाला कहीच उत्तर दिले नाही मग तो वृद्ध माझ्याजवळ आला ला आणि परत विचारल, "इथ कुठं जवळ गाव आहे का रे बाळा"मी त्या वृध्दाला खवळलो, त्यावर ते वृद्ध बोलले 'एवढा राग चांगला नाही बाळ संयम ठेवला तर सगळ नीट होईल आणि जिवनप्रवासात येणार्या अडचणींना आत्महत्या हा पर्याय नसतो माझ्या कडे बघ पाच मुल आहेत मला एकही सांभाळत नाही मला, बायको कवाच गेलीये देवाघरी तरी मी जगतोय आणि तुला काय झालय रे, चांगला तरुण आहेस काम कर काहीतरी व्यवसाय कर'  मी त्या वृध्दाचे बोलणे ऐकून निशब्द झालो होतो. 

            मी त्यांना विचारले बाबा तुम्हाला कुठं जायचं, त्यावर ते वृद्ध बोलले 'मी कुठं जाणार रे भिक्षा मागुन जिवन जगतोय' माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता जगण्याचा मार्ग मला कळाला होता. वृद्ध म्हणाले, चल बाबा तुझ गाव असेल जवळ तर मला घेऊन चल भुक लागलीये भिक्षा मागुन खातो त्या वृध्दाचे बोलणे ऐकून मला माझ्या आजोबांची आठवण झाली होती मी इमोशनल झालो होतो त्यांना मी माझ्या घरी येण्यासाठी विनंती केली आणि ते माझ्या सोबत आले पण.... 

             घरी आल्यावर बघीतले,तर बायको स्वामी समर्थाच्या फोटो समोर बसून रडत रडत स्वामी समर्थाचां जाप करत होती. त्यावर वृध्दांची तिला आवाज दिला 'ऐ पोरी, पाणी मिळल का?'

            तिने डोळे उघडले आणि समोर मला पाहिलं...तिला खुप,खुप आणंद झाला. झालेली हकीकत मी तिला सांगितली, तीने त्या वृध्दाचे पायापडुन आभार मानले नंतर आम्ही सर्वांनी भोजन केले. थोडा आराम करुन ते वृद्ध म्हणाले चला येतो आता मी चांगला संसार करा देव तुम्हाला काही कमी पडू देणारं नाही.
            ते वृद्ध निघाले तेव्हा मी थोडा भावुक झालो होतो निघते वेळी त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीतून विस हजार रुपये काढले आणि माझ्या कडे दिले ते म्हणाले हे घे माझ्या कड ऐवढेच आहेत मला ह्या पैशांची गरज नाही हे तु ठेव आणि काहीतरी व्यवसाय कर तुला काही कमी पडणार नाही. मग आम्ही दोघांनी जोडीने त्या वृध्दाचे दर्शन घेतले आणि त्यांना निरोप दिला .
            आम्ही दोघांनी ठरवलं होतं त्या पैशाची एक गाय घ्यायची आणि दुधाचा व्यवसाय करायचा..ह्या घटनेला जवळ जवळ विस वर्ष होत आलेत  आम्ही त्या एका गायीवर आज आमच्या कडे पंचवीस गायी आहेत आमचा दुधाचा व्यवसाय खुपच चांगला चालु आहे.
मी मागे तिन वर्षापूर्वी पाच एकर जमीन घेतली आहे. एक टुमदार घर पण बांधलय..... 

  सांगायचं तात्पर्य एवढंच की,मला ते वृद्ध नाही तर साक्षात श्री स्वामी समर्थच भेटले होते.


 || जय श्री स्वामी समर्थ महाराज ||

Post a Comment

0 Comments

Close Menu